शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नागझिरा अभयारण्य १ नोव्हेंबरपासून खुलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे जीवन फार व्यस्त झाले आहे. अशावेळी मोकळा श्वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून सहलीचा बेतही आखला जातो. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद असल्याने अनेकांना घरीच लॉक रहावे लागले. मात्र त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नागझिरा अभयारण्यात त्यांना पर्यटनाचा बेत आखता येणार आहे.

ठळक मुद्देवन्यप्रेमींसाठी आली ह्यगूड न्यूजह्ण : शासनाच्या अटी-शर्तींचे पालन आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेले तालुक्यातील नागझिरा अभयारण्य १ नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी खुले होणार आहे. त्यामुळे दीर्घ कालावधीपासून आसुसलेल्या पर्यटकांना लवकरच पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे जीवन फार व्यस्त झाले आहे. अशावेळी मोकळा श्वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून सहलीचा बेतही आखला जातो. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद असल्याने अनेकांना घरीच लॉक रहावे लागले. मात्र त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नागझिरा अभयारण्यात त्यांना पर्यटनाचा बेत आखता येणार आहे.संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असाही होतो. फार वर्षापुर्वी या जंगलात हत्तीचे वास्तव्य होते. पाण्याचे झरेसुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने या अभयारण्याला नागझिरा असे नाव पडले. या अभयारण्यात अनेक पशुपक्षी व झाडे बघायला मिळतात. हे अभयारण्य गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या मधोमध असून १५२.८१ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्याची विशेषता म्हणजे यामध्ये वीज पुरवठा अजिबात नाही.हे जंगल नैसर्गिकच राखलेले आहे. यात २०० पक्ष्यांची नोंद असून वाघ, बिबट्या, रानडुकर, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, चौसिंगा, नीलगाय, चितळ, सांभर असे असंख्य पशु आहेत. सर्पगरुड, मत्स्यगरुड, टकाचोर, नवरंग, कोतवाल, खाटीक, राखीधनेरा आदि अनेक पक्षी अभयारण्यात उडताना दिसतात.अभयारण्यात प्रवेश करताच सांबर, चितळ, हरिण, निलगाय, रानगवा, अस्वल आदि प्राणी रस्त्याच्या दुतर्फा मुक्तपणे संचार करताना दिसतात. आजूबाजूला माकडे फांद्यावर उडया मारत असताना पर्यटकांचे मन मोहून टाकतात.पावलापावलावर दिसणारी हरणे, माकडे त्याचप्रमाणे राज्यपक्षी हरियाल, हळद्या, निलपंखी, स्वर्गीयनर्तक, नवरंगी, तुरेवाला, सर्प गरुड, व्हाईट आईड बझार्ट यासारखे शिकारी पक्षी बघायला मिळतात. अनेक प्रकारची फुलपाखरे निरनिराळ्या प्रकारची कोळी, पट्टेवाला वाघ, अस्वले, रानकुत्रे अभयारण्यात आहेत.पर्यटकांनी असे जावेया अभयारण्याच्या आसपास आवर्जुन भेट द्यावी, असे नवीन नागझिरा, नवेगावबांध जलाशय, चोरखमारा जलाशय, अंधारबन, नागदेव पहाडी, कोसमतोंडी त्याचप्रमाणे काही अंतरावर कान्हा प्रकल्प, पेंच प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा दुवा आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथून २२ किलोमीटर पिटेझरी गेटवरुन या अभयारण्यात प्रवेश करता येतो. तिरोडा येथून १२ किलोमीटर अंतरावरुन या अभयारण्यात प्रवेश करता येते.या आहेत आटी-शर्तीकोरोनाचा प्रादुर्भाव बघता वाहनाच्या एकूण पर्यटक क्षमतेच्या ५० टक्के पर्यटकांना वाहनात प्रवेश दिला जाणार आहे, १० वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना पयर्यटनाकरिता प्रवेश दिला जाणार नाही, सर्व पर्यटक, गाईड व वाहन चालक यांना मास्कचा वापर बंधनकारक राहणार आहे, तसेच वाहनात बसण्यापूर्वी सॅनिटायझरने हात निर्जंतूक करणे आवश्यक राहील, वनक्षेत्रात मास्क, हातमोजे, पाणी बाटल व फेकणे जाणार याची दक्षता घ्यावी लागेल, प्रवेशद्वारावर शारीरिक अंतराचे पालन करावे लागेल यासह अन्य आटींचे पालन करावे लागणार आहे.

टॅग्स :Nagzira Tiger Projectनागझिरा व्याघ्र प्रकल्प