शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

जिल्ह्यातील तापमानाने गाठला नवा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 23:50 IST

यंदा मे महिन्यातील तापमानाने उच्चांक गाठले आहे. जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मंगळवारी झाली. मागील २० वर्षांतील तापमानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे सर्वाधिक तापमान होय. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची चांगलीच होरपळ होत असून कुलर पंखे सुध्दा काम करीत नसल्याने संपूर्ण जिल्हावासीय उकाड्याने त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देमागील २० वर्षांत प्रथमच तापमानात वाढ : मे महिन्यातील रेकार्ड मोडले, जिल्हावासीय उकाड्याने हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा मे महिन्यातील तापमानाने उच्चांक गाठले आहे. जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मंगळवारी झाली. मागील २० वर्षांतील तापमानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे सर्वाधिक तापमान होय. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची चांगलीच होरपळ होत असून कुलर पंखे सुध्दा काम करीत नसल्याने संपूर्ण जिल्हावासीय उकाड्याने त्रस्त झाले आहेत.मान्सूनचे आगमन लांबल्याने यंदा पावसाळ्याला उशीराने सुरूवात होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे मे महिन्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. जिल्ह्यातील मे महिन्यातील तापमान ४३ अंशापर्यंत गेले होते. मात्र २५ मे पासून नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात २ ते ३ अंशानी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. तो अंदाज यंदा खरा ठरत आहे. मागील शनिवारपासून जिल्ह्याच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून पारा ४३ अंशावरुन ४५.५ अंशावर पोहचला आहे. मागील पंधरा वीस वर्षांत ऐवढे तापमान पाहिले नसल्याने काही वयोवृध्द नागरिक बोलून दाखवित आहे. तर हवामान विभागाने ३० मे पर्यंत जिल्ह्यात आॅरेंज अलर्टचा इशारा दिला असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. मे महिन्यातील तापमान आधीचे सर्व रेकार्ड मोडीत नवीन उच्चांक गाठत असल्याने त्याचा दैनदिन कामांवर सुध्दा परिणाम होत आहे. उन्हाचे चटके सहन होत नसल्याने दुपारच्या वेळेस नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहे.त्यामुळे शहरातील रस्ते दुपारच्या वेळेस सामसुम असतात. वाढत्या तापमानाचा फटका शेती आणि मनरेगाच्या कामांना सुध्दा बसत आहे. शेतकरी पहाटेच शेतात पोहचून सकाळी १० वाजेपर्यंत शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करीत आहे. उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून डॉक्टर सुध्दा शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा व भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत आहे.कमी विद्युत दाबाची समस्या४पारा ४५ अंशावर पोहचल्याने उकाडा प्रचंड वाढला असून त्यापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिक कुलर, पंखे आणि एसीचा आधार घेत आहेत. परिणामी विजेच्या मागणीत अचानक वाढ झाली असून कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे. परिणामी कुलर,पंखे देखील काम करीत नसल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहे. अनेक नागरिकांनी वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याची तक्रार केली. मात्र त्याचा सुध्दा काहीच परिणाम झाला नसल्याने शहरवासीयांची समस्या कायम आहे.वेळापत्रकात बदल४वाढत्या तापमानाचा दैनदिन कामावर परिणाम होत आहे.त्यामुळे तापमान पाहून कामाचे वेळापत्रक अनेकजण तयार करीत असल्याचे चित्र आहे. शेती, मनरेगा आणि घराचे बांधकाम शक्यतो सकाळीच सुरू करुन दुपारच्या वेळेत विश्रांती घेतली जात आहे.शित पेयांची मागणी वाढली४मे महिन्यातील तापमान उच्चांक गाठत असल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे.त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी नागरिक ताक, मठ्ठा, उसाचे रस आणि इतर शितपेयांचा आधार घेत आहे. त्यामुळे शितपेयांच्या मागणीत वाढ झाली असून या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे.मागील सहा दिवसातील तापमान४मागील शुक्रवारपासून जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी ४३ अंश सेल्सिअस तर शनिवारी ४४, रविवारी ४४.४, सोमवारी ४४.८ आणि मंगळवारी ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर बुधवारी (दि.२९) पारा ४३.५ अंशावर गेला होता. त्यामुळे उकाडा कायम होता.

टॅग्स :Temperatureतापमान