शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

बहुजन समाजाने हक्कासाठी संघटित होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:23 IST

बोंडगावदेवी हे गाव पवित्र अशा जागृत मॉ गंगा जमुना मातेचे देवस्थान आहे. गावात विविध जाती, पंथ व धर्माचे लोक आपुलकीने गुण्या गोविंदाने राहत आहेत.

ठळक मुद्देनाना पटोले : गंगा जमुना देवस्थानात स्रेहमिलन कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतबोंडगावदेवी : बोंडगावदेवी हे गाव पवित्र अशा जागृत मॉ गंगा जमुना मातेचे देवस्थान आहे. गावात विविध जाती, पंथ व धर्माचे लोक आपुलकीने गुण्या गोविंदाने राहत आहेत. धार्मिकतेची तशीच राजकीय कारकीर्दीची नाळ गावासोबत जोडली जात आहे. गावचे पावित्र्य कायम ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याची परंपरा वाढीस लागणार नाही. यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून गाव एकसंघ करुन सौहार्दपूर्ण वातावरण निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. धर्माच्या नावावर लक्ष केंद्रीत न करता बहुजन समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी संघटित होणे आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.येथील मॉ गंगा जमुना देवस्थानच्यावतीने देवस्थान परिसरात परंपरेनुसार चालत असलेल्या गावातील सर्वधर्म समभाव चहापान व होळीमिलन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी माजी जि.प.सदस्य डॉ. शामकांत नेवारे, माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, आनंदकुमार जांभुळकर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष तुळशीदास बोरकर, नित्यानंद पालीवाल, मोरेश्वर बनपूरकर, माजी सरपंच रामकृष्ण मेश्राम, भाग्यवान फुल्लुके, ताराचंद सुखदेवे, पुंडलिक भैसारे, दयाराम बारसागडे, संतोष टेंभूर्णे, लाला मेश्राम, ग्रा.पं. सदस्य साधू मेश्राम, अशोक रामटेके, देवस्थानचे मुख्य पुजारी हेमराज मानकर उपस्थित होते.मागील २० फेब्रुवारी २०१६ मध्ये गावातील हिंदू व बौद्धांमध्ये जागेच्या प्रकरणावरुन सामाजिक तेढ निर्माण होऊन एकोप्याने राहणारा गाव दुभंगला. दोन समाजामधील वाद पराकोटीला गेला. याला मूठमाती देऊन गावात समतेचा संदेश देण्यासाठी समस्त गावकरी एकदिलाने राहण्यासाठीच होळी मिलनाचे औचित्य साधून सर्वधर्म समभाव चहापान कार्यक्रम आयोजित करुन नाना पटोले यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. पुढे बोलताना पटोले यांनी, सामाजिक तेढ दोन्ही समाजाला घातक आहे. त्यामुळे समाजाची अपरिमित हाणी होऊन समाजाच्या विकासाला बाधा निर्माण होते. सर्वांनी गुण्यागोविंदाने राहिल्यानेच कुटुंबासह गावाच्या विकासात भर पडते. वादात सामाजिक जनता नाहक भरडली जाते. धर्माच्या नावावर वाद निर्माण करुन गालबोट लागते.समाजातील कटूता दूर सारुन समस्त गावकऱ्यांनी एकत्र येवून सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. संचालन डॉ. शामकांत नेवारे यांनी केले. आभार सुरेंद्रकुमार ठवरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तुळशीदास बोरकर, हेमराज मानकर, कुंडलिक मानकर, मुकेश मानकर यांनी सहकार्य केले.