शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

झाडे जगविण्यासाठी निसर्ग मंडळाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:13 IST

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी भूजल पातळीत सुद्धा घट झाली आहे. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. पाणी टंचाईच्या काळातही पर्यावरण संवर्धनासाठी निसर्ग मंडळाकडून झाडे जगविण्यासाठी धडपड केली जात आहे.

ठळक मुद्देराबविले स्वच्छता अभियान । झाडांनाही दिले पाणी

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी भूजल पातळीत सुद्धा घट झाली आहे. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. पाणी टंचाईच्या काळातही पर्यावरण संवर्धनासाठी निसर्ग मंडळाकडून झाडे जगविण्यासाठी धडपड केली जात आहे. निसर्ग मंडळाने हलबीटोला नहराजवळील वनविभागाने लावलेल्या रोपट्यांना नजीकच्या नहरातून पाणी देवून जगविण्याचा प्रयत्न केला.पर्जन्यामानात दिवसेंदिवस घट होत असताना अत्यल्प पावसामुळे परिसरातील जलसाठ्यांनी तळ गाठला आहे. पाणी मिळणे देखील अवघड झाले. अशा परिस्थितीत पाणी घालून झाडे जगविणे तर फारच कठीन काम आहे. परंतु पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेल्या निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी हार न मानता थेंब-थेंब पाण्याची बचत करुन लावलेली झाडे जतन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येथील निसर्ग मंडळाने वनपरिक्षेत्राधिकारी एस.एम.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे यांच्या पुढाकाराने २० युवकांचा गु्रप तयार केला आहे. गेल्या काही दिवसात या मंडळाने पर्यावरण संर्वधनाचे काम, वन्यप्राणी बचाव अभियान व स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी निसर्ग मंडळ लवकरच लोकवर्गणीतून टँकरची व्यवस्था करुन वृक्षारोपण केलेल्या रोपट्यांना जगविण्याचा प्रयत्न करणार आहे.स्वच्छता अभियान मोहिमेला गतीपर्यावरण संवर्धनासह निसर्ग मंडळाने स्वच्छता मोहिमेला हातभार लावला आहे. गुरूवारी (दि.२) गतवर्षी वनविभागाने लावलेल्या अकराशे झाडांना पाणी देत रस्त्याच्या पलीकडे असलेल्या वडाच्या झाडाजवळील परिसराला स्वच्छ करण्यात आले. या वडाच्या झाडावर हजारो पक्ष्यांचे घरटे पहायला मिळाले. त्या झाडावर लवकरच पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात येणार आहे. या वेळी निसर्ग मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, उपाध्यक्ष गुड्डू कटरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन, सहसचिव दिलीप येळे, कोषाध्यक्ष अंकीत रहांगडाले, प्रसिद्धी प्रमुख दिलीप चव्हाण, सदस्य डॉ. लोकेश तुरकर यांनी सहकार्य केले.वाटसरुही उतरले स्वच्छता अभियानात२ मे २०१९ रोजी निसर्ग मंडळाने हलबीटोला येथील वडाच्या झाडाच्या परिसरात स्वच्छता अभियानाला सुरुवात केली असता रस्त्याने जाणाऱ्या वाटसरुनांही आवरले आहे. त्यांनीही निसर्ग मंडळाच्या कार्यकर्त्यांना पाहून स्वत:ला स्वच्छता अभियानात सहभागी करुन घेतले.