शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

नैसर्गिक संकटाने अनेक गावातील शेतकरी हतबल

By admin | Updated: November 22, 2014 00:47 IST

गोंदिया हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर नोंद आहे. तसेच वनसंपत्तीने नटलेला जिल्हा म्हणून विशेष ओळख आहे.

केशोरी : गोंदिया हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर नोंद आहे. तसेच वनसंपत्तीने नटलेला जिल्हा म्हणून विशेष ओळख आहे. या जिल्ह्यातील उपेक्षित भाग म्हणून अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील आदिवासीबहुल असणारा केशोरी परिसर. या परिसरात सिंचनाची आणि औद्योगिक विकासाची वानवा असल्यामुळे या परिसरातील शेतकरी पूर्णत: धान पिकाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. परंतु वारंवार उद्भणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत.नियतीच्या चक्रव्युहाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाने छळले आहे. वेळोवेळी बदलणाऱ्या वातावरणामुळे बऱ्याच प्रमाणात धानपिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यावर मात करून शेतकऱ्यांनी धानाला लागलेल्या रोगावर नियंत्रण मिळविण्यास यश मिळविले. दिवाळीनंतर पावसाच्या सरी बरसल्याने काही शेतकऱ्यांची धान कापणी पाण्यात सापडली. अशा अनेक नैसर्गिक यातना केशोरी परिसरातील शेतकऱ्यांच्या नशिबी आल्या आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले तरी शेतकऱ्यांनी आपले धानपीक कसेबसे जगवले. त्यानंतर तुडतुडा, करपा, खोडकिडा यासारखे रोग आले. धानाच्या रोगांवर महागडी औषधी फवारून नियंत्रण ठेवण्यात यश आले, तरी पाहिजे त्या प्रमाणात धानपिकाच्या उत्पन्नाचा उतारा मिळत नसल्याने शेतकरीवर्ग विवंचनेत सापडल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे दुर्दैवी शेतकऱ्यांनी निसर्गासमोर हात टेकले आहेत. या परिसरातील जांभळी, उमरपायली, डोंगरगाव, आंभोरा, बारव्हा, गवर्रा, गार्डनपूर, परसटोला, अरसतोंडी, धमदीटोला, इळदा, राजोली, भरनोली, खडकी, कन्हाळगाव या गावातील शेतकऱ्यांची धानपिके सिंचनाअभावी करपली जातात. या प्रकरणांची या परिसरातील नुकसानीची दाहकता व वास्तव प्रसारमाध्यमे सतत शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु या उपेक्षित भागाकडे आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींचे मुळीच लक्ष नाही. त्यामुळेच या परिसरातील शेतकरी आपल्या नशिबाचे भोग भोगत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)