शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

साहित्यातून परिवर्तनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 20:48 IST

पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनात परिसंवादाची एक वेगळीच चर्चा घडून आली. खरे साहित्य हे खेड्या पाड्यातच प्रामुख्याने रुजत आहे. साहित्य समाजाचा आरसा असून समाज प्रबोधनाचे मुख्य कार्य करताना पाहण्यास मिळते. म्हणून साहित्यातून परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे मत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुरेश खोब्रागडे : परिवर्तनशील साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनात परिसंवादाची एक वेगळीच चर्चा घडून आली. खरे साहित्य हे खेड्या पाड्यातच प्रामुख्याने रुजत आहे. साहित्य समाजाचा आरसा असून समाज प्रबोधनाचे मुख्य कार्य करताना पाहण्यास मिळते. म्हणून साहित्यातून परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे मत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी व्यक्त केले.पाचवे परिवर्तनशिल साहित्य संमेलन शनिवारी (दि.२६) पार पडले. या वेळी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. प्रा. टी.एस. माटे, इंजि. प्रा. संजय मगर, प्रा. अनिल कानेकर यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला होता. संविधान मुल्यांची जोपासना करणाऱ्या साहित्याची समाजाला गरज आहे. या विषयावर सर्व सहभागी मान्यवरांनी महाचर्चा घडवून आणली. प्रा. माटे म्हणाले, संविधानाच्या आधाराशिवाय माणूस आपली गरज आणि स्वाभीमानाचे जीवन जगू शकत नाही. संविधानच माणसाला मोठे करण्याचे काम करीत आहे. प्रा. मगर म्हणाले संविधानाची मुल्य, अधिकार, कर्तव्ये आणि अभिव्यक्ती ही समाजाच्या प्रत्येक घटकांना तारते. त्यांची रक्षा करते. वंचिताना बोलते, चालते करते.संविधानाच्या विषयाला हात घालत प्रा. कानेकर म्हणाले सर्व सामान्य माणसाला वर उचलून धरण्याचे आणि कसे जगावे हे शिकविण्याचे काम संविधानाने केले. माणुसकी ही संविधानाशिवाय कोणतेही ग्रंथ शिकवू शकत नाही असे मत व्यक्त केले. खोब्रागडे म्हणाले,संविधानाने समाजाचे परिवर्तन केले.संविधान हा महान ग्रंथ असून वास्तव माणसाचे सत्य मांडते. प्राचीन काळाच्या सर्व परंपरा बदलवून आज परिवर्तन घडविण्याची ताकद संविधान समाजाला व साहित्याला देत असल्याचे सांगितले. या सत्राचे संचालन शिक्षक अनिल मेश्राम यांनी केले तर आभार डॉ.माधवी झोडे यांनी मानले.