शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

महावितरणने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:36 IST

आमगाव : आधीच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच आता महावितरणकडून शेतकऱ्यांचा विद्युत ...

आमगाव : आधीच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच आता महावितरणकडून शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे शेतकरी संकटात आला असून, ही मोहीम शासनाने त्वरित थांबवावी, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडू नये, असा इशारा जनहित अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष भरत मडावी यांनी दिला आहे.

महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांसोबतच कृषिपंपाचा देखील वीज पुरवठा खंडित केला जात आहे. कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित झाल्यास सर्व शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गंभीरपणे दखल घेऊन कृषी पंपाचे विद्युत पुरवठा खंडित करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरणकडून शेतकऱ्यांना रीडिंग न घेताच वीज बिल दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. याला महावितरण जबाबदार असून, कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरण कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम त्वरित थांबविली नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनहित अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष भरत मडावी यांनी दिला आहे.