शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

एक घागर पाण्याने दिवस काढावा लागतो

By admin | Updated: May 31, 2015 00:44 IST

जवळपास वळद गावातील लोकसंख्या १६७० एवढी आहे. गावातील शासकीय व खासगी विहीर आटल्या आहेत.

पाण्याची चणचण : वळदगावच्या विहिरी आटल्याआमगाव : जवळपास वळद गावातील लोकसंख्या १६७० एवढी आहे. गावातील शासकीय व खासगी विहीर आटल्या आहेत. बोअरवेल मधून पाणी निघत नाही. फक्त जुन्या नळ योजनेचा एक घागर पाणी घेऊन वळद गावकरी दिवस काढत आहेत. एवढी गंभीर समस्या पाण्याची या गावात आहे. २० वर्षापूर्वी ३० हजार लिटर पाणी क्षमतेची टाकी तयार करण्यात आली. त्यावेळी गावाची लोकसंख्या ७५० होती. आज लोकसंख्या दुप्पट झाली आहे. गावात जुन्या नळ योजनेचे पाईप प्रत्येक वार्डात आहेत. मात्र पूर्ण गावाला ३० हजार लिटरची नळ योजना कुचकामी ठरली आहे. फक्त एक घागर पाणी प्रत्येक घराला मिळत आहेत. बोअरवेलमधून जलस्तर खाली गेल्याने पाणी निघत नाही. गावातील मालगुजारी तलावात ओवारा मध्यम प्रकल्पाचे पाणी सोडले तर वळद येथील पाणी समस्या मिटू शकतो. ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडने कालव्याला अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा काही दिवसांनी वळद येथील पाणी समस्या उग्ररुप धारण केल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांच्या समस्येचा विचार करता तत्काळ कालव्याला ओवारा प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी सरपंच उषा परिहार, उपसरपंच खेमचंद पटले, किशोर रहांगडाले, कल्पना तुरकर, कांता कोडापे, शिवसागर परिहार, संतोष पारधी, धनलाल कटरे व अन्य ग्रामस्थांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)प्रशासकीय तयारी कागदावरचदरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन केले जाते. त्यासाठी शासनाकडून बराच निधीही मिळतो. मात्र प्रशासकीय तयारी कागदावरच राहते. प्रत्यक्षात कामे होतच नाहीत. गावकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी आणि ती दूर करण्यासाठी कोणीही पुढाकार घेण्यास तयार नाही. लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेऊन समस्या सोडविणे गरजेचे आहे.गावकऱ्यांना दिलासा देण्याची गरजओवारा प्रकल्पाचे पाणी वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा या गावाना पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे. कालव्याला पाणी सोडण्याची कार्यकारी अभियंता गोंदिया यांना उपविभागीय अधिकारी देवरी यांच्यामार्फत १० डिसेंबर २०१४ ला देण्यात आले. मात्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्यामुळे अनेक गावात टंचाई कायम आहे.पाण्यासाठी नागरिकांची करावी लागते कसरत ग्रामपंचायत पाऊलदौना अंतर्गत येत असलेल्या बाघडोंगरी गावात पिण्याच्या व घरगुती वापरात येणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील बोअरवेल, विहिर कोरड्या पडल्या आहेत. तलावातील पाणी बैलबंडीने ड्रमद्वारे आणले जात आहे. अनेक वर्षांपासून बाघडोंगरीत पिण्याच्या व घरगुती वापराकरिता पाणी ही मोठी गंभीर समस्या आहे. या गावात गोंड समाज जास्त आहे. ग्रामपंचायत पाऊलदौना अंतर्गत बाघडोंगरी, पिपरटोला, बाघाटोला, जांभुळटोला यांना मोठी नळयोजना अत्यंत गरजेची आहे.