शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पुढील दिवस राष्ट्रवादीचेच

By admin | Updated: August 31, 2015 01:33 IST

तत्वांशी जडजोड करीत ज्या भाजपशी हातमिळवणी केली, त्या भाजपविरूद्ध आंदोलन करण्याचा नैतिक अधिकारच जिल्ह्यातील काँग्रेसने गमावला आहे.

पटेल गरजले : भाजपच्या पापांमध्ये आता काँग्रेसचाही वाटागोंदिया : तत्वांशी जडजोड करीत ज्या भाजपशी हातमिळवणी केली, त्या भाजपविरूद्ध आंदोलन करण्याचा नैतिक अधिकारच जिल्ह्यातील काँग्रेसने गमावला आहे. गेल्या १६ महिन्याच्या कार्यकाळात गोंदिया जिल्ह्याला केंद्र व राज्य सरकारकडून काय मिळाले आणि काय गमावले हे नागरिकांना आता कळत आहे. आता त्याच भाजपशी हातमिळवणी करीत काँग्रेस त्या पापाचा वाटेकरी होत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये, त्यांच्या अभद्र युतीचा धडा लोकच त्यांना शिकवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसवरील लोकांचा विश्वास वाढत असून पुढील दिवस आपलेच आहेत, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खा.प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.येथील एनएमडी कॉलेजमधील भरगच्च भरलेल्या सभागृहात रविवारी सायंकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर आ.राजेंद्र जैन, माजी आ.दिलीप बन्सोड, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, जि.प.चे गटनेता गंगाधर परशुरामकर, जिल्हा महिला राकाँच्या अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, पंचम बिसेन, मनोहर चंद्रीकापुरे, शहराध्यक्ष शिव शर्मा, माजी नगराध्यक्ष आशा पाटील, केवल बघेले, डॉ.अविनाश काशीवार यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.सुरूवातीला खा.पटेल यांच्या हस्ते जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीला बहुमत मिळवून देणाऱ्या संचालकांचाही सत्कार केला.यावेळी मार्गदर्शन करताना खा.पटेल म्हणाले, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २० सदस्य निवडून आले ही बाब समाधानाची आणि अभिमानाची आहे. निवडणुकीच्या वेळी भाजप सरकारविरूद्ध प्रभावीपणे वातावरण तयार करण्याचे काम आम्ही केले. त्याचा फायदा काँग्रेसलाही झाला. सोबत-सोबत लढलो असतो तर भाजपला २-४ जागांवर समाधान मानावे लागले असते. गेल्यावेळी आम्ही काँग्रेससोबत निवडणूक लढविली. काँग्रेसपेक्षा कमी जागा घेऊनही राष्ट्रवादीच्या जागा जास्त आल्या होत्या. यावेळी तर आपली ताकद कितीतरी वाढली. स्वतंत्रपणे लढूनही २० जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. आम्ही ठरविले असते तर भाजपसोबत आम्हालाही जाता आले असते, पण आम्ही कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या भावनांचा आदर करतो. जनतेने आम्हाला ज्या भाजपविरूद्ध कौल दिला त्यांच्याशी हात मिळविणे हा जनतेचा विश्वासघात आहे, पण काँग्रेसने तो विचार केला नाही. आम्ही सत्तेत नाही याची खंत बाळगू नका. यश-अपयश हे जुळलेलेच असते. आमची ताकद कुठेही कमी झालेली नाही, ती दिवसेंदिवस वाढतच आहे. जनतेची कामे करून त्यांना आपल्याशी जुळवा, असे आवाहन यावेळी पटेल यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना केले. (जिल्हा प्रतिनिधी)