शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागझिरा अभयारण्य १ नोव्हेंबरपासून खुलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे जीवन फार व्यस्त झाले आहे. अशावेळी मोकळा श्वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून सहलीचा बेतही आखला जातो. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद असल्याने अनेकांना घरीच लॉक रहावे लागले. मात्र त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नागझिरा अभयारण्यात त्यांना पर्यटनाचा बेत आखता येणार आहे.

ठळक मुद्देवन्यप्रेमींसाठी आली ह्यगूड न्यूजह्ण : शासनाच्या अटी-शर्तींचे पालन आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेले तालुक्यातील नागझिरा अभयारण्य १ नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी खुले होणार आहे. त्यामुळे दीर्घ कालावधीपासून आसुसलेल्या पर्यटकांना लवकरच पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे जीवन फार व्यस्त झाले आहे. अशावेळी मोकळा श्वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून सहलीचा बेतही आखला जातो. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद असल्याने अनेकांना घरीच लॉक रहावे लागले. मात्र त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नागझिरा अभयारण्यात त्यांना पर्यटनाचा बेत आखता येणार आहे.संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असाही होतो. फार वर्षापुर्वी या जंगलात हत्तीचे वास्तव्य होते. पाण्याचे झरेसुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने या अभयारण्याला नागझिरा असे नाव पडले. या अभयारण्यात अनेक पशुपक्षी व झाडे बघायला मिळतात. हे अभयारण्य गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या मधोमध असून १५२.८१ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्याची विशेषता म्हणजे यामध्ये वीज पुरवठा अजिबात नाही.हे जंगल नैसर्गिकच राखलेले आहे. यात २०० पक्ष्यांची नोंद असून वाघ, बिबट्या, रानडुकर, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, चौसिंगा, नीलगाय, चितळ, सांभर असे असंख्य पशु आहेत. सर्पगरुड, मत्स्यगरुड, टकाचोर, नवरंग, कोतवाल, खाटीक, राखीधनेरा आदि अनेक पक्षी अभयारण्यात उडताना दिसतात.अभयारण्यात प्रवेश करताच सांबर, चितळ, हरिण, निलगाय, रानगवा, अस्वल आदि प्राणी रस्त्याच्या दुतर्फा मुक्तपणे संचार करताना दिसतात. आजूबाजूला माकडे फांद्यावर उडया मारत असताना पर्यटकांचे मन मोहून टाकतात.पावलापावलावर दिसणारी हरणे, माकडे त्याचप्रमाणे राज्यपक्षी हरियाल, हळद्या, निलपंखी, स्वर्गीयनर्तक, नवरंगी, तुरेवाला, सर्प गरुड, व्हाईट आईड बझार्ट यासारखे शिकारी पक्षी बघायला मिळतात. अनेक प्रकारची फुलपाखरे निरनिराळ्या प्रकारची कोळी, पट्टेवाला वाघ, अस्वले, रानकुत्रे अभयारण्यात आहेत.पर्यटकांनी असे जावेया अभयारण्याच्या आसपास आवर्जुन भेट द्यावी, असे नवीन नागझिरा, नवेगावबांध जलाशय, चोरखमारा जलाशय, अंधारबन, नागदेव पहाडी, कोसमतोंडी त्याचप्रमाणे काही अंतरावर कान्हा प्रकल्प, पेंच प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा दुवा आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथून २२ किलोमीटर पिटेझरी गेटवरुन या अभयारण्यात प्रवेश करता येतो. तिरोडा येथून १२ किलोमीटर अंतरावरुन या अभयारण्यात प्रवेश करता येते.या आहेत आटी-शर्तीकोरोनाचा प्रादुर्भाव बघता वाहनाच्या एकूण पर्यटक क्षमतेच्या ५० टक्के पर्यटकांना वाहनात प्रवेश दिला जाणार आहे, १० वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना पयर्यटनाकरिता प्रवेश दिला जाणार नाही, सर्व पर्यटक, गाईड व वाहन चालक यांना मास्कचा वापर बंधनकारक राहणार आहे, तसेच वाहनात बसण्यापूर्वी सॅनिटायझरने हात निर्जंतूक करणे आवश्यक राहील, वनक्षेत्रात मास्क, हातमोजे, पाणी बाटल व फेकणे जाणार याची दक्षता घ्यावी लागेल, प्रवेशद्वारावर शारीरिक अंतराचे पालन करावे लागेल यासह अन्य आटींचे पालन करावे लागणार आहे.

टॅग्स :Nagzira Tiger Projectनागझिरा व्याघ्र प्रकल्प