शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:36 IST

आमगाव : आधीच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच आता महावितरणकडून शेतकऱ्यांचा विद्युत ...

आमगाव : आधीच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच आता महावितरणकडून शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे शेतकरी संकटात आला असून, ही मोहीम शासनाने त्वरित थांबवावी, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडू नये, असा इशारा जनहित अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष भरत मडावी यांनी दिला आहे.

महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांसोबतच कृषिपंपाचा देखील वीज पुरवठा खंडित केला जात आहे. कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित झाल्यास सर्व शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गंभीरपणे दखल घेऊन कृषी पंपाचे विद्युत पुरवठा खंडित करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरणकडून शेतकऱ्यांना रीडिंग न घेताच वीज बिल दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. याला महावितरण जबाबदार असून, कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरण कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम त्वरित थांबविली नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनहित अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष भरत मडावी यांनी दिला आहे.