शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
3
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
4
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
5
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
6
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
7
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
8
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
9
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
10
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
11
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
12
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
13
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
14
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
15
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
16
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
17
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
18
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
19
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
20
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

नागराजाची आश्रयस्थाने धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:32 IST

शेतकऱ्यांचा मित्र रस्त्यावर : सर्प संवर्धनाकडे लक्ष देण्याची गरज नरेंद्र कावळे आमगाव : साप म्हटल्यावर कोणाचाही थरकाप उडतो व ...

शेतकऱ्यांचा मित्र रस्त्यावर : सर्प संवर्धनाकडे लक्ष देण्याची गरज

नरेंद्र कावळे

आमगाव : साप म्हटल्यावर कोणाचाही थरकाप उडतो व याच सापाला आपण शेतकऱ्यांचा मित्र म्हणूनही ओळखतो. जंगलावरील अतिक्रमण, अंधश्रद्धा आणि विषाची तस्करी अशा तिहेरी कात्रीत सापडलेल्या सापांच्या अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. परिणामी नागराजाचे जीवन आज धोक्यात आले आहे.

शेती, नवीन रस्ते, नवीन प्रकल्प, कारखाने, नवीन घर बांधकाम, उभारणीसाठी होणाऱ्या जंगलतोडी यामुळे सापांची आश्रयस्थाने नष्ट होत आहेत. निसर्गचक्रातील महत्वाचा घटक असलेल्या सापांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते आहे. साप हा केवळ मानवमित्र नसून तो निसर्गमित्रही आहे. सापाचे मुख्य अन्न उंदीर आहे. याशिवाय पिकांवरील कीटक, डासांच्या अळ्या, घुशी यांवर साप नियंत्रण ठेवतो. अशा मदत करणाऱ्या सापाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. पर्यावरणवादी संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत सापांच्या संरक्षणासाठी मोठया प्रमाणात जनजागृती केली जात असली तरी अंधश्रद्धा आणि भीतीपोटी सापांचा जीव घेण्याचे प्रकार कुठेही कमी झालेले नाहीत.

भारतात आढळणाऱ्या सापांच्या विविध प्रजातींपैकी केवळ १० प्रजाती विषारी आहेत. इतर प्रजाती मनुष्यासाठी घातक नाहीत. तरीही, साप चावल्याने मृत्यू होतो हा प्रचंड मोठा गैरसमज असल्याने साप दिसला की लगेच त्याला मारले जाते. प्रत्येक साप हा विषारी नाही असे वर्षानुवर्षे सांगितले जाते तरीही, त्याविषयीचा गैरसमज आणि इतर अनेक कारणांमुळे सापाच्या कित्येक प्रजाती आधीच नष्ट झाल्या आहेत. वन्यजीव कायदे कितीही कठोर असले तरीही, कायद्याच्या माध्यमातून त्यांना पुरेसे संरक्षण मिळत नाही. त्यामुळे सापांच्या सुरक्षिततेचा मुद्दा कळीचा झाला आहे. राज्यभरात सर्पमित्र आहेत व त्यांच्या कडून अनेक सापांना जीवनदान मिळाले आहे. आता गावात एकतरी सर्पमित्र दिसून येतो परंतु प्रत्यक्षात सापांविषयी संपूर्ण माहिती असलेले सर्पमित्र मोजकेच आहेत. काही सर्पमित्र सापांविषयी अर्धवट ज्ञान असलेले आहेत. प्रत्येक सापांचे वास्तवस्थान वेगवेगळ्या ठिकाणी असते व साप पकडल्यानंतर तो त्याच्या वास्तव स्थानीच सोडला जाणे आवश्यक असते. मात्र बऱ्याच सर्पमित्रांना सापांविषयी माहिती नसते. त्यामुळे पकडलेला साप कोणत्या प्रजातीचा आहे हे कळत नसल्याने कोणत्याही जंगलात सोडला जातो. मात्र अशावेळी सापाला अनुकूल असे वास्तवस्थान मिळत नसल्याने साप फार काळ जगू शकत नाहीत. उभयचर व सरपटणाऱ्या प्राण्यांचे आश्रयस्थान नष्ट होत असल्याने या प्राण्यांचे अस्तित्व नष्ट होण्याची अनेक कारण समोर आली आहेत. आपल्या परिसरातील जंगल झुडपे नष्ट होत चालली आहेत. जंगलात लागणारी आग पण एक प्रमुख कारण आहे. पावसाळ्यात बिळात पाणी गेल्याने सुध्दा साप रस्त्यावर येतात आणि भरघाव वाहनाखाली येऊन रोज शेकडो सापांचा मृत्यू होत आहे. वनविभागाने पुढे येऊन गांभीर्याने साप वाचवण्याची मोहीम बळकट करण्याची गरज आहे.

-----------------------------

सर्पमित्रांना मूलभूत सुविधा पुरविणे गरजेचे

सर्पदंश झाल्यानंतर कोणत्या प्रकारचा साप रुग्णाला चावला याविषयी डॉक्टर साशंक असतात. डॉक्टर तसेच सर्पमित्रांना सापांविषयी ज्ञान देण्याची जबाबदारी वनविभागाची असून सुध्दा लक्ष दिले जात नाही. वाघांच्या संवर्धनावर जेवढे लक्ष दिले जाते, तेवढे लक्ष उभयचर व सरपटणाऱ्या प्राण्यांकडे दिले जात नाही. त्यामुळे सापांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सरकारी उदासीनता अशीच कायम राहिली तर भविष्यात कदाचित सापांचे अस्तित्त्वच राहणार नाही. मग नागपंचमी कुणासाठी साजरी करणार, असाही प्रश्न उपस्थित होईल.