शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

दीर्घकालीन उपाययोजनांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2016 01:55 IST

दुष्काळी परिस्थितीशी लडण्यासाठी सरकार तात्पुरता पाणी पुरवठा व अस्थायी शिबिर लावून जनतेत स्वस्त लोकप्रियता लुटण्याचे प्रयत्न करीत आहे.

गोपालदास अग्रवाल : दुष्काळी परिस्थितीवर विधानसभेत केली मागणीगोंदिया : दुष्काळी परिस्थितीशी लडण्यासाठी सरकार तात्पुरता पाणी पुरवठा व अस्थायी शिबिर लावून जनतेत स्वस्त लोकप्रियता लुटण्याचे प्रयत्न करीत आहे. मात्र दुष्काळी परिस्थिशी लडण्यासाठी सरकारने ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली. राज्य विधानसभेच्या बजेट सत्रात दुष्काळी परिस्थितीवरील चर्चेत ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, राज्यात सरकारच्या दृढमूल नीतींमुळे ३२०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर शेकडो नागरिक दररोज आपले गाव सोडून शहराकडे जात आहेत. यामुळे शहरातील जलसंकट गंभीर होत चालले आहे. मात्र सरकारी अधिकारी मानवीय दृष्टिकोन सोडून फक्त शासन परिपत्रकाचे पालन करून आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा देखावा करीत आहे. दुष्काळावर नियंत्रण मिळवायचे असल्यास प्रत्येक तालुकास्तरावर निर्णय घेऊन त्वरीत कारवाई करण्याचे अधिकार दिले पाहिजे असल्याची मागणिही त्यांना केली. त्याचप्रकारे पूर्व विदर्भात पाणी टंचाई नसून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात ५८ हजार मजूर रोजगार हमी योजनेत कार्यरत आहेत. गंभीर गोष्ट अशी की, दोन मजली घर असणारे शेतकरीही रोहयोच्या कामांवर जात आहेत. ५२-५५ टक्के आणेवारी असलेले गावही पूर्णपणे दुष्काळग्रस्त घोषीत झाले नाहीत. तर २०० रूपयांचा बोनसही शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता मधातील दलाल व व्यापारी खात असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही आमदार अग्रवाल यांनी केली. (शहर प्रतिनिधी)