शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

‘एमपीसीबी’कडून मोठ्या उद्योगांना ‘टार्गेट’

By admin | Updated: December 13, 2014 01:37 IST

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) भंडारा कार्यालयाकडून सध्या जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम उद्योगांना ‘टार्गेट’ करून ...

गोंदिया : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) भंडारा कार्यालयाकडून सध्या जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम उद्योगांना ‘टार्गेट’ करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र मोठ्या संख्येने असलेल्या राईस मिलसह सर्व छोट्या उद्योगांना अभय दिल्यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यशैलीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.जिल्ह्यात प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यकक्षेत येणारे मोठे ६, मध्यम २ आणि तब्बल १०२७ लघुउद्योग आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राख निर्माण करणाऱ्या राईस मिल्ससुद्धा या छोट्या उद्योगांमध्येच येतात. जिल्ह्यातील एकूण १०३५ उद्योगांपैकी सर्वाधिक धोकादायक गणल्या जाणारे (रेड ग्रेड) ३०२ उद्योग, त्यापेक्षा कमी धोकादायक (आॅरेंज ग्रेड) ४७१ तर उर्वरित धोकादायक नसलेले उद्योग (ग्रीन ग्रेड) आहेत. या सर्वच उद्योगांना वेळोवेळी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे असते. यातील रेड ग्रेडमध्ये असलेल्या उद्योगांना तर दरवर्षी नाहरकत प्रमाणपत्र घेणे अत्यावश्यक असते. त्यांची प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी तपासणीही होणे अपेक्षित असते. मात्र बोटावर मोजण्याइतक्या असलेल्या मोठ्या आणि मध्यम उद्योगांनाच हेतुपुरस्सर ‘टार्गेट’ करून संबंधित अधिकारी आपला ‘हेतू’ साध्य करण्यासाठी तत्पर असल्याचे दिसून येत आहे.इतर उद्योगांकडे वर्षभर ढुंकूनही न पाहणारे एमपीसीबीचे अधिकारी विशिष्ट उद्योगांना मात्र दर महिन्याला भेटी देऊन आपले ‘अस्तित्व’ दाखवून वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहात असल्याचे बोलले जाते. वास्तविक मोठे उद्योग स्वत:च आपल्या प्रयोगशाळांमध्ये वायू, पाणी आणि निघणाऱ्या टाकाऊ वस्तूंचे परिक्षण करून प्रदुषण होणार नाही याची वेळोवेळी काळजी घेत असतात. पण मोठ्यांकडून ‘मोठी अपेक्षा’ डोळ्यासमोर ठेवून भंडारा येथील प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कोणत्याही निमित्ताने त्यांना नोटीस बजावण्यासाठी तत्पर असतात. गोंदियात दिडशेहून जास्त असलेल्या राईस मिल्समधून दररोज मोठ्या प्रमाणात जळालेल्या धानाची राख बाहेर पडते. ती राख अनेक ठिकाणी रस्त्याच्या काठाने टाकली जाते. ही कृती नियमबाह्य असताना प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी त्याकडे डोळेझाकपणा का करतात, हे न समजणारे कोडे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)