शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पुढील दिवस राष्ट्रवादीचेच

By admin | Updated: August 31, 2015 01:33 IST

तत्वांशी जडजोड करीत ज्या भाजपशी हातमिळवणी केली, त्या भाजपविरूद्ध आंदोलन करण्याचा नैतिक अधिकारच जिल्ह्यातील काँग्रेसने गमावला आहे.

पटेल गरजले : भाजपच्या पापांमध्ये आता काँग्रेसचाही वाटागोंदिया : तत्वांशी जडजोड करीत ज्या भाजपशी हातमिळवणी केली, त्या भाजपविरूद्ध आंदोलन करण्याचा नैतिक अधिकारच जिल्ह्यातील काँग्रेसने गमावला आहे. गेल्या १६ महिन्याच्या कार्यकाळात गोंदिया जिल्ह्याला केंद्र व राज्य सरकारकडून काय मिळाले आणि काय गमावले हे नागरिकांना आता कळत आहे. आता त्याच भाजपशी हातमिळवणी करीत काँग्रेस त्या पापाचा वाटेकरी होत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये, त्यांच्या अभद्र युतीचा धडा लोकच त्यांना शिकवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसवरील लोकांचा विश्वास वाढत असून पुढील दिवस आपलेच आहेत, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खा.प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.येथील एनएमडी कॉलेजमधील भरगच्च भरलेल्या सभागृहात रविवारी सायंकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर आ.राजेंद्र जैन, माजी आ.दिलीप बन्सोड, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, जि.प.चे गटनेता गंगाधर परशुरामकर, जिल्हा महिला राकाँच्या अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, पंचम बिसेन, मनोहर चंद्रीकापुरे, शहराध्यक्ष शिव शर्मा, माजी नगराध्यक्ष आशा पाटील, केवल बघेले, डॉ.अविनाश काशीवार यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.सुरूवातीला खा.पटेल यांच्या हस्ते जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीला बहुमत मिळवून देणाऱ्या संचालकांचाही सत्कार केला.यावेळी मार्गदर्शन करताना खा.पटेल म्हणाले, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २० सदस्य निवडून आले ही बाब समाधानाची आणि अभिमानाची आहे. निवडणुकीच्या वेळी भाजप सरकारविरूद्ध प्रभावीपणे वातावरण तयार करण्याचे काम आम्ही केले. त्याचा फायदा काँग्रेसलाही झाला. सोबत-सोबत लढलो असतो तर भाजपला २-४ जागांवर समाधान मानावे लागले असते. गेल्यावेळी आम्ही काँग्रेससोबत निवडणूक लढविली. काँग्रेसपेक्षा कमी जागा घेऊनही राष्ट्रवादीच्या जागा जास्त आल्या होत्या. यावेळी तर आपली ताकद कितीतरी वाढली. स्वतंत्रपणे लढूनही २० जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. आम्ही ठरविले असते तर भाजपसोबत आम्हालाही जाता आले असते, पण आम्ही कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या भावनांचा आदर करतो. जनतेने आम्हाला ज्या भाजपविरूद्ध कौल दिला त्यांच्याशी हात मिळविणे हा जनतेचा विश्वासघात आहे, पण काँग्रेसने तो विचार केला नाही. आम्ही सत्तेत नाही याची खंत बाळगू नका. यश-अपयश हे जुळलेलेच असते. आमची ताकद कुठेही कमी झालेली नाही, ती दिवसेंदिवस वाढतच आहे. जनतेची कामे करून त्यांना आपल्याशी जुळवा, असे आवाहन यावेळी पटेल यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना केले. (जिल्हा प्रतिनिधी)