शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नानांना ठेवावी लागणार आपले आणि परक्यांची जाणीव

By admin | Updated: May 22, 2014 01:15 IST

उगवत्या सुर्याला सलाम करण्याची परंपराच आहे.

उगवत्या सुर्याला सलाम करण्याची परंपराच आहे. या परंपरेचा खरा प्रत्यय सध्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. प्रफुल्ल पटेल यांना हारवून नाना पटोले विजयी झाले व दोन्ही जिल्ह्यात त्यांचे सगेसोयरे अचानक वाढले. एकेकाळी भाईजींच्या मागे फिरणारेही आता नानांचे होर्डीग्स लाऊन त्यांचे शुभचिंतक असल्याचे दाखवित आहे. कित्येक असे आहेत जे फक्त आपले काम काढून घेण्यासाठीच त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आता नानाभाऊंनी सावधान राहून खरोखरच आपले कोण व परके कोण याची जाणीव ठेवण्याची गरज आहे.

नानांच्या शुभेच्छा होर्डींग्सने आज शहर भरून गेले आहे. या होर्डींग्समधील आश्‍चर्याची बाब अशी की, यात नानांना सोडून अन्य कुणीही ओळखीचे दिसून येत नाही. त्यांच्यासोबत कधी ज्यांना बघितले नाही असेही मोठमोठाले व कित्येक होर्डींग्स लाऊन आपण त्यांचे खरे शुभचिंतक असल्याचे दाख- विण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळेच शहरात सध्या होर्डींगयुद्ध पेटले आहे. बघावे तो होर्डींगच्या माध्यमातून नानांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहे. हे दाखवित आहे की, भाऊ फक्त आम्हीच तुमचे खरे चाहते आहोत. यासाठी फक्त होर्डींग्स नव्हे तर सध्या व्हॉट्सअँप व फेसबूक हे सुद्धा एक महत्वाचे माध्यम बनल्याचे दिसून येत आहे.

भाऊंची लोकप्रियता आहे याबाबत काही वादच नाही. त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांनी आपण त्यांच्या सोबत असल्याचे निकालातून दाखवून दिले. याचा अर्थ असा नाही की, निवडणुकीत त्यांच्यासोबत मागे पुढे करणारे व नारे लावणारेच त्यांचे चाहते व त्याचे खरे शुभचिंतक आहेत. त्यांच्यासोबत फोटो न काढणारे तसेच त्यांच्या संघटनेत पद घेऊन भाऊंच्या नावाची माळ न जपणारेही कित्येक मनापासून भाऊंचे शुभचिंतक आहेत. भाईजी मंत्री असताना कित्येक त्यांच्या नावाची माळ जपत होते. कंपनीच्या कार्यालयात ठाण मांडून बसून राहत होते. आज मात्र परिस्थिती बदलली असून कंपनीत शुकशुकाट असून बघावे तो नानांची तारीफ व नानांशी जवळीक निर्माण करण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे.

कारण भाऊ उगवता सूर्य असल्याचे त्यांना वाटत आहे. परिस्थितीनुसार बदलणारे तर बदलतच्ं राहणार. मात्र कित्येक असे ही आहेत जे फक्त भाऊंचा वापर करून आपले राजकारण चालवित आहे. आपले काम काढण्यासाठी भाऊ-भाऊ करीत आहेत. आता भाऊ खासदार झाले उद्यामंत्रीपद मिळेल अशीही त्यांना आशा आहे. नेमकी हीच बाब हेरून त्यांचे जवळचे त्यांचा लाभ घेण्याचा तयारीत बसून आहेत. भाऊंच्या संघटनेच्या माध्यमातून आपण भाऊंचे किती जवळचे व किती शुभचिंतक आहोत हे दाखविणारेही भरपूर आहेत.

भाऊंना येथे कुणाचे नाव सांगायची गरज नाही. ही बाब त्यांनाही चांगल्या प्रकारे माहित आहे. मात्र आता खर्‍या शुभचिंतकांनी जबाबदारी टाकली आहे ती सर्वांसाठीच व सर्वासामान्यांसाठीच. त्यासाठी आता भाऊंनी सावधान राहण्याची गरज आहे. खरंच आपला कोण हे जाणून घेण्याची व आपल्यांच्या गर्दीत बसूनही परका कोण त्याला ओळखण्याची. भाईजींच्या हातून हीच चूक झाली व त्याचे परिणाम काय झाले ते सर्वांना दिसले. अशी चूक भाऊंच्या हातून होऊ नये असेच त्यांच्या अनेक चाहत्यांना वाटत आहे. त्यांच्यापासून दूर असलेल्या पण मन:पूर्वक त्यांच्यासोबत असलेल्या चाहत्यांची हीच चिंता आहे.