शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

महावितरणने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:36 IST

आमगाव : आधीच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच आता महावितरणकडून शेतकऱ्यांचा विद्युत ...

आमगाव : आधीच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच आता महावितरणकडून शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे शेतकरी संकटात आला असून, ही मोहीम शासनाने त्वरित थांबवावी, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडू नये, असा इशारा जनहित अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष भरत मडावी यांनी दिला आहे.

महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांसोबतच कृषिपंपाचा देखील वीज पुरवठा खंडित केला जात आहे. कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित झाल्यास सर्व शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गंभीरपणे दखल घेऊन कृषी पंपाचे विद्युत पुरवठा खंडित करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरणकडून शेतकऱ्यांना रीडिंग न घेताच वीज बिल दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. याला महावितरण जबाबदार असून, कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरण कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम त्वरित थांबविली नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनहित अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष भरत मडावी यांनी दिला आहे.