शहरं
Join us  
Trending Stories
1
"हेडगेवारांना कारावास झाला होता, पण...", भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील RSS च्या भूमिकेवर ओवेसींनी उपस्थित केला सवाल
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
3
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
4
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
5
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
6
Rohit Sharmaची पत्नी रितिकाच्या हातातल्या महागड्या पर्सची रंगली चर्चा, किंमत ऐकून थक्क व्हाल
7
'या' विमान कंपनीची नवी ऑफर: प्रवाशांना मोठी भेट; मोठ्यांना १,४९९ रुपयांपासून तर मुलांना १ रुपयांत विमान प्रवास
8
Bornhan: मकर संक्रांत ते रथसप्तमी: बाळाची पहिली संक्रांत? मग 'बोरन्हाण' घालताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात!
9
Travel : एकटं फिरायचंय? टेन्शन सोडा! सोलो ट्रॅव्हलिंगसाठी 'ही' ५ ठिकाणे आहेत सर्वात बेस्ट
10
"हा साप मला चावलाय, माझ्यावर उपचार करा" सापाला खिशात घालून रिक्षा चालकानं गाठलं रुग्णालय
11
'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार...
12
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
13
Harsha Richhariya : "आता बस्स झालं, तुमचा धर्म तुमच्याकडेच ठेवा, मी सीता नाही..."; हर्षा रिछारियाचा मोठा निर्णय
14
Nashik Municipal Election 2026 : बडगुजर-शहाणे यांच्या लढतीमुळे प्रभाग २९ 'हॉटस्पॉट'; काट्याच्या लढतीमुळे रंगत
15
हो… अगदी खरे आहे… ‘वंदे भारत’हून वेगवान, शताब्दीपेक्षा सुपरसेवा; तिकीट फक्त ₹५! कोणती ट्रेन?
16
10 मिनिटांच्या डिलिव्हरीला ब्रेक; झेप्टो, ब्लिंकइट, स्विगीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
17
Happy Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत वाढवा सणाचा गोडवा!
18
ट्रम्प यांच्या टॅरिफला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; उद्या निकाल लागण्याची शक्यता; निर्णय विरोधात गेल्यास काय करणार?
19
महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेनेला दोन अंकी आकडा गाठतील का?
20
लॅपटॉपचा कीबोर्ड अचानक बंद झालाय? सर्व्हिस सेंटरला धावण्यापूर्वी करा 'हे' ५ सोपे उपाय; वाचतील हजारो रुपये!
Daily Top 2Weekly Top 5

नवेगावबांध पर्यटन संकूल; निधी असूनही पर्यटन विकासात खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 11:16 IST

नवेगावबांध येथील पर्यटन संकुल परिसरात विविध विकास कामे करुन पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी शासनाने वर्षभरापूर्वी ८ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र या निधीतून अद्यापही विकास कामांना सुरूवात करण्यात आली नाही.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची तारीख पे तारीख

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवेगावबांध येथील पर्यटन संकुल परिसरात विविध विकास कामे करुन पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी शासनाने वर्षभरापूर्वी ८ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र या निधीतून अद्यापही विकास कामांना सुरूवात करण्यात आली नाही. जिल्हा नियोजन विभागाच्या तारीख पे तारीख धोरणाचा येथील पर्यटन स्थळाच्या विकासावर परिणाम होत आहे.नवेगावबांध येथे तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी दरवर्षी विदेशी पक्षी मोठ्या संख्येनी येतात. तर हा परिसर निसर्गरम्य असल्याने त्याला पर्यटनस्थळाचा दर्जा सुध्दा मिळाला आहे. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प लागून असल्याने दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. यातून स्थानिकांना रोजगार व शासनाला महसूल प्राप्त होतो. हीच बाब हेरून स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने नवेगावबांध फाऊंडेशनने पर्यटक संकुलाच्या विकासासाठी मागील तीन वर्षांपासून कंबर कसली. पर्यटन संकुल परिसराच्या विकासासाठी फाऊंडेशनने पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे साकडे घातले. आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. त्यानंतर बडोले यांनी पाठपुरावा करुन पर्यटन संकुल परिसराच्या विकासासाठी ८ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजुर करुन घेतला.हा निधी जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त सुध्दा झाला आहे. मात्र मागील वर्षभरापासून नियोजन विभागाला या निधीचे नियोजन करुन विकास कामे सुरू करण्यास वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री बडोले यांनी पर्यटन संकुल परिसरातील कामे त्वरीत सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. मात्र यानंतरही अधिकाºयांनी ही बाब गांर्भियाने घेतली नाही. महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी नवेगावबांध पर्यटन संकुल परिसराला भेट देवून कामे सुरू करण्यासाठी संबंधित विभागाची लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते सुध्दा फोल ठरल्याचे चित्र आहे. या सर्व गोष्टींचा मात्र येथील पर्यटन विकासावर परिणाम होत आहे.पर्यटकांचा हिरमोेड१९७१ साली राज्य शासनाने या परिसराला नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले. तेव्हापासून एक वैभव संपन्न राष्ट्रीय उद्यान म्हणून नावारुपाला आले. देश, विदेशातून व राज्यातून लाखो पर्यटक येथे भेट देवू लागले. येथील प्राणी संग्रहालयामुळे राज्यातील शैक्षणिक सहलीचे हे राष्ट्रीय उद्यान एक प्रमुख केंद्र बनले. मनोहर उद्यान, हॉलीडे होम्स गार्डन,हिलटॉप गार्डन, बालोद्यान, वैभव गार्डन, संजय कुटी, जलाशयातील नोका विहार यामुळे हे राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसर पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनले होते.या कामांवर परिणामशासनाने मंजुर केलेल्या निधीतून जे. टी.पार्इंट रोपवे, हिलटॉप विश्रामगृह, शेगावच्या धर्तीवर गेट व रस्त्याचे सुशोभीकरण,इंटरपिटीशन सभागृह, अंतर्गत रस्ते व बगीच्याचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा, नैसर्गिक पायवाट, तलावाशेजारी बीच, जे.टी.पार्इंटवर बैठक व्यवस्था, अ‍ॅडव्हांटेज स्पोर्ट आदी कामे केली जाणार होती.

टॅग्स :tourismपर्यटन