शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या मोहिमेने शहरातील पशुपालक नाराज

By admin | Updated: September 19, 2016 00:24 IST

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला होत असलेली अडसर शिवाय अपघातांवर आळा बसावा यासाठी नगर परिषदेने शहरात मोकाट जनावरांची धरपकड मोहीम सुरू केली आहे.

कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची : कोंडवाड्याचे कुलूप तोडले गोंदिया : मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला होत असलेली अडसर शिवाय अपघातांवर आळा बसावा यासाठी नगर परिषदेने शहरात मोकाट जनावरांची धरपकड मोहीम सुरू केली आहे. मात्र पालिकेच्या या मोहिमेमुळे पशुपालक नाराज असून ते पशू पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची करीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी मोकाट पशुंना बंद करून ठेवलेल्या कोंडवाड्याचे कुलूपही तोडल्याची माहिती आहे. शहरात बघावे तेथे रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर दिसून येत होता. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडसर होत असून नागरिकांना वाहन चालविणे कठीण होऊ लागले होते. शिवाय रात्रीच्या वेळी विशेषत: मोकाट जनांवरांमुळे अपघात घडले आहेत. विशेष म्हणजे जनावरांमुळे घडलेल्या अपघातांत जीवीतहानीही झाली आहे. या सर्व बाबींना लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी मध्यंतरी बैठक बोलावून नगर परिषदेला मोकाट जनावरांना पकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. तसेच पोलीस विभागाकडूनही नगर परिषदेला मोकाट जनावरांची व्यवस्था करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले होते. या सर्व बाबींना गांभीर्याने घेत नगर परिषदेने शहरातील मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. नगर परिषदेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे सध्या प्रायोगीक तत्वावर कंत्राटी पद्धतीवर २९ आॅगस्ट पासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून यासाठी एक विशेष वाहन कार्यरत आहे. या वाहनात मोकाट जनावरे पकडून त्यांना नगर परिषदेच्या बाजूला जुन्या अग्निशमन कार्यालयात सोडले जात आहे. पालिकेच्या या मोहिमेचे शहरवासीयांकडून कौतूक केले जात आहे. मात्र पशुपालकांत या मोहिमेने रोष व्याप्त आहे. पशुंना पकडण्यात येत असल्याने हे पशुपालक आता भांडणावर उतरले असल्याचीही माहिती आहे. शिवाय ते पशु पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची करीत असल्याचेही कळले. तर दोन दिवसांपूर्वी पशुंना कोंडून ठेवण्यात येत असलेल्या कोंडवाड्याचे कुलूप तोडण्यात आल्याचा प्रकारही घडल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे पशू पकडणारे कर्मचारी दहशतीत वावरत आहेत. फाडली जाते ३०० रूपयांची पावती पशुंना पकडण्यात आल्यानंतर त्यांना सोडण्यासाठी नगर परिषदेकडून ३०० रूपयांची पावती फाडली जात आहे. पावती फाडल्यानंतरच पशुला सोडले जात आहे. पैसे लागत असल्यामुळेच पशुपालक संतापले आहेत. आतापर्यंत पशु मोकाट फिरत होते याची त्यांना चिंता नव्हती. मात्र आता पशुंना सोडविण्यासाठी पैसे लागत असल्याने ते भांडणावर आले आहेत. पशुपालकांच्या सहकार्याची गरज मोकाट पशुंमुळे होत असलेले अपघात टाळण्यासाठी व वाहतुकीची अडसर दूर करण्यासाठी पालिकेने ही मोहिम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे अपघातांत एखादा मनुष्य जखमी होऊन जीवीतहानीची शक्यता टाळता येत नाही. तर दुसरीकडे पशुंच्या जीवावरही बेतणार असल्याची शक्यता टाळता येत नाही. यासाठी पशु पकडणे सुरू आहे. त्यामुळे पशुपालकांनी पालिकेला सहकार्य करण्याची गरज आहे.