शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन समाजाने हक्कासाठी संघटित होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:23 IST

बोंडगावदेवी हे गाव पवित्र अशा जागृत मॉ गंगा जमुना मातेचे देवस्थान आहे. गावात विविध जाती, पंथ व धर्माचे लोक आपुलकीने गुण्या गोविंदाने राहत आहेत.

ठळक मुद्देनाना पटोले : गंगा जमुना देवस्थानात स्रेहमिलन कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतबोंडगावदेवी : बोंडगावदेवी हे गाव पवित्र अशा जागृत मॉ गंगा जमुना मातेचे देवस्थान आहे. गावात विविध जाती, पंथ व धर्माचे लोक आपुलकीने गुण्या गोविंदाने राहत आहेत. धार्मिकतेची तशीच राजकीय कारकीर्दीची नाळ गावासोबत जोडली जात आहे. गावचे पावित्र्य कायम ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याची परंपरा वाढीस लागणार नाही. यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून गाव एकसंघ करुन सौहार्दपूर्ण वातावरण निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. धर्माच्या नावावर लक्ष केंद्रीत न करता बहुजन समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी संघटित होणे आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.येथील मॉ गंगा जमुना देवस्थानच्यावतीने देवस्थान परिसरात परंपरेनुसार चालत असलेल्या गावातील सर्वधर्म समभाव चहापान व होळीमिलन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी माजी जि.प.सदस्य डॉ. शामकांत नेवारे, माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, आनंदकुमार जांभुळकर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष तुळशीदास बोरकर, नित्यानंद पालीवाल, मोरेश्वर बनपूरकर, माजी सरपंच रामकृष्ण मेश्राम, भाग्यवान फुल्लुके, ताराचंद सुखदेवे, पुंडलिक भैसारे, दयाराम बारसागडे, संतोष टेंभूर्णे, लाला मेश्राम, ग्रा.पं. सदस्य साधू मेश्राम, अशोक रामटेके, देवस्थानचे मुख्य पुजारी हेमराज मानकर उपस्थित होते.मागील २० फेब्रुवारी २०१६ मध्ये गावातील हिंदू व बौद्धांमध्ये जागेच्या प्रकरणावरुन सामाजिक तेढ निर्माण होऊन एकोप्याने राहणारा गाव दुभंगला. दोन समाजामधील वाद पराकोटीला गेला. याला मूठमाती देऊन गावात समतेचा संदेश देण्यासाठी समस्त गावकरी एकदिलाने राहण्यासाठीच होळी मिलनाचे औचित्य साधून सर्वधर्म समभाव चहापान कार्यक्रम आयोजित करुन नाना पटोले यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. पुढे बोलताना पटोले यांनी, सामाजिक तेढ दोन्ही समाजाला घातक आहे. त्यामुळे समाजाची अपरिमित हाणी होऊन समाजाच्या विकासाला बाधा निर्माण होते. सर्वांनी गुण्यागोविंदाने राहिल्यानेच कुटुंबासह गावाच्या विकासात भर पडते. वादात सामाजिक जनता नाहक भरडली जाते. धर्माच्या नावावर वाद निर्माण करुन गालबोट लागते.समाजातील कटूता दूर सारुन समस्त गावकऱ्यांनी एकत्र येवून सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. संचालन डॉ. शामकांत नेवारे यांनी केले. आभार सुरेंद्रकुमार ठवरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तुळशीदास बोरकर, हेमराज मानकर, कुंडलिक मानकर, मुकेश मानकर यांनी सहकार्य केले.