शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बाबाटोलीतील ९० टक्के कुटुंबांकडे रेशनकार्डच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:59 IST

मागील चार दिवसांपासून लोकमतने बाबाटोली येथील लोकांच्या भौतिक सोयी सुविधांच्या समस्या उचलून धरल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती : अनेकदा उपाशीपोटी काढावी लागते रात्र

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील चार दिवसांपासून लोकमतने बाबाटोली येथील लोकांच्या भौतिक सोयी सुविधांच्या समस्या उचलून धरल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. तर बाबाटोलीत जीवन जगत असलेल्या फकीर समाजाला स्वातंत्र्याच्या ७१ वर्षानंतरही अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसाठी येथील नागरिकांना प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याची बाब पुढे आली आहे.शासन, प्रशासन लक्ष देत नसल्याने त्यांना आजही पोटाची खडगी भरण्यासाठी वणवण भटकावे लागते. कधी कधी त्यांना उपाशी पोटी रात्र काढावी लागते. लोकमत प्रतिनिधीने बाबाटोली येथील नागरिकांशी संवाद साधला असता येथील ५० स्थायी कुटुंबापैकी केवळ चार कुटुंबाकडे अंत्योदय योजनेचे रेशनकार्डच आहे. तर उर्वरित ९० टक्के कुटुंबांकडे रेशनकार्ड नाही. परिणामी त्यांना अन्नधान्य मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.बाबाटोलीतील महिला पुरुषांसह छोटी मुले एखादा देवदूत येईल आणि आपल्या सर्व समस्या दूर करेल अशी आशा बाळगून आहेत. आम्हाला स्वस्त धान्य दुकानातून दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ मिळावे,अशी अपेक्षा करीत योजनेचा लाभ सुरु करुन द्या हो साहेब अशी आर्त हाक देत होते. २० वर्षांपूर्वी पंतपधान अटबिहारी वाजपेयी यांनी गोरगरिबांसाठी अंत्योदय योजना सुरू केली.या योजनेतंर्गत दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किलो तांदूळ मिळण्याची सोय प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात केली. त्यानंतर सर्वेक्षणानुसार पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढत गेली.या योजनेमुळे उपाशी पोटी झोपणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला होता. परंतू बाबाटोली येथे ३० वर्षापासून वास्तव्यास असलेल्या फकीर समाजाला याचा लाभ मिळाला नाही.जर आम्हाला तीन रुपये किलो तांदूळ मिळण्याचा लाभ देऊ शकत नसाल तर कमीत कमी ५ रुपये किलो तांदूळ योजनेचा लाभ तरी द्या, आम्ही आपल्या मुलांना पोटभर जेवायला देऊ शकू अशी विनंती बाबाटोलीतील नागरिक करीत होते. साधारणत: कोणत्याही कुटुंबाला रेशनकार्ड बनविण्यासाठी रहिवासी दाखला, घर टॅक्स पावती, आधार कार्ड, बँक खाते आणि शंभर रुपयाचे स्टँम्प पेपर तयार करुन तहसील कार्यालयात अर्जासह सादर केल्यास रेशनकार्ड तयार केले जाते.मात्र बाबाटोलीवासीयांना अद्यापही याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे दारिद्रयात जीवन जगून सुध्दा शासकीय योजनापासून वंचित राहावे लागत आहे.मागील तीन दशकांपासून आम्ही येथे राहत आहोत. जवळपास शंभर लोकांचे नाव मतदार यादीत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नेते आमच्यापर्यंत येतात मात्र अद्यापही रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी कुणीच पुढाकार घेतला नाही.-काहारबी शाह, नागरिकरेशन कार्ड तयार केल्यास सर्वांना अंत्योदय योजनेत अन्नधान्य देण्यात येईल. त्यांनी यासाठी पुढाकार घेतल्यास रेशन कार्ड बनविण्यास आपण सहकार्य करू.-खेमराज साखरे,रेशन दुकानदार,सालेकसा