शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

साहित्यातून परिवर्तनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 20:48 IST

पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनात परिसंवादाची एक वेगळीच चर्चा घडून आली. खरे साहित्य हे खेड्या पाड्यातच प्रामुख्याने रुजत आहे. साहित्य समाजाचा आरसा असून समाज प्रबोधनाचे मुख्य कार्य करताना पाहण्यास मिळते. म्हणून साहित्यातून परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे मत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुरेश खोब्रागडे : परिवर्तनशील साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनात परिसंवादाची एक वेगळीच चर्चा घडून आली. खरे साहित्य हे खेड्या पाड्यातच प्रामुख्याने रुजत आहे. साहित्य समाजाचा आरसा असून समाज प्रबोधनाचे मुख्य कार्य करताना पाहण्यास मिळते. म्हणून साहित्यातून परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे मत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी व्यक्त केले.पाचवे परिवर्तनशिल साहित्य संमेलन शनिवारी (दि.२६) पार पडले. या वेळी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. प्रा. टी.एस. माटे, इंजि. प्रा. संजय मगर, प्रा. अनिल कानेकर यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला होता. संविधान मुल्यांची जोपासना करणाऱ्या साहित्याची समाजाला गरज आहे. या विषयावर सर्व सहभागी मान्यवरांनी महाचर्चा घडवून आणली. प्रा. माटे म्हणाले, संविधानाच्या आधाराशिवाय माणूस आपली गरज आणि स्वाभीमानाचे जीवन जगू शकत नाही. संविधानच माणसाला मोठे करण्याचे काम करीत आहे. प्रा. मगर म्हणाले संविधानाची मुल्य, अधिकार, कर्तव्ये आणि अभिव्यक्ती ही समाजाच्या प्रत्येक घटकांना तारते. त्यांची रक्षा करते. वंचिताना बोलते, चालते करते.संविधानाच्या विषयाला हात घालत प्रा. कानेकर म्हणाले सर्व सामान्य माणसाला वर उचलून धरण्याचे आणि कसे जगावे हे शिकविण्याचे काम संविधानाने केले. माणुसकी ही संविधानाशिवाय कोणतेही ग्रंथ शिकवू शकत नाही असे मत व्यक्त केले. खोब्रागडे म्हणाले,संविधानाने समाजाचे परिवर्तन केले.संविधान हा महान ग्रंथ असून वास्तव माणसाचे सत्य मांडते. प्राचीन काळाच्या सर्व परंपरा बदलवून आज परिवर्तन घडविण्याची ताकद संविधान समाजाला व साहित्याला देत असल्याचे सांगितले. या सत्राचे संचालन शिक्षक अनिल मेश्राम यांनी केले तर आभार डॉ.माधवी झोडे यांनी मानले.