शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बाबाटोलीतील ९० टक्के कुटुंबांकडे रेशनकार्डच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:59 IST

मागील चार दिवसांपासून लोकमतने बाबाटोली येथील लोकांच्या भौतिक सोयी सुविधांच्या समस्या उचलून धरल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती : अनेकदा उपाशीपोटी काढावी लागते रात्र

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील चार दिवसांपासून लोकमतने बाबाटोली येथील लोकांच्या भौतिक सोयी सुविधांच्या समस्या उचलून धरल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. तर बाबाटोलीत जीवन जगत असलेल्या फकीर समाजाला स्वातंत्र्याच्या ७१ वर्षानंतरही अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसाठी येथील नागरिकांना प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याची बाब पुढे आली आहे.शासन, प्रशासन लक्ष देत नसल्याने त्यांना आजही पोटाची खडगी भरण्यासाठी वणवण भटकावे लागते. कधी कधी त्यांना उपाशी पोटी रात्र काढावी लागते. लोकमत प्रतिनिधीने बाबाटोली येथील नागरिकांशी संवाद साधला असता येथील ५० स्थायी कुटुंबापैकी केवळ चार कुटुंबाकडे अंत्योदय योजनेचे रेशनकार्डच आहे. तर उर्वरित ९० टक्के कुटुंबांकडे रेशनकार्ड नाही. परिणामी त्यांना अन्नधान्य मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.बाबाटोलीतील महिला पुरुषांसह छोटी मुले एखादा देवदूत येईल आणि आपल्या सर्व समस्या दूर करेल अशी आशा बाळगून आहेत. आम्हाला स्वस्त धान्य दुकानातून दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ मिळावे,अशी अपेक्षा करीत योजनेचा लाभ सुरु करुन द्या हो साहेब अशी आर्त हाक देत होते. २० वर्षांपूर्वी पंतपधान अटबिहारी वाजपेयी यांनी गोरगरिबांसाठी अंत्योदय योजना सुरू केली.या योजनेतंर्गत दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किलो तांदूळ मिळण्याची सोय प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात केली. त्यानंतर सर्वेक्षणानुसार पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढत गेली.या योजनेमुळे उपाशी पोटी झोपणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला होता. परंतू बाबाटोली येथे ३० वर्षापासून वास्तव्यास असलेल्या फकीर समाजाला याचा लाभ मिळाला नाही.जर आम्हाला तीन रुपये किलो तांदूळ मिळण्याचा लाभ देऊ शकत नसाल तर कमीत कमी ५ रुपये किलो तांदूळ योजनेचा लाभ तरी द्या, आम्ही आपल्या मुलांना पोटभर जेवायला देऊ शकू अशी विनंती बाबाटोलीतील नागरिक करीत होते. साधारणत: कोणत्याही कुटुंबाला रेशनकार्ड बनविण्यासाठी रहिवासी दाखला, घर टॅक्स पावती, आधार कार्ड, बँक खाते आणि शंभर रुपयाचे स्टँम्प पेपर तयार करुन तहसील कार्यालयात अर्जासह सादर केल्यास रेशनकार्ड तयार केले जाते.मात्र बाबाटोलीवासीयांना अद्यापही याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे दारिद्रयात जीवन जगून सुध्दा शासकीय योजनापासून वंचित राहावे लागत आहे.मागील तीन दशकांपासून आम्ही येथे राहत आहोत. जवळपास शंभर लोकांचे नाव मतदार यादीत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नेते आमच्यापर्यंत येतात मात्र अद्यापही रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी कुणीच पुढाकार घेतला नाही.-काहारबी शाह, नागरिकरेशन कार्ड तयार केल्यास सर्वांना अंत्योदय योजनेत अन्नधान्य देण्यात येईल. त्यांनी यासाठी पुढाकार घेतल्यास रेशन कार्ड बनविण्यास आपण सहकार्य करू.-खेमराज साखरे,रेशन दुकानदार,सालेकसा