शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

नवेगावबांधचे पाणी बाराभाटीला पोहोचतच नाही

By admin | Updated: February 26, 2015 01:00 IST

उदरनिर्वाहासाठी नोकरी, धंद्यासोबतच शेती हा या परिसरातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे.

बाराभाटी : उदरनिर्वाहासाठी नोकरी, धंद्यासोबतच शेती हा या परिसरातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे. परंतु शेती पिकविण्याकरिता उन्हाळ्यात मिळणारे नवेगावबांध तलावाचे पाणी बाराभाटी परिसरात पोहोचतच नाही. पाणी वाहून नेणारे कालवेच नादुरूस्त असल्यामुळे शेतीला पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. जिल्ह्यात गोठणगावबांध इटियाडोहप्रमाणे नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान हे नावारूपास आले आहेत. या तलावांच्या भरवशावर उन्हाळी धान पिकविला जातो. या भात लागवडीसाठी दोन्ही तलावांच्यामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. म्हणजेच गोठणगाव इटियाडोह धरणाचे पाणी गोंदिया जिल्ह्यासोबत गडचिरोली जिल्ह्याचा काही भागातही पोहोचतो व शेती पिकविली जाते. त्याचबरोबर कडधान्य पिके, भाजीपाला अशाही पिकांचे उत्पादन घेतले जाते.अर्जुनी-मोरगांव तालुक्यातील नवेगावबांध धरणाचे पाणी उन्हाळी शेतीसाठी सोडल्या जात असले तरी ते पाणी बाराभाटी, कुंभीटोला, पिंपळगाव खांबीपर्यंत पोहोचतच नाही, मग उन्हाळी शेती कशी पिकणार हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उभा होतो. सदर नवेगावबांधचे पाणी कालव्यांव्दारे देवलगाव, येरंडीपर्यंत कसेतरी पोहचते. पण लहान कालव्यांना पाण्याचा थेंबही दिसत नाही. या प्रकाराची पाटबंधारे बांधकाम विभाग व पाणी पुरवठा समितीने तत्काळ दखल घेवून या समस्येचा पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.(वार्ताहर)