शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पुरेशा सिंचन सुविधांअभावी शेतकऱ्यांना नापिकीचा फटका

By admin | Updated: December 16, 2014 22:56 IST

मागील वर्षी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. मात्र यावर्षी पुन्हा पावसाअभावी कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागते आहे. या परिसरात अल्पमध्यम शेतकऱ्यांची

रावणवाडी : मागील वर्षी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. मात्र यावर्षी पुन्हा पावसाअभावी कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागते आहे. या परिसरात अल्पमध्यम शेतकऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. मात्र परिसरात सिंचनाची काहीच व्यवस्था नसल्यामुळे येथील शेतकरी कुटुंब या आपत्तीचा सामना करीत आहेत.राज्य शासनाने या परिसरातील शेतकऱ्यांचा शेत जमिनीला सिंचन व्यवस्था म्हणून सन २००६ पासून काटी, रजेगाव उपसा सिंचन योजनाच्या भागात सुरु आहे. शासनाच्यावतीने या योजनेवर कोट्यवधी रुपये ही खर्च केले आहे. मात्र ही योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विभागानी नियमबाह्य पद्धतीचा अवलंब केल्यामुळे ही योजना निर्जिव होऊन शेतकऱ्यांसाठी निरपयोगी ठरली आहे.भूसंपादनापासून आजतागायत संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला. पुर्वी ही योजना पाईप लाईन द्वारे निर्मित होणार होती. मात्र संबंधित विभागाने अंदाज पत्रकात फेरबदल करुन खुले भयावह २० ते २२ फूट कालव्यातून शेतीला सिंचनासाठी कालव्याचे पाणी कसे आणि कोणत्या प्रकारे शेतीला सिंचन होणार असा अनुमान ठपका शेतकरी करीत आहेत. शासनाने प्रकल्प बांधकामाकरीता हवी तसी पुरेशी निधी संबंधित विभागाला दिली.मात्र शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या सुपीक शेतजमिनीचा मोबदला स्वयंनिर्णयाने काही शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले असले तरी अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांना संपादित केलेल्या जमिनीचा मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात आले असल्यामुळे जमिन मालकात या योजनेबद्दल कमालिचा रोष निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने शेतकऱ्यांना स्वयंमर्जीने ठरवलेली अतीअल्प तोडकी निधी मंजूर करुन ही योजना शासनाची आहे. अशी दहशत निर्माण केली असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी मंजूर झालेली निधीची उचल केली. शेतकऱ्यांच्या ओलीत जमिन बिगर ओलीत दर्शवण्यात आली. शेतातील मोल्यवान वृक्षही या कालव्यात गेले. त्याचाही मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. दिड दोन लाख रुपयात या भागात कुठे ही घर बांधणीकरीता भुखंड लोकांना मिळत नाही. मात्र संबंधित विभागाने शेतकऱ्यांना एका भुखंडाएवढाही मोबदला शेतकऱ्यांना दिला नाही असे कृत या योजनेत झाले असलेतरी वर्तमानमध्ये असलेले शासन शेतकऱ्यांना न्याय देईल अशी अपेक्षा आताही शेतकऱ्यांना वाटत आहे.सध्याच्या काळात या परिसरात धानाचे पिक वैरण म्हणूनच कापणी केली असून त्यापिकाला वैरणात रुपांतर करण्यासाठी श्ोतकऱ्यांना मळणी करावी लागत आहे. एका दिवसाचा मळणी मधून एक ते दिड पोतेच पिकाचे उत्पादन हाती येत असून उत्पादनात मोठी घट झाली. सध्या रबी पीक तरी परिस्थिती सावरेल अशी अपेक्षा असताना परतीचा पाऊसही यावेळी झाला नाही. त्यामुळे जमिनीत आद्रताही नाही. त्यामुळे सध्या स्थितीत २० ते २६ टक्के पेरणी आहे. अशी बिकट आणि बेहाल अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. नापिकीचा जबर फटका बसल्याने ग्रामीण भागाचा लघू व्यवसायही थंडावला आहे. या पार्श्वभूमीवर शासन काहीतरी उपाय योजनाकरुन या भागाकरीता विशेष पॅकेज मिळेल अशी आशा बाळगुन आहेत. (वार्ताहर)