शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

साहित्यातून परिवर्तनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 20:48 IST

पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनात परिसंवादाची एक वेगळीच चर्चा घडून आली. खरे साहित्य हे खेड्या पाड्यातच प्रामुख्याने रुजत आहे. साहित्य समाजाचा आरसा असून समाज प्रबोधनाचे मुख्य कार्य करताना पाहण्यास मिळते. म्हणून साहित्यातून परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे मत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुरेश खोब्रागडे : परिवर्तनशील साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनात परिसंवादाची एक वेगळीच चर्चा घडून आली. खरे साहित्य हे खेड्या पाड्यातच प्रामुख्याने रुजत आहे. साहित्य समाजाचा आरसा असून समाज प्रबोधनाचे मुख्य कार्य करताना पाहण्यास मिळते. म्हणून साहित्यातून परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे मत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी व्यक्त केले.पाचवे परिवर्तनशिल साहित्य संमेलन शनिवारी (दि.२६) पार पडले. या वेळी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. प्रा. टी.एस. माटे, इंजि. प्रा. संजय मगर, प्रा. अनिल कानेकर यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला होता. संविधान मुल्यांची जोपासना करणाऱ्या साहित्याची समाजाला गरज आहे. या विषयावर सर्व सहभागी मान्यवरांनी महाचर्चा घडवून आणली. प्रा. माटे म्हणाले, संविधानाच्या आधाराशिवाय माणूस आपली गरज आणि स्वाभीमानाचे जीवन जगू शकत नाही. संविधानच माणसाला मोठे करण्याचे काम करीत आहे. प्रा. मगर म्हणाले संविधानाची मुल्य, अधिकार, कर्तव्ये आणि अभिव्यक्ती ही समाजाच्या प्रत्येक घटकांना तारते. त्यांची रक्षा करते. वंचिताना बोलते, चालते करते.संविधानाच्या विषयाला हात घालत प्रा. कानेकर म्हणाले सर्व सामान्य माणसाला वर उचलून धरण्याचे आणि कसे जगावे हे शिकविण्याचे काम संविधानाने केले. माणुसकी ही संविधानाशिवाय कोणतेही ग्रंथ शिकवू शकत नाही असे मत व्यक्त केले. खोब्रागडे म्हणाले,संविधानाने समाजाचे परिवर्तन केले.संविधान हा महान ग्रंथ असून वास्तव माणसाचे सत्य मांडते. प्राचीन काळाच्या सर्व परंपरा बदलवून आज परिवर्तन घडविण्याची ताकद संविधान समाजाला व साहित्याला देत असल्याचे सांगितले. या सत्राचे संचालन शिक्षक अनिल मेश्राम यांनी केले तर आभार डॉ.माधवी झोडे यांनी मानले.