शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
4
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
5
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
6
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
7
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
8
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
9
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
10
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
11
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
12
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
13
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
14
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
15
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
16
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
17
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
18
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
19
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
20
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका

गरज २००० पाईपची मागविले फक्त ९००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:30 IST

जिल्ह्यातील शेकडो बोअरवेल नादुरूस्त असून त्यांच्या दुरूस्तीसाठी दोन हजार पाईची गरज होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ नऊशे पाईप खरेदी केले.

ठळक मुद्देपाणी टंचाई उपाययोजनेत प्रशासन फेल : गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शेकडो बोअरवेल नादुरूस्त असून त्यांच्या दुरूस्तीसाठी दोन हजार पाईची गरज होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ नऊशे पाईप खरेदी केले. परिणामी अनेक गावांमधील बोअरवेल बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची पाळी आली आहे. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात प्रशासन पूर्णपणे फेल झाले आहे.जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी जलाशयांमध्ये केवळ १५ ते २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भूजल पातळीत सुध्दा दोन ते तीन मीटरने घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्याची खालावलेली भूजल पातळी पाहता यंदा उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाला दिलेल्या अहवालातून वर्तविली होती. या अहवालानंतर जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखड्यात दर्शविलेल्या ४०० वर गावांमध्ये पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करणे अपेक्षीत होते. मात्र प्रशासनाने मार्च महिन्याच्या अखेरीस पाणी टंचाई निवारणाच्या कामाला सुरूवात केली. ग्रामीण भागात सार्वजनिक विहिरी, बोअरवेल, पाणी पुरवठा योजना हेच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत. मात्र जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यात नादुरस्त असलेल्या बोअरवेलची कामे उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी सुरूवात केली नाही. परिणामी गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली. जिल्ह्यातील नादुरुस्त बोअरवेलच्या दुरुस्तीसाठी सुटे साहित्य व २ हजार पाईपची मागणी जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांनी जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे नोंदविली होती. मात्र जिल्हा परिषदेने आपली हुशारी दाखवित केवळ ९०० पाईप मागविले.त्यामुळे अर्ध्या गावांमधील बोअरवेल दुरूस्तीची कामे होऊ शकली नाही. गावातील बोअरवेल बंद असल्याने महिलांना पहाटेपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.टंचाईग्रस्त गावांची संख्या दाखविली कमीजिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४८ गावे वगळता सर्वच तालुक्यात पाणी टंचाईची समस्या आहे. महसूल विभागाने जाहीर केलेल्या पैसेवारीच्या अहवालावरुन सुध्दा जिल्ह्यातील ४०० वर गावांमध्ये पाणीे टंचाईची समस्या आहे. मात्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने केवळ ३३४ गावांमध्ये पाणी टंचाई असल्याचे दाखवित पाणी टंचाईची समस्या सौम्य असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकारजिल्ह्यातील बंद असलेल्या बोअरवेलची दुरूस्ती व विद्युत देयकाअभावी बंद असलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती. मात्र यापैकी कुठलेही काम किंवा उपाय योेजना जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने केल्या नाही. परिणामी गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना सुरू करण्याची गरज होती. मात्र प्रशासनाने जेव्हा समस्या गंभीर होईल, तेव्हा कामाला लागू अशी भूमिका घेतली आहे. तहान लागल्यावर पाणी खोदण्याचा प्रकार जिल्हा प्रशासनाबाबत दिसून येत आहे.जिल्हाधिकारी साहेब कुठे?जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर असून ग्रामीण भागातील नागरिकांची ओरड वाढत आहे. पालकमंत्री सुध्दा आढावा बैठकीत पाणी टंचाईवर उपाय योजना करण्याचे निर्देश देतात. मात्र प्रत्यक्षात उपाय योजना केवळ कागदावरच सुरू आहे. ही सर्व परिस्थिती जिल्हाधिकाºयांना माहिती असून सुध्दा त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या मुद्दावर जिल्हाधिकारी साहेब कुठे असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.

टॅग्स :Waterपाणी