शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

नवेगावला वेगळी ओळख देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 04:18 IST

निसर्गाने भरभरु न दिल्याने गोंदिया जिल्हा वनसमृद्ध व जलसंपन्न आहे. नवेगावबांधचाही परिसर निसर्गसौंदर्याने

गोंदिया : निसर्गाने भरभरु न दिल्याने गोंदिया जिल्हा वनसमृद्ध व जलसंपन्न आहे. नवेगावबांधचाही परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत आणि स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असून पर्यटनाच्या क्षेत्रात नवेगावबांधची आगळी-वेगळी ओळख निर्माण करू, असा विश्वास पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला. रविवारी १० एप्रिल रोजी नवेगावबांध येथील हॉलीडे होम्स परिसरात जिल्हा वार्षिक योजनेतून क वर्ग पर्यटनस्थळ विकास मूलभूत सुविधा अंतर्गत ५६ लाख रूपयांच्या खर्चाचे तलाव सौंदर्यीकरण व बोटिंग सुविधासंबंधी कामाचे भूमिपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त झालेल्या कार्यक्र मात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार दयाराम कापगते होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी उत्पन्न बाजार समतिीचे सभापती काशीम जमा कुरेशी, पंचायत समिती सदस्य गुलाब कोरेटी, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, माजी सभापती प्रकाश गहाणे, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष अण्णा पाटील डोंगरवार, तहसीलदार बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, माजी पं.स. सदस्य महादेव बोरकर, उद्यान बचाव संघर्ष समितीचे नवल चांडक, विजय डोये, रामदास बोरकर, केवलदास पुस्तोडे यांची उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना पर्यटकांनी भेट द्यावे यासाठी जिल्ह्यात पर्यटन महोत्सव घेण्यात येईल. राज्यात केवळ गोंदियात आढळणाऱ्या दुर्लभ व नामशेष होत चाललेल्या सारस पक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी डिसेंबरमध्ये सारस महोत्सव घेण्यात आला. जिल्ह्यातील अनेक माजी मालगुजारी तलावांवर हिवाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित व विदेशी पक्षी येत असल्यामुळे हे तलाव पक्षी अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन सर्कीट म्हणून विकास करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून बडोले म्हणाले, नवेगावबांध परिसरात ८ कोटी ५० लाख रु पये खर्चाचे रिसोर्ट बांधण्यात येईल. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा १५ कोटी रूपयांचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केला आहे. नवेगावबांध येथे भविष्यात लवकरच बोटिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. या पर्यटनस्थळांच्या विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. नवेगावबांध पर्यटनस्थळासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या देखरेख समितीवर स्थानिकांना सहभागी करून घेण्यात येईल. नवेगावबांध येथे पक्षी अभयारण्य स्थापण्याचा विचार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. कापगते म्हणाले, वन्यजीवप्रेमी व अरण्ययात्री मारूती चितमपल्ली यांच्यामुळेच नवेगावबांधला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे. येथे अनेक पशूपक्षांवर संशोधन होऊ शकते यावर चितमपल्ली यांनी सखोल अभ्यास केला आहे. नवेगावबांध येथील अनेक प्राण्यांच्या प्रजाती नामशेष झाल्या आहे. नवेगावबांध अभयारण्यातील बोदराई, बदबदा व आगेझरी स्थळांचा विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. गहाणे म्हणाल्या, नवेगावबांध पर्यटन स्थळाच्या विकास कामामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी स्थानिकांची मदत आवश्यक असून मदतीमुळेच भविष्यात पर्यटनस्थळांचा विकास करता येईल, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविकातून कार्यकारी अभियंता ढोरे म्हणाले, नवेगावबांध पर्यटनस्थळाचा विकास झाल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतील. त्यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. ५६ लाख रूपये खर्चुन येथे चौपाटी, बोटिंगकरिता जेटी व धरणाच्या भिंतीचे व परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्र माला नवेगावबांध येथील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. संचालन भेलावे यांनी केले. आभार व्ही.एम.श्रीवास्तव यांनी मानले.(प्रतिनिधी)