शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

जिल्ह्यातील तापमानाने गाठला नवा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 23:50 IST

यंदा मे महिन्यातील तापमानाने उच्चांक गाठले आहे. जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मंगळवारी झाली. मागील २० वर्षांतील तापमानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे सर्वाधिक तापमान होय. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची चांगलीच होरपळ होत असून कुलर पंखे सुध्दा काम करीत नसल्याने संपूर्ण जिल्हावासीय उकाड्याने त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देमागील २० वर्षांत प्रथमच तापमानात वाढ : मे महिन्यातील रेकार्ड मोडले, जिल्हावासीय उकाड्याने हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा मे महिन्यातील तापमानाने उच्चांक गाठले आहे. जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मंगळवारी झाली. मागील २० वर्षांतील तापमानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे सर्वाधिक तापमान होय. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची चांगलीच होरपळ होत असून कुलर पंखे सुध्दा काम करीत नसल्याने संपूर्ण जिल्हावासीय उकाड्याने त्रस्त झाले आहेत.मान्सूनचे आगमन लांबल्याने यंदा पावसाळ्याला उशीराने सुरूवात होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे मे महिन्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. जिल्ह्यातील मे महिन्यातील तापमान ४३ अंशापर्यंत गेले होते. मात्र २५ मे पासून नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात २ ते ३ अंशानी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. तो अंदाज यंदा खरा ठरत आहे. मागील शनिवारपासून जिल्ह्याच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून पारा ४३ अंशावरुन ४५.५ अंशावर पोहचला आहे. मागील पंधरा वीस वर्षांत ऐवढे तापमान पाहिले नसल्याने काही वयोवृध्द नागरिक बोलून दाखवित आहे. तर हवामान विभागाने ३० मे पर्यंत जिल्ह्यात आॅरेंज अलर्टचा इशारा दिला असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. मे महिन्यातील तापमान आधीचे सर्व रेकार्ड मोडीत नवीन उच्चांक गाठत असल्याने त्याचा दैनदिन कामांवर सुध्दा परिणाम होत आहे. उन्हाचे चटके सहन होत नसल्याने दुपारच्या वेळेस नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहे.त्यामुळे शहरातील रस्ते दुपारच्या वेळेस सामसुम असतात. वाढत्या तापमानाचा फटका शेती आणि मनरेगाच्या कामांना सुध्दा बसत आहे. शेतकरी पहाटेच शेतात पोहचून सकाळी १० वाजेपर्यंत शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करीत आहे. उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून डॉक्टर सुध्दा शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा व भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत आहे.कमी विद्युत दाबाची समस्या४पारा ४५ अंशावर पोहचल्याने उकाडा प्रचंड वाढला असून त्यापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिक कुलर, पंखे आणि एसीचा आधार घेत आहेत. परिणामी विजेच्या मागणीत अचानक वाढ झाली असून कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे. परिणामी कुलर,पंखे देखील काम करीत नसल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहे. अनेक नागरिकांनी वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याची तक्रार केली. मात्र त्याचा सुध्दा काहीच परिणाम झाला नसल्याने शहरवासीयांची समस्या कायम आहे.वेळापत्रकात बदल४वाढत्या तापमानाचा दैनदिन कामावर परिणाम होत आहे.त्यामुळे तापमान पाहून कामाचे वेळापत्रक अनेकजण तयार करीत असल्याचे चित्र आहे. शेती, मनरेगा आणि घराचे बांधकाम शक्यतो सकाळीच सुरू करुन दुपारच्या वेळेत विश्रांती घेतली जात आहे.शित पेयांची मागणी वाढली४मे महिन्यातील तापमान उच्चांक गाठत असल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे.त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी नागरिक ताक, मठ्ठा, उसाचे रस आणि इतर शितपेयांचा आधार घेत आहे. त्यामुळे शितपेयांच्या मागणीत वाढ झाली असून या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे.मागील सहा दिवसातील तापमान४मागील शुक्रवारपासून जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी ४३ अंश सेल्सिअस तर शनिवारी ४४, रविवारी ४४.४, सोमवारी ४४.८ आणि मंगळवारी ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर बुधवारी (दि.२९) पारा ४३.५ अंशावर गेला होता. त्यामुळे उकाडा कायम होता.

टॅग्स :Temperatureतापमान