शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

गरज २००० पाईपची मागविले फक्त ९००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:30 IST

जिल्ह्यातील शेकडो बोअरवेल नादुरूस्त असून त्यांच्या दुरूस्तीसाठी दोन हजार पाईची गरज होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ नऊशे पाईप खरेदी केले.

ठळक मुद्देपाणी टंचाई उपाययोजनेत प्रशासन फेल : गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शेकडो बोअरवेल नादुरूस्त असून त्यांच्या दुरूस्तीसाठी दोन हजार पाईची गरज होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ नऊशे पाईप खरेदी केले. परिणामी अनेक गावांमधील बोअरवेल बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची पाळी आली आहे. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात प्रशासन पूर्णपणे फेल झाले आहे.जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी जलाशयांमध्ये केवळ १५ ते २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भूजल पातळीत सुध्दा दोन ते तीन मीटरने घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्याची खालावलेली भूजल पातळी पाहता यंदा उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाला दिलेल्या अहवालातून वर्तविली होती. या अहवालानंतर जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखड्यात दर्शविलेल्या ४०० वर गावांमध्ये पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करणे अपेक्षीत होते. मात्र प्रशासनाने मार्च महिन्याच्या अखेरीस पाणी टंचाई निवारणाच्या कामाला सुरूवात केली. ग्रामीण भागात सार्वजनिक विहिरी, बोअरवेल, पाणी पुरवठा योजना हेच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत. मात्र जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यात नादुरस्त असलेल्या बोअरवेलची कामे उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी सुरूवात केली नाही. परिणामी गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली. जिल्ह्यातील नादुरुस्त बोअरवेलच्या दुरुस्तीसाठी सुटे साहित्य व २ हजार पाईपची मागणी जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांनी जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे नोंदविली होती. मात्र जिल्हा परिषदेने आपली हुशारी दाखवित केवळ ९०० पाईप मागविले.त्यामुळे अर्ध्या गावांमधील बोअरवेल दुरूस्तीची कामे होऊ शकली नाही. गावातील बोअरवेल बंद असल्याने महिलांना पहाटेपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.टंचाईग्रस्त गावांची संख्या दाखविली कमीजिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४८ गावे वगळता सर्वच तालुक्यात पाणी टंचाईची समस्या आहे. महसूल विभागाने जाहीर केलेल्या पैसेवारीच्या अहवालावरुन सुध्दा जिल्ह्यातील ४०० वर गावांमध्ये पाणीे टंचाईची समस्या आहे. मात्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने केवळ ३३४ गावांमध्ये पाणी टंचाई असल्याचे दाखवित पाणी टंचाईची समस्या सौम्य असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकारजिल्ह्यातील बंद असलेल्या बोअरवेलची दुरूस्ती व विद्युत देयकाअभावी बंद असलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती. मात्र यापैकी कुठलेही काम किंवा उपाय योेजना जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने केल्या नाही. परिणामी गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना सुरू करण्याची गरज होती. मात्र प्रशासनाने जेव्हा समस्या गंभीर होईल, तेव्हा कामाला लागू अशी भूमिका घेतली आहे. तहान लागल्यावर पाणी खोदण्याचा प्रकार जिल्हा प्रशासनाबाबत दिसून येत आहे.जिल्हाधिकारी साहेब कुठे?जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर असून ग्रामीण भागातील नागरिकांची ओरड वाढत आहे. पालकमंत्री सुध्दा आढावा बैठकीत पाणी टंचाईवर उपाय योजना करण्याचे निर्देश देतात. मात्र प्रत्यक्षात उपाय योजना केवळ कागदावरच सुरू आहे. ही सर्व परिस्थिती जिल्हाधिकाºयांना माहिती असून सुध्दा त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या मुद्दावर जिल्हाधिकारी साहेब कुठे असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.

टॅग्स :Waterपाणी