शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

पुरेशा सिंचन सुविधांअभावी शेतकऱ्यांना नापिकीचा फटका

By admin | Updated: December 16, 2014 22:56 IST

मागील वर्षी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. मात्र यावर्षी पुन्हा पावसाअभावी कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागते आहे. या परिसरात अल्पमध्यम शेतकऱ्यांची

रावणवाडी : मागील वर्षी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. मात्र यावर्षी पुन्हा पावसाअभावी कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागते आहे. या परिसरात अल्पमध्यम शेतकऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. मात्र परिसरात सिंचनाची काहीच व्यवस्था नसल्यामुळे येथील शेतकरी कुटुंब या आपत्तीचा सामना करीत आहेत.राज्य शासनाने या परिसरातील शेतकऱ्यांचा शेत जमिनीला सिंचन व्यवस्था म्हणून सन २००६ पासून काटी, रजेगाव उपसा सिंचन योजनाच्या भागात सुरु आहे. शासनाच्यावतीने या योजनेवर कोट्यवधी रुपये ही खर्च केले आहे. मात्र ही योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विभागानी नियमबाह्य पद्धतीचा अवलंब केल्यामुळे ही योजना निर्जिव होऊन शेतकऱ्यांसाठी निरपयोगी ठरली आहे.भूसंपादनापासून आजतागायत संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला. पुर्वी ही योजना पाईप लाईन द्वारे निर्मित होणार होती. मात्र संबंधित विभागाने अंदाज पत्रकात फेरबदल करुन खुले भयावह २० ते २२ फूट कालव्यातून शेतीला सिंचनासाठी कालव्याचे पाणी कसे आणि कोणत्या प्रकारे शेतीला सिंचन होणार असा अनुमान ठपका शेतकरी करीत आहेत. शासनाने प्रकल्प बांधकामाकरीता हवी तसी पुरेशी निधी संबंधित विभागाला दिली.मात्र शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या सुपीक शेतजमिनीचा मोबदला स्वयंनिर्णयाने काही शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले असले तरी अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांना संपादित केलेल्या जमिनीचा मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात आले असल्यामुळे जमिन मालकात या योजनेबद्दल कमालिचा रोष निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने शेतकऱ्यांना स्वयंमर्जीने ठरवलेली अतीअल्प तोडकी निधी मंजूर करुन ही योजना शासनाची आहे. अशी दहशत निर्माण केली असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी मंजूर झालेली निधीची उचल केली. शेतकऱ्यांच्या ओलीत जमिन बिगर ओलीत दर्शवण्यात आली. शेतातील मोल्यवान वृक्षही या कालव्यात गेले. त्याचाही मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. दिड दोन लाख रुपयात या भागात कुठे ही घर बांधणीकरीता भुखंड लोकांना मिळत नाही. मात्र संबंधित विभागाने शेतकऱ्यांना एका भुखंडाएवढाही मोबदला शेतकऱ्यांना दिला नाही असे कृत या योजनेत झाले असलेतरी वर्तमानमध्ये असलेले शासन शेतकऱ्यांना न्याय देईल अशी अपेक्षा आताही शेतकऱ्यांना वाटत आहे.सध्याच्या काळात या परिसरात धानाचे पिक वैरण म्हणूनच कापणी केली असून त्यापिकाला वैरणात रुपांतर करण्यासाठी श्ोतकऱ्यांना मळणी करावी लागत आहे. एका दिवसाचा मळणी मधून एक ते दिड पोतेच पिकाचे उत्पादन हाती येत असून उत्पादनात मोठी घट झाली. सध्या रबी पीक तरी परिस्थिती सावरेल अशी अपेक्षा असताना परतीचा पाऊसही यावेळी झाला नाही. त्यामुळे जमिनीत आद्रताही नाही. त्यामुळे सध्या स्थितीत २० ते २६ टक्के पेरणी आहे. अशी बिकट आणि बेहाल अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. नापिकीचा जबर फटका बसल्याने ग्रामीण भागाचा लघू व्यवसायही थंडावला आहे. या पार्श्वभूमीवर शासन काहीतरी उपाय योजनाकरुन या भागाकरीता विशेष पॅकेज मिळेल अशी आशा बाळगुन आहेत. (वार्ताहर)