शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

एक घागर पाण्याने दिवस काढावा लागतो

By admin | Updated: May 31, 2015 00:44 IST

जवळपास वळद गावातील लोकसंख्या १६७० एवढी आहे. गावातील शासकीय व खासगी विहीर आटल्या आहेत.

पाण्याची चणचण : वळदगावच्या विहिरी आटल्याआमगाव : जवळपास वळद गावातील लोकसंख्या १६७० एवढी आहे. गावातील शासकीय व खासगी विहीर आटल्या आहेत. बोअरवेल मधून पाणी निघत नाही. फक्त जुन्या नळ योजनेचा एक घागर पाणी घेऊन वळद गावकरी दिवस काढत आहेत. एवढी गंभीर समस्या पाण्याची या गावात आहे. २० वर्षापूर्वी ३० हजार लिटर पाणी क्षमतेची टाकी तयार करण्यात आली. त्यावेळी गावाची लोकसंख्या ७५० होती. आज लोकसंख्या दुप्पट झाली आहे. गावात जुन्या नळ योजनेचे पाईप प्रत्येक वार्डात आहेत. मात्र पूर्ण गावाला ३० हजार लिटरची नळ योजना कुचकामी ठरली आहे. फक्त एक घागर पाणी प्रत्येक घराला मिळत आहेत. बोअरवेलमधून जलस्तर खाली गेल्याने पाणी निघत नाही. गावातील मालगुजारी तलावात ओवारा मध्यम प्रकल्पाचे पाणी सोडले तर वळद येथील पाणी समस्या मिटू शकतो. ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडने कालव्याला अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा काही दिवसांनी वळद येथील पाणी समस्या उग्ररुप धारण केल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांच्या समस्येचा विचार करता तत्काळ कालव्याला ओवारा प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी सरपंच उषा परिहार, उपसरपंच खेमचंद पटले, किशोर रहांगडाले, कल्पना तुरकर, कांता कोडापे, शिवसागर परिहार, संतोष पारधी, धनलाल कटरे व अन्य ग्रामस्थांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)प्रशासकीय तयारी कागदावरचदरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन केले जाते. त्यासाठी शासनाकडून बराच निधीही मिळतो. मात्र प्रशासकीय तयारी कागदावरच राहते. प्रत्यक्षात कामे होतच नाहीत. गावकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी आणि ती दूर करण्यासाठी कोणीही पुढाकार घेण्यास तयार नाही. लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेऊन समस्या सोडविणे गरजेचे आहे.गावकऱ्यांना दिलासा देण्याची गरजओवारा प्रकल्पाचे पाणी वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा या गावाना पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे. कालव्याला पाणी सोडण्याची कार्यकारी अभियंता गोंदिया यांना उपविभागीय अधिकारी देवरी यांच्यामार्फत १० डिसेंबर २०१४ ला देण्यात आले. मात्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्यामुळे अनेक गावात टंचाई कायम आहे.पाण्यासाठी नागरिकांची करावी लागते कसरत ग्रामपंचायत पाऊलदौना अंतर्गत येत असलेल्या बाघडोंगरी गावात पिण्याच्या व घरगुती वापरात येणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील बोअरवेल, विहिर कोरड्या पडल्या आहेत. तलावातील पाणी बैलबंडीने ड्रमद्वारे आणले जात आहे. अनेक वर्षांपासून बाघडोंगरीत पिण्याच्या व घरगुती वापराकरिता पाणी ही मोठी गंभीर समस्या आहे. या गावात गोंड समाज जास्त आहे. ग्रामपंचायत पाऊलदौना अंतर्गत बाघडोंगरी, पिपरटोला, बाघाटोला, जांभुळटोला यांना मोठी नळयोजना अत्यंत गरजेची आहे.