शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

साहित्यातून परिवर्तनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 20:48 IST

पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनात परिसंवादाची एक वेगळीच चर्चा घडून आली. खरे साहित्य हे खेड्या पाड्यातच प्रामुख्याने रुजत आहे. साहित्य समाजाचा आरसा असून समाज प्रबोधनाचे मुख्य कार्य करताना पाहण्यास मिळते. म्हणून साहित्यातून परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे मत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुरेश खोब्रागडे : परिवर्तनशील साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनात परिसंवादाची एक वेगळीच चर्चा घडून आली. खरे साहित्य हे खेड्या पाड्यातच प्रामुख्याने रुजत आहे. साहित्य समाजाचा आरसा असून समाज प्रबोधनाचे मुख्य कार्य करताना पाहण्यास मिळते. म्हणून साहित्यातून परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे मत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी व्यक्त केले.पाचवे परिवर्तनशिल साहित्य संमेलन शनिवारी (दि.२६) पार पडले. या वेळी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. प्रा. टी.एस. माटे, इंजि. प्रा. संजय मगर, प्रा. अनिल कानेकर यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला होता. संविधान मुल्यांची जोपासना करणाऱ्या साहित्याची समाजाला गरज आहे. या विषयावर सर्व सहभागी मान्यवरांनी महाचर्चा घडवून आणली. प्रा. माटे म्हणाले, संविधानाच्या आधाराशिवाय माणूस आपली गरज आणि स्वाभीमानाचे जीवन जगू शकत नाही. संविधानच माणसाला मोठे करण्याचे काम करीत आहे. प्रा. मगर म्हणाले संविधानाची मुल्य, अधिकार, कर्तव्ये आणि अभिव्यक्ती ही समाजाच्या प्रत्येक घटकांना तारते. त्यांची रक्षा करते. वंचिताना बोलते, चालते करते.संविधानाच्या विषयाला हात घालत प्रा. कानेकर म्हणाले सर्व सामान्य माणसाला वर उचलून धरण्याचे आणि कसे जगावे हे शिकविण्याचे काम संविधानाने केले. माणुसकी ही संविधानाशिवाय कोणतेही ग्रंथ शिकवू शकत नाही असे मत व्यक्त केले. खोब्रागडे म्हणाले,संविधानाने समाजाचे परिवर्तन केले.संविधान हा महान ग्रंथ असून वास्तव माणसाचे सत्य मांडते. प्राचीन काळाच्या सर्व परंपरा बदलवून आज परिवर्तन घडविण्याची ताकद संविधान समाजाला व साहित्याला देत असल्याचे सांगितले. या सत्राचे संचालन शिक्षक अनिल मेश्राम यांनी केले तर आभार डॉ.माधवी झोडे यांनी मानले.