शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक शेती काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 21:11 IST

रासायनिक खते व किटकनाशकांच्या उपयोगामुळे मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अशी घातक रसायने फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यावर फवारल्यामुळे गेल्यादहा महिन्यांत केवळ विदर्भात २७२ व्यक्ती मृत्यूच्या दाढेत पोहोचले.

ठळक मुद्देसंध्या मून : रसायनविरहित शेती विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रासायनिक खते व किटकनाशकांच्या उपयोगामुळे मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अशी घातक रसायने फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यावर फवारल्यामुळे गेल्यादहा महिन्यांत केवळ विदर्भात २७२ व्यक्ती मृत्यूच्या दाढेत पोहोचले. एवढेच नव्हे तर अशी घातक रसायने पाण्याच्या साठ्यात पोहोचतात आणि असे पाणी प्यालाने रक्तदाब, आॅक्सीजनची कमतरता आणि पोटाच्या कर्करोग असे आजार उद्भवतात. शिवाय पृथ्वीचे अतोनात नुकसान होत असून नैसर्गिक शेती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रसायनशास्त्र विभाग प्रमुख संध्या मून यांनी केले.येथील एस.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये २२ फेब्रुवारी रोजी आयोजीत रसायन विरहित, नैसर्गिक शेती आणि बागायती शेती आजच्या काळाची गरज या विषयावर आधारीत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उद्घाटन प्राचार्य एन.के. बहेकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. ललीता रायचौधरी, डॉ. माधुरी नासरे, डॉ. रेखा लिल्हारे, राजश्री वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बहेकार यांनी, कृषी प्रधान भारताला कसे रसायनमुक्त करु शकतो यावर प्रकाश टाकला. उपस्थित अन्य पाहुण्यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमात विविध प्रकारचे स्टॉल्स लावले गेले होते. त्यात नैसर्गिक खते, कीटकनाशके, जैविक हारमोन्स, बुस्टर, वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि वनस्पती, मिनीडोअर गार्डन इत्यादींचे प्रदर्शन केले गेले. कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा भरघोष प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी बी.एस.सी. द्वितीय वर्गाच्या सर्व विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

टॅग्स :agricultureशेती