शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नगर पंचायतीचे भिजत घोंगडे

By admin | Updated: March 2, 2016 02:15 IST

येथील ग्रामपंचायत विसर्जित होऊन नगर पंचायत अस्तित्वात आली. मात्र स्थायी मुख्याधिकारी व कर्मचारीवृंद नसल्याने कामकाज ठप्प पडले आहे.

स्थायी प्रशासन नाही : निधी परतीच्या मार्गावर अर्जुनी-मोरगाव : येथील ग्रामपंचायत विसर्जित होऊन नगर पंचायत अस्तित्वात आली. मात्र स्थायी मुख्याधिकारी व कर्मचारीवृंद नसल्याने कामकाज ठप्प पडले आहे. नगरातील विकासकामे, जनतेची गाऱ्हाणी व उद्भवणाऱ्या ज्वलंत समस्या ऐरणीवर आहेत. शासनाकडून आलेल्या निधीचा महिनाभरात खर्च न झाल्यास हा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. नगरसेवक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. महाराष्ट्र शासनाने तालुका स्थळावरील ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला. मात्र मनुष्यबळ उपलब्ध करून दिले नाही. दर्जा मिळून सहा महिने लोटले. या कालावधीत आतापर्यंत तब्बल डझनभर प्रशासक नेमले. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी नगरपंचायतीची अवस्था आहे. रहिवासी दाखले व जन्ममृत्यूची नोंद या पलीकडे कामेच होत नाहीत. या ठिकाणी अभियंता, लिपिकवर्गीय कर्मचारी नियुक्त नाहीत. रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर डोलारा उभा आहे. महिनाभरापूर्वी एका नायब तहसीलदाराची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. ८-१० दिवस कारभार सांभाळला आणि लगेच ते प्रशिक्षणावर निघून गेले. दुसऱ्या नायब तहसीलदाराला १५ दिवसांपूर्वी प्रभार दिला. त्यांनी अद्याप नगरपंचायत कार्यालयाची पायरी शिवली नाही. तहसील कार्यालयात बसून स्वाक्षरीची कामे केली जात आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने जबाबदारी सोपविली. मात्र त्यांना केवळ अवैध खनिजाचे ट्रॅक्टर अडविण्यातच स्वारस्य आहे. कारभार चालत आहे, यातच जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी धन्यता मानतात. दलीत वस्ती सुधार योजनेचा निधी आलाच नाही. हा निधी भंडारा जिल्ह्यातील काही नगरपंचायतींना प्राप्त झाला आहे. मात्र येथे कुणी वालीच नसल्याने विकासकामांना खीळ बसली आहे. चौदावा वित्त आयोग व इतर निधी मिळून सुमारे ६० लाख रुपयांचा निधी नगरपंचायतकडे शिल्लक आहे. मात्र हा निधी खर्च करण्यासाठी येथे जवाबदार अधिकारीच नसल्याने खोळंबा होत आहे. ३१ मार्चपर्यंत कामे न झाल्यास काही निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे.नगरसेवक नगरपंचायत कार्यालयात लोकांची कामे घेऊन येतात. मात्र त्यांची कामे होत नसल्याने त्यांना निराश होऊन परत जावे लागते. त्यामुळे त्यांनी आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नगरपंचायतचे बांधकाम सभापती प्रकाश शहारे, गटनेता देवेद्र टेंभरे, नरगसेवक मुकेश जायसवाल, माणिक घनाडे, यशकुमार शहारे यांनी लोकमतशी बोलताना सदर प्रतिक्रिया व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)