शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

नगर पंचायतीत गोंधळात गोंधळ

By admin | Updated: April 28, 2016 01:31 IST

तालुका स्थळावरील ग्रामपंचायतींचे विकेंद्रीकरण होऊन नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले. मात्र यावर देखरेख ठेवणारे अधिकारी व कर्मचारी नसल्याने गोंधळात गोंधळ सुरू आहे.

अधिकारी-कर्मचारी नाही : विकासकामांना बसली खीळअर्जुनी-मोरगाव : तालुका स्थळावरील ग्रामपंचायतींचे विकेंद्रीकरण होऊन नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले. मात्र यावर देखरेख ठेवणारे अधिकारी व कर्मचारी नसल्याने गोंधळात गोंधळ सुरू आहे. विकास कामांसाठी आलेल्या निधीचा वापर होताना दिसत नसल्याने शहरातील विकासकामांना खिळ बसली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी मूग गिळून बघ्याची भूमिका घेत आहेत. शासनाने तालुकास्थळी नगरपंचायती स्थापन केल्या. आॅक्टोबर २०१५ ला निवडणुका पार पडल्या. कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने येथे बहुरंगी पक्षाची सत्ता स्थापन झाली. ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या कामकाजात बरीच तफावत आहे. नगरपंचायतीच्या कारभाराचा अनुभव नसल्याने ग्रामपंचायतीसारखाच गाडा हाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथे मुख्याधिकारी नाही. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या भरवशावर कसाबसा गाडा सुरू आहे. सहा महिने लोटले खरे मात्र पदाधिकारी व नगरसेवकांना खुर्च्या मोडण्यापलिकडे कामकाजच नाही. नगर पंचायतमध्ये कनिष्ठ अभियंत्याचे पद रिक्त आहे. कित्येक दिवसांपासून नवीन बांधकामाचे नाहरकत प्रमाणपत्र प्रस्ताव अडकून पडले आहेत. शासकीय कर्मचारी हे कर्जाची उचल करून निवासी इमारत बांधकाम करतात. त्यासाठी नगर पंचायतकडून दस्ताऐवजांची गरज भासते. मात्र कनिष्ठ अभियंता नसल्याने असे सर्व प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. यामुळे घरबांधकामाची प्रकरणे बँकाकडे सादर करता येऊ शकली नसल्याने कर्जाची उचल करून बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे. स्थानिक सार्वजनिक बांधकाम उपविभागातील एका कनिष्ठ अभियंत्याची यासाठी नियुक्ती करण्यात आली. मात्र अद्यापही पदभार झाला नसल्याचे समजते. नगर पंचायतची रोकड पुस्तिका जानेवारी २०१६ पासून पूर्ण भरण्यात आली नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सोबतच ठराव पुस्तिका अपूर्ण असल्याने वारंवार या मुद्यावरून सभा तहकूब केल्या जात आहेत. १३ एप्रिलची सभा अशीच तहकूब झाली आहे. येथे वारेमाप खरेदी सुरू आहे. १३ वा वित्त आयोगाच्या निधीतून साहित्य खरेदी करण्यात आली. ही खरेदी लाखो रुपयांची आहे. यासाठी एका हिंदी दैनिकात जाहिरात देण्यात आली. लगेच दुसऱ्या दिवशी निविदा उघडण्यात आल्याची माहिती एका नगरसेवकाने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे. रोकड पुस्तिका अद्यावत नसल्याने १०० सिमेंट आसन खुर्च्याच्या आॅर्डरची राशी देय करता येऊ शकली नाही. याच कारणांमुळे एप्रिल अखेरपर्यंत नगर पंचायतची मार्च एंडिंग पूर्ण होऊ शकली नसल्याच्या चर्चा आहेत. अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करीत आहेत. एकूणच नगरपंचायतमध्ये गोंधळात गोंधळ सुरू आहे व यावर देखरेख ठेवण्यात व सुशासन चालविण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. (तालुका प्रतिनिधी)गेल्या १३ एप्रिल रोजी मासिक सभा तहकूब झाल्यानंतर चर्चेदरम्यान नगरसेवक माणिक घनाडे यांनी महिला व बालविकास सभापती ममता पवार यांच्याशी असभ्य वागून धमकी दिली. विरोध दर्शविला असता जाती संरक्षणास मिळालेल्या कायद्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप ममता पवार यांनी केला आहे. नगर पंचायतीत नऊ महिला नगरसेविका आहेत. महिलांना बोलण्याचे स्वातंत्र्य नसेल, ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे. या महिला नगरसेवकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी व असभ्य वागणाऱ्या नगरसेवकाला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याची त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली असून याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सभागृहात सर्वांनाच बोलण्याचा अधिकार आहे. मी कोणतेही असभ्य वक्तव्य सभागृहात केले नाही. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत, अशी प्रतिक्रिया माणिक घनाडे यांनी व्यक्त केली.