शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

समाजाला संघटित होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:46 IST

आपला देश विविधतेने नटला आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे राहतात. समाजातील लोकांचा विकास करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपापसात सहकार्य व प्रेम भावना निर्माण करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देसंजय पुराम : तेली समाज मेळावा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : आपला देश विविधतेने नटला आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे राहतात. समाजातील लोकांचा विकास करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपापसात सहकार्य व प्रेम भावना निर्माण करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे. त्यासाठी तेली समाजानेसुद्धा संघटित व्हावे, असे उद्गार तेली समाज मेळाव्याप्रसंगी आ. संजय पुराम यांनी काढले.विदर्भ तेली समाज महासंघ आमगावच्या वतीने आदर्श विद्यालयात रविवारी तेली समाज मेळावा व विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आला. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते.उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष बी.एम. करमकर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून आयएएस मिशन अमरावतीचे संचालक नरेशचंद्र काथोले, नागपूरचे तेली समाज संशोधक डॉ. महेंद्र धावडे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. केशव मानकर, शिवाजी संकुलचे संचालक झामसिंग येरणे, पं.स. सदस्य जसवंत बावणकर, प्रा. सुभाष आकरे, प्राचार्य सागर काटेखाये, कालीमाटीचे लिलाधर गिºहेपुंजे, शंकरराव क्षीरसागर, श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव सुकचंद येरणे, स्वागताध्यक्ष भास्कर येरणे, प्रा. किशोर निखाडे, डॉ. बावणकर, भेलावे, प्रेम भेलावे उपस्थित होते.तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.दरम्यान विद्यार्थ्यांसाठी रांगोली, भावगीत, नृत्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या. विविध गीतांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकरिता करावयाची तयारी, या विषयावर नरेशचंद्र काथोले यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, नेमके अभ्यासाचे तंत्र कसे विकसित करावे याबाबत मार्गदर्शन केले. दिवसेंदिवस सामाजिक व राजकीय परिस्थिती बदलत असून ओबीसींनी संघटित होवून आपल्या हक्कासाठी व आरक्षणासाठी लढा देण्याची गरज असल्याचे मत प्रा. धावडे यांनी व्यक्त केले.दरम्यान तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी व अनेक गावांतील नवनियुक्त सरपंच यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. पोलीस विभागातील जयंत हुकरे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत स्वागताध्यक्ष भास्कर येरणे यांनी केले.प्रास्ताविक आमगाव शाखेचे तालुकाध्यक्ष सोमेश्वर पडोळे यांनी मांडले. संचालन प्रा. भेलावे यांनी केले. आभार कुवरलाल कुरंजेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी किशोर निखाडे, राजीव वंजारी, जानकीप्रसाद हटवार, विजय भुसारी, भाऊराव हटवार, जगदीश बडवाईक, जयंत उखरे, महेश वैद्य, आनंद येरणे, गोवर्धन वैरागडे, रामकृष्ण भेलावे, घनशाम साठवणे, प्रा. जिभकाटे, मनोहर बावनकर, उमेश आगाशे व तेली समाजाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.