शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नवीन चौकीमुळे वातावरण सुरक्षित

By admin | Updated: February 18, 2017 01:01 IST

शेतकरी आणि व्यापारी यांची अनेक वर्षांपासून या ठिकाणी पोलीस चौकी व्हावी ही मागणी होती.

अग्रवाल : सावराटोलीत पोलीस चौकीचा शुभारंभ गोंदिया : शेतकरी आणि व्यापारी यांची अनेक वर्षांपासून या ठिकाणी पोलीस चौकी व्हावी ही मागणी होती. परिसरातील नागरिक, उत्पादित माल बाजारपेठेत आणणारे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये या चौकीमुळे सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होवून व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केला. शुक्रवारी (दि.१७) सावराटोली येथील गोंदिया कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पोलीस चौकीचा शुभारंभ आ.अग्रवाल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनलाल ठाकरे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. आ.अग्रवाल यांनी फित कापून तंबूतील चौकीचा शुभारंभ केला. शुभारंभ केल्यानंतर चौकीला भेट दिल्याची पहिली नोंद जिल्हाधिकारी काळे यांनी केली. यावेळी ही सावराटोली पोलीस चौकी २४ तास सुरु असली पाहिजे, अशी अपेक्षा आ.अग्रवाल यांनी व्यक्त केली. तस९च पांढराबोडी व काटी येथेही पोलीस चौकी सुरु करण्यात येईल. गोंदिया शहराचे सिटी सर्व्हेक्षण झाल्यास गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया सिटी सर्वेच्या दृष्टीने नगर परिषद पुढाकार घेईल. वादाची सुरूवात ही जमिनीपासून होते. गोंदिया शहरात जमिनीच्या किमती सोन्यापेक्षा जास्त आहे. राज्यातील सर्व जमीन मोजणीचा कार्यक्र म राज्य शासनाने हाती घेतला आहे. येत्या १ मार्च रोजी शहरातील जागेच्या मोजणीच्या दृष्टीने बैठक घेण्यात येईल. पोलिसांनी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी त्यांना मदत करण्यात येईल असेही ते म्हणाले. नगराध्यक्ष इंगळे यांनी शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाला सहकार्य करण्याची आपली नैतिक जबाबदारी पार पाडू असेही सांगितले. प्रास्ताविकातून डॉ.भुजबळ म्हणाले, गोंदिया शहरात देशाचे छोटे स्वरूप दिसून येते. सर्व जाती धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. पोलीस चौकी उभारु न पोलीस केंद्राचे विकेंद्रीकरण करण्यात येत आहे. सावराटोली परिसरात गुन्हेगारांचा वावर असल्याचे सांगितले जाते. ही गुन्हेगारी निश्चित आपण मोडीत काढू. या परिसरात सुरक्षितता व शांतता नांदण्यास या चौकीची मदत होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावराटोली पोलीस चौकीचे पोलीस हवालदार विजय गुरपुडे, पोलीस नाईक ओमेश्वर मेश्राम व संदीप नाईक यांना पुष्पगुच्छ देण्यात आले. कार्यक्र माला कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, शेतकरी, व्यापारी, नागरिक, पोलीस मित्र, पोलीस कर्मचारी, अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी) पोलीस क्वॉर्टरची कामे सुरू होणार आमदार अग्रवाल यावेळी म्हणाले, पोलीस चौकीच्या सुविधेमुळे धानाचा व्यापार येथे आणता येईल. भाजी मार्केटसुध्दा आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले, स्टेट बँकेची शाखा येथे उघडण्यात येणार आहे. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करताना रामनगर, सिटी पोलीस स्टेशन, रावणवाडी पोलीस स्टेशनच्या इमारती आणि १४४ पोलीस क्वॉर्टरची कामे येत्या सहा महिन्याच्या आत सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.