शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नवाटोलाची राज्यस्तरीय समितीकडून पाहणी

By admin | Updated: May 13, 2017 01:37 IST

सन २०१५-१६ मध्ये वनग्राम योजनेचा जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार पटकाविणाऱ्या नवाटोलाचे राज्यस्तरीय स्पर्धेत नाव नोंदविण्यात आले आहे.

संत तुकाराम वनग्राम योजना : विविध कामांची केली पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : सन २०१५-१६ मध्ये वनग्राम योजनेचा जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार पटकाविणाऱ्या नवाटोलाचे राज्यस्तरीय स्पर्धेत नाव नोंदविण्यात आले आहे. नुकतेच राज्यस्तरीय पथकाने गावाला भेट देऊन संयुक्त वन व्यवस्थापन समितीने केलेल्या कामांची पाहणी केली. नवाटोला येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने वनांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग केलेले आहेत. त्या उपक्रम व धाडसी कार्यांची माहिती संकलीत करून तपासणी पथकासमोर सादर केली. समितीच्या कामामुळे नवाटोला, सोनारटोल, धनेगाव, कोसमतर्रा परिसरातील अनेक बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळाले आहे. समितीच्या अथक परिश्रमामुळेच हाजराफॉल सारखे नैसर्गिक पर्यटन स्थळ रोजगाराभिमुख बनले आहे. या व्यतिरीक्त वनोपजातून सुद्ध रोजगार व उत्पन्न प्राप्त करण्याची संधी स्थानिका लोकांना मिळाली आहे. राज्यस्तरीय पथकाने पाहणी करताना निवडीचे काही निकष ठेवले व त्यात वनीकरण, मृदा व जलसंधारण, श्रमदान, वनोत्तर पर्ययी इंधनाचा वापर, वनसरंक्षण, वन्यप्राणी, पक्षी यांच्यासाठी पाणवठे तयार करणे, उपक्रमामध्ये स्त्रीयांचा सहभाग, आग प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती रॅली, निबंध व चित्रकला स्पर्धा इत्यादी माध्यमातून केलेली जनजागृती या बाबींच समावेश होता. निकषानुसार पाहणी करताना समितीची कामे प्रशंसनीय दिसून आली. पथकामध्ये नागपूर येथील वन संरक्षक गिरीपूंजे, सामाजीक वनिकरणचे विभागीय वनाधिकारी ढेरे, सहायक वन संरक्षक तारसेकर व अन्य सदस्य होते. याप्रसंगी सरपंच पूजा वरकडे, जिल्ह्याचे सहायक वन संरक्षक यू.टी.बिसेन, वन परिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान, क्षेत्र सहायक सी.जी.मडावी, वन रक्षक सुरेश रहांगडाले, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदीन उईके तसेच समितीचे सदस्य व गावातील महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. यावेळी उप वनसंरक्षक एस.युवराज यांनी मार्गदर्शन केले. तर सोनारटोला येथील समाजभवनात तपासणी, स्वागत सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रमानंतर पथकाने वन क्षेत्रात जाऊन जंगलांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच समितीच्या उपक्रमांचीही तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कृत नवाटोला येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला वन संवर्धन व वनांचे रक्षण करण्यासाठी सन २०१५-१६ चा वनग्राम योजनेचा जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार स्वरूपात ५१ हजार रूपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते देण्यात आला होता.