शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

चुरडी हत्याकांडाचे गूढ कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:31 IST

गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या चुरडी प्रकरणात तिघांची हत्या, तर रेवचंदचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी प्रेसनोटद्वारे दिली. रेवचंदने ...

गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या चुरडी प्रकरणात तिघांची हत्या, तर रेवचंदचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी प्रेसनोटद्वारे दिली. रेवचंदने आत्महत्या का केली, त्याने इतर तिघांना मारले का? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती तिरोडाचे ठाणेदार योगेश पारधी यांनी दिली आहे.

सोमवारी (दि.२०) रात्री ही घटना घडली. रेवचंद डोंगरू बिसेन (वय ५१), त्यांची पत्नी मालता रेवचंद्र बिसेन (४५), मुलगी पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व मुलगा तेजस रेवचंद बिसेन (१७) या चौघांचा खून करण्यात आला; परंतु रेवचंदची आत्महत्या नसून त्याचाही खून असल्याच्या चर्चा जोरदार आहेत. तपासाच्या नावावर या घटनेच्या तपासाची माहिती देण्याचे पोलीस टाळतात. बिसेन कुटुंबात घडलेली एवढी मोठी घटना कुण्या एका व्यक्तीकडून करण्यात आली नसावी, तर या घटनेत एकापेक्षा अनेक आरोपींचा समावेश असावा, असा दाट संशय आहे. तिघांवर वार करून ठार करण्यात आले, तर रेवचंदचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. गळा आवळल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, असे उत्तरीय तपासात पुढे आले; परंतु त्याचा गळा आवळून नंतर लटकविण्यात आले की त्याने स्वत: गळफास घेतला ही बाब समोर आली नाही. मालता बिसेन, पौर्णिमा बिसेन व तेजस बिसेन (१७) रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या तिघांना यमसदनी पाठविणारा आरोपी एक नसावा तर हे कृत्य अनेकांचे असावे, रेवचंदने जर हे कृत्य केले तर त्या मागील ठोस कारण काय याचा शोध सुरू असल्याचे तिरोडाचे ठाणेदार योगेश पारधी यांनी सांगितले आहे.

..............

सायबर सेलच्या हातात काय लागले?

चार दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांनी प्रसिद्धीपत्रक काढून सायबर सेलही या घटनेचा तपास करीत असल्याचे सांगितले. सायबर सेलला या घटनेत आतापर्यंत काय हाती लागले. मृतकांची कोणा कोणासोबत काय-काय झालेली चॅटिंग या सर्वच गोष्टीचा उलगडा होणार का याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.