शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नैसर्गिक संकटाने अनेक गावातील शेतकरी हतबल

By admin | Updated: November 22, 2014 00:47 IST

गोंदिया हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर नोंद आहे. तसेच वनसंपत्तीने नटलेला जिल्हा म्हणून विशेष ओळख आहे.

केशोरी : गोंदिया हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर नोंद आहे. तसेच वनसंपत्तीने नटलेला जिल्हा म्हणून विशेष ओळख आहे. या जिल्ह्यातील उपेक्षित भाग म्हणून अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील आदिवासीबहुल असणारा केशोरी परिसर. या परिसरात सिंचनाची आणि औद्योगिक विकासाची वानवा असल्यामुळे या परिसरातील शेतकरी पूर्णत: धान पिकाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. परंतु वारंवार उद्भणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत.नियतीच्या चक्रव्युहाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाने छळले आहे. वेळोवेळी बदलणाऱ्या वातावरणामुळे बऱ्याच प्रमाणात धानपिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यावर मात करून शेतकऱ्यांनी धानाला लागलेल्या रोगावर नियंत्रण मिळविण्यास यश मिळविले. दिवाळीनंतर पावसाच्या सरी बरसल्याने काही शेतकऱ्यांची धान कापणी पाण्यात सापडली. अशा अनेक नैसर्गिक यातना केशोरी परिसरातील शेतकऱ्यांच्या नशिबी आल्या आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले तरी शेतकऱ्यांनी आपले धानपीक कसेबसे जगवले. त्यानंतर तुडतुडा, करपा, खोडकिडा यासारखे रोग आले. धानाच्या रोगांवर महागडी औषधी फवारून नियंत्रण ठेवण्यात यश आले, तरी पाहिजे त्या प्रमाणात धानपिकाच्या उत्पन्नाचा उतारा मिळत नसल्याने शेतकरीवर्ग विवंचनेत सापडल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे दुर्दैवी शेतकऱ्यांनी निसर्गासमोर हात टेकले आहेत. या परिसरातील जांभळी, उमरपायली, डोंगरगाव, आंभोरा, बारव्हा, गवर्रा, गार्डनपूर, परसटोला, अरसतोंडी, धमदीटोला, इळदा, राजोली, भरनोली, खडकी, कन्हाळगाव या गावातील शेतकऱ्यांची धानपिके सिंचनाअभावी करपली जातात. या प्रकरणांची या परिसरातील नुकसानीची दाहकता व वास्तव प्रसारमाध्यमे सतत शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु या उपेक्षित भागाकडे आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींचे मुळीच लक्ष नाही. त्यामुळेच या परिसरातील शेतकरी आपल्या नशिबाचे भोग भोगत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)