शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पालिकेच्या मोहिमेने शहरातील पशुपालक नाराज

By admin | Updated: September 19, 2016 00:24 IST

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला होत असलेली अडसर शिवाय अपघातांवर आळा बसावा यासाठी नगर परिषदेने शहरात मोकाट जनावरांची धरपकड मोहीम सुरू केली आहे.

कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची : कोंडवाड्याचे कुलूप तोडले गोंदिया : मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला होत असलेली अडसर शिवाय अपघातांवर आळा बसावा यासाठी नगर परिषदेने शहरात मोकाट जनावरांची धरपकड मोहीम सुरू केली आहे. मात्र पालिकेच्या या मोहिमेमुळे पशुपालक नाराज असून ते पशू पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची करीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी मोकाट पशुंना बंद करून ठेवलेल्या कोंडवाड्याचे कुलूपही तोडल्याची माहिती आहे. शहरात बघावे तेथे रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर दिसून येत होता. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडसर होत असून नागरिकांना वाहन चालविणे कठीण होऊ लागले होते. शिवाय रात्रीच्या वेळी विशेषत: मोकाट जनांवरांमुळे अपघात घडले आहेत. विशेष म्हणजे जनावरांमुळे घडलेल्या अपघातांत जीवीतहानीही झाली आहे. या सर्व बाबींना लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी मध्यंतरी बैठक बोलावून नगर परिषदेला मोकाट जनावरांना पकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. तसेच पोलीस विभागाकडूनही नगर परिषदेला मोकाट जनावरांची व्यवस्था करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले होते. या सर्व बाबींना गांभीर्याने घेत नगर परिषदेने शहरातील मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. नगर परिषदेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे सध्या प्रायोगीक तत्वावर कंत्राटी पद्धतीवर २९ आॅगस्ट पासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून यासाठी एक विशेष वाहन कार्यरत आहे. या वाहनात मोकाट जनावरे पकडून त्यांना नगर परिषदेच्या बाजूला जुन्या अग्निशमन कार्यालयात सोडले जात आहे. पालिकेच्या या मोहिमेचे शहरवासीयांकडून कौतूक केले जात आहे. मात्र पशुपालकांत या मोहिमेने रोष व्याप्त आहे. पशुंना पकडण्यात येत असल्याने हे पशुपालक आता भांडणावर उतरले असल्याचीही माहिती आहे. शिवाय ते पशु पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची करीत असल्याचेही कळले. तर दोन दिवसांपूर्वी पशुंना कोंडून ठेवण्यात येत असलेल्या कोंडवाड्याचे कुलूप तोडण्यात आल्याचा प्रकारही घडल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे पशू पकडणारे कर्मचारी दहशतीत वावरत आहेत. फाडली जाते ३०० रूपयांची पावती पशुंना पकडण्यात आल्यानंतर त्यांना सोडण्यासाठी नगर परिषदेकडून ३०० रूपयांची पावती फाडली जात आहे. पावती फाडल्यानंतरच पशुला सोडले जात आहे. पैसे लागत असल्यामुळेच पशुपालक संतापले आहेत. आतापर्यंत पशु मोकाट फिरत होते याची त्यांना चिंता नव्हती. मात्र आता पशुंना सोडविण्यासाठी पैसे लागत असल्याने ते भांडणावर आले आहेत. पशुपालकांच्या सहकार्याची गरज मोकाट पशुंमुळे होत असलेले अपघात टाळण्यासाठी व वाहतुकीची अडसर दूर करण्यासाठी पालिकेने ही मोहिम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे अपघातांत एखादा मनुष्य जखमी होऊन जीवीतहानीची शक्यता टाळता येत नाही. तर दुसरीकडे पशुंच्या जीवावरही बेतणार असल्याची शक्यता टाळता येत नाही. यासाठी पशु पकडणे सुरू आहे. त्यामुळे पशुपालकांनी पालिकेला सहकार्य करण्याची गरज आहे.