शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

गरज २००० पाईपची मागविले फक्त ९००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:30 IST

जिल्ह्यातील शेकडो बोअरवेल नादुरूस्त असून त्यांच्या दुरूस्तीसाठी दोन हजार पाईची गरज होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ नऊशे पाईप खरेदी केले.

ठळक मुद्देपाणी टंचाई उपाययोजनेत प्रशासन फेल : गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शेकडो बोअरवेल नादुरूस्त असून त्यांच्या दुरूस्तीसाठी दोन हजार पाईची गरज होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ नऊशे पाईप खरेदी केले. परिणामी अनेक गावांमधील बोअरवेल बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची पाळी आली आहे. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात प्रशासन पूर्णपणे फेल झाले आहे.जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी जलाशयांमध्ये केवळ १५ ते २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भूजल पातळीत सुध्दा दोन ते तीन मीटरने घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्याची खालावलेली भूजल पातळी पाहता यंदा उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाला दिलेल्या अहवालातून वर्तविली होती. या अहवालानंतर जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखड्यात दर्शविलेल्या ४०० वर गावांमध्ये पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करणे अपेक्षीत होते. मात्र प्रशासनाने मार्च महिन्याच्या अखेरीस पाणी टंचाई निवारणाच्या कामाला सुरूवात केली. ग्रामीण भागात सार्वजनिक विहिरी, बोअरवेल, पाणी पुरवठा योजना हेच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत. मात्र जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यात नादुरस्त असलेल्या बोअरवेलची कामे उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी सुरूवात केली नाही. परिणामी गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली. जिल्ह्यातील नादुरुस्त बोअरवेलच्या दुरुस्तीसाठी सुटे साहित्य व २ हजार पाईपची मागणी जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांनी जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे नोंदविली होती. मात्र जिल्हा परिषदेने आपली हुशारी दाखवित केवळ ९०० पाईप मागविले.त्यामुळे अर्ध्या गावांमधील बोअरवेल दुरूस्तीची कामे होऊ शकली नाही. गावातील बोअरवेल बंद असल्याने महिलांना पहाटेपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.टंचाईग्रस्त गावांची संख्या दाखविली कमीजिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४८ गावे वगळता सर्वच तालुक्यात पाणी टंचाईची समस्या आहे. महसूल विभागाने जाहीर केलेल्या पैसेवारीच्या अहवालावरुन सुध्दा जिल्ह्यातील ४०० वर गावांमध्ये पाणीे टंचाईची समस्या आहे. मात्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने केवळ ३३४ गावांमध्ये पाणी टंचाई असल्याचे दाखवित पाणी टंचाईची समस्या सौम्य असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकारजिल्ह्यातील बंद असलेल्या बोअरवेलची दुरूस्ती व विद्युत देयकाअभावी बंद असलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती. मात्र यापैकी कुठलेही काम किंवा उपाय योेजना जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने केल्या नाही. परिणामी गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना सुरू करण्याची गरज होती. मात्र प्रशासनाने जेव्हा समस्या गंभीर होईल, तेव्हा कामाला लागू अशी भूमिका घेतली आहे. तहान लागल्यावर पाणी खोदण्याचा प्रकार जिल्हा प्रशासनाबाबत दिसून येत आहे.जिल्हाधिकारी साहेब कुठे?जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर असून ग्रामीण भागातील नागरिकांची ओरड वाढत आहे. पालकमंत्री सुध्दा आढावा बैठकीत पाणी टंचाईवर उपाय योजना करण्याचे निर्देश देतात. मात्र प्रत्यक्षात उपाय योजना केवळ कागदावरच सुरू आहे. ही सर्व परिस्थिती जिल्हाधिकाºयांना माहिती असून सुध्दा त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या मुद्दावर जिल्हाधिकारी साहेब कुठे असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.

टॅग्स :Waterपाणी