शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

मूशानझोरवा विकासापासून कोसो दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST

मूशानझोरवा हे गाव खडकी-टोला गावापासून २ किमी. अंतरवर आहे. या गाव परिसरात अस्वल, बिबट, रानगवा, तडस आदी प्राण्यांचा नेहमीच वावर असतो. जंगल व्याप्त रस्ता असल्यामुळे ये-जा करणे कठीण झाले आहे. गावात ५ वर्षां खालील १० बालके असून त्यांना शासनाचे बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून आहार पुरविला जात नसल्याची माहिती पुढे आली आहे. तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडी केंद्र उघडण्याची नितांत गरज आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी शिक्षणापासून वंचित : अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

राजेश मुनिश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तालुक्यातील काही गावे आजही विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ६ वरील पूर्वेस ६ किलामीटर अंतरावर असलेल्या मुशानझोरवा गावाचा आजही विकास झाल्याचे दिसून येत नाही.तालुक्यातील खडकी ग्रामपंचायत अंतर्गत डोंगरगाव-डेपो, खडकी, खडकी-टोला व मुशानझोरवा या गावांची गट ग्रामपंचायत खडकी आहे. मुशनझोरवा हे आदिवासी बहूल गाव आजही विकासापासून कोसो दूर आहे. या गावाची लोकसंख्या ४६ असून भलावी, मडावी, वरखडे, परतेकी हे गोंड समाजाचे लोक एकोप्याने राहतात. गावाला लागूनच नवेगाव- नागझिरा अभयारण्य आहे.गोंड समाजाचे लोक शेती करून आपली उपजीविका चालवितात. मात्र रोजगारासाठी त्यांना इतरत्र भटकावे लागत आहे. शेती आहे पण रानटी प्राण्यांच्या उपद्व्यापामुळे पिकाची चांगलीच नासाडी करतात.मूशानझोरवा हे गाव खडकी-टोला गावापासून २ किमी. अंतरवर आहे. या गाव परिसरात अस्वल, बिबट, रानगवा, तडस आदी प्राण्यांचा नेहमीच वावर असतो. जंगल व्याप्त रस्ता असल्यामुळे ये-जा करणे कठीण झाले आहे. गावात ५ वर्षां खालील १० बालके असून त्यांना शासनाचे बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून आहार पुरविला जात नसल्याची माहिती पुढे आली आहे. तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडी केंद्र उघडण्याची नितांत गरज आहे. गावात शाळा नसल्यामुळे ५ वर्षांपेक्षा मोठ्या बालकांना शिक्षण घेण्यासाठी खडकी गावात पायी जावे लागते. शासकीय-निमशासकीय कामांसाठी व बाजारानिमित्त सडक-अर्जुनी येथे १५ किलोमीटर यावे लागते. त्यात बस सुविधा नसल्याने जास्तच त्रास सहन करावा लागतो. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दर्शन होत नसल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील डोंगरपायथ्याशी असलेल्या मूशानझोरवा गावात कोणताही मोठा अधिकारी आजपर्यंत कधीच गेला नाही, हे विशेष. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसून जंगलातून वाट शोधत मूशानझोरवा गावाकडे नागरिकांना वाट शोधत जावे लागते. विशेष म्हणजे, रात्रीच्यावेळी त्यांची पाळीव कुत्री सोबतीला असतात.गाव जंगलात असल्यामुळे वन्यप्राण्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त बळावली आहे. त्यासाठी वन्य जीव विभागाने प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गावाचे बाहेर तारांची सुरक्षा भिंत करण्याची नितांत गरज आहे.मूशानझोरवा गावची लोकसंख्या फारच कमी असल्यामुळे तिथे मिनी अंगणवाडी केंद्र देण्यासंबंधी माहिती शासनाकडे पाठविली आहे.-प्रकाश मेंढेबाल विकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती, सडक अर्जुनी