शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

उपप्रादेशिक परिवहन कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:38 IST

कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंध या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन (आरटीओ) विभाग कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य संलग्न उपप्रादेशिक परिवहन कर्मचारी संघटना गोंदियाच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंध या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन (आरटीओ) विभाग कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य संलग्न उपप्रादेशिक परिवहन कर्मचारी संघटना गोंदियाच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. मात्र अद्यापही यावर तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे शुक्रवारी (दि.१) कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले.या वर्षी ३० जानेवारीला मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी राज्य स्तरावर ठिय्या आंदोलन करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. परंतु शासन प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाची नोंद घेतली नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचारी संवर्गाच्या संख्येचा विचार करता असलेली पदोन्नतीची नगण्य संधी व पदोन्नतीकरिता असलेले चार स्तर ( ब वर्ग फक्त १६ पदे ) व अपुºया मनुष्य बळामुळे जनतेस होत असलेला त्रास,जनमानसात होत असलेली मलिन प्रतिमा या सर्व बाबींचा विचार करु न संघटनेने प्रशासनास मोटार वाहन विभागाच्या आकृतीबंधामध्ये सुधारणा करणेबाबत संघटनेच्या वतीने १६ डिसेंबर २०१६ ला प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने वेळोवेळी तत्कालीन परिवहन आयुक्तांसोबत चर्चा झाल्या होत्या. परंतु प्रशासनाने आकृतीबंधाचा प्रस्ताव शासनास सादर करताना संघटनेने सादर केलेला प्रस्ताव विचारात न घेतल्याने संघटनेने ५ आॅक्टोबर २०१७ ला संघटनेने मूळ प्रस्तावात आतापर्यत प्रशासनाच्या मागणीनुसार यथायोग्य बदल करून आधारित प्रस्ताव सादर केला आहे.कर्मचाºयांच्या आकृतीबंध व कार्यालयीन रचना या समान महत्त्वाच्या अनेक मागण्या प्रशासन स्तरावर अकारण प्रलंबित आहेत. त्यामुळे परिवहन विभागातील वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्यास मोठा धोका निर्माण झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. सध्या पदोन्नतीस उपलब्ध असलेल्या वर्ग ब पदाची संख्या कमी करण्यात आल्याचा कर्मचारी संघटनेचा आरोप आहे. मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारी धोरणे रेटण्याचा प्रयत्न शासन व प्रशासनाने सुरु ठेवल्यास नाईलाजाने त्याविरोधात संघर्ष तीव्र करावा लागेल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी परिवहन कार्यालयासह राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले आहे. या आंदोलनात प्रशांत मांडवेकर, डी.के.पुरी, सचिन गौरखेडे, गजानन काळे, औदुंबर चौधरी, फवरसिंग राठोड, राहूल कुरतोटवार, अविनाश बरडे, वैभव भदाडे, करूणा बसवनाथे, सविता राजूरकर, कल्पना कुलसुंगे, कल्पना उईके, आर.जी.सलामे, जी.ए.मानकर, व्ही.डी.काळबांडे यांचा समावेश होता.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसStrikeसंप