शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘नवतपा’ जिल्ह्याला तापवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 20:47 IST

उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रवीराज आता चांगलेच तापू लागले असून अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या शनिवारपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे. आताच पारा ४३ अंश सेल्सिअस पार झाला असताना नवतपात तर काय होणार याची कल्पना करूनच घाम फुटत आहे.

ठळक मुद्दे२५ पासून होणार सुरूवात : जिल्ह्याचा पारा ४३ अंश पार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रवीराज आता चांगलेच तापू लागले असून अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या शनिवारपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे. आताच पारा ४३ अंश सेल्सिअस पार झाला असताना नवतपात तर काय होणार याची कल्पना करूनच घाम फुटत आहे.उन्हाळ््याच्या अवघ्या चार महिन्यांतील सर्वाधिक गरमी नऊ दिवसांत पडते असे म्हटले जाते व त्यालाच ‘नवतपा’ म्हणतात. नवतपामध्ये रोहिणी नक्षत्र लागत असून रवीराज आपली आग ओकत असल्याने हे नऊ दिवस चांगलेच तापतात. एक प्रकारे सुर्यदेव पृथ्वीच्या अगदी जवळ आल्याचे वाटू लागते. यंदा येत्या शनिवारपासून (दि.२५) २ जून पर्यंत नवतपा लागत आहे. त्यामुळे २५ तारखेपासूनचे नऊ दिवस कसे असणार याची कल्पना करताच अंगाची आग होत आहे.यंदाचा उन्हाळा अवकाळी पावसाच्या वारंवारच्या हजेरीमुळे कसा तरी निघून गेला. मात्र मे काही सुचू देत नसल्याच अनूभव या २० दिवसांत आला व उन्हाळयाचे चटके चाखायला मिळत आहे. उन्हाच्या तिव्रतेमुळे पारा ४३.५ अंश सेल्सिअस पार करीत आहे. उन्हाची ही सरशी बघता घरातून बाहेर निघणे कठिण झाले आहे. उन्ह वाढतच चालल्याने गरम हवेच्या लाटा वाहत असून अंगाची लाही-लाही होत आहे. परिणामी दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. उन्हामुळे नागरिक घराबाहेर निघणे टाळत असून सायंकाळी कामे आटोपत असल्याचे दिसत आहे.उन्हाच्या दाहकतेमुळे सायंकाळीही गरम लाटा लागत आहे. यातून उकाडा किती याचा अनूभव येत आहे. अशात नवतपा आणखी किती भाजणार आहे याची धसकी सर्वांनी घेतली आहे. नवतपाचे हे दिवस एकदाचे निघून जावे याचीच सर्व वाट बघत आहेत.एसी व कूलर झाले फेलउन्हाळ््यापासून मुक्ती मिळावी यासाठी एसी व कूलरचा सहारा घेतला जात आहे. मात्र उष्णता एवढी आहे की त्यापुढे एसी व कूलरसुद्धा फेल ठरत आहे. उष्ण हवेच्या लाटांमुळे एसी व कूलरची हवा उष्ण होत आहे. मात्र काही केल्या गरमीपासून मुक्तता मिळणे कठिण झाले आहे. तर घरांवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांतूनही अंगाला भाजून टाकणार एवढे गरम पाणी येत आहे. त्यामुळे दिवसभराच्या उष्णता व घाम यामुळे चिपचिप झालेल्या अंगाला धुवून काढण्यासाठी सायंकाळची आंघोळही कठिण झाली आहे.

टॅग्स :Temperatureतापमान