शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उपप्रादेशिक परिवहन कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:38 IST

कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंध या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन (आरटीओ) विभाग कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य संलग्न उपप्रादेशिक परिवहन कर्मचारी संघटना गोंदियाच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंध या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन (आरटीओ) विभाग कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य संलग्न उपप्रादेशिक परिवहन कर्मचारी संघटना गोंदियाच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. मात्र अद्यापही यावर तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे शुक्रवारी (दि.१) कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले.या वर्षी ३० जानेवारीला मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी राज्य स्तरावर ठिय्या आंदोलन करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. परंतु शासन प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाची नोंद घेतली नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचारी संवर्गाच्या संख्येचा विचार करता असलेली पदोन्नतीची नगण्य संधी व पदोन्नतीकरिता असलेले चार स्तर ( ब वर्ग फक्त १६ पदे ) व अपुºया मनुष्य बळामुळे जनतेस होत असलेला त्रास,जनमानसात होत असलेली मलिन प्रतिमा या सर्व बाबींचा विचार करु न संघटनेने प्रशासनास मोटार वाहन विभागाच्या आकृतीबंधामध्ये सुधारणा करणेबाबत संघटनेच्या वतीने १६ डिसेंबर २०१६ ला प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने वेळोवेळी तत्कालीन परिवहन आयुक्तांसोबत चर्चा झाल्या होत्या. परंतु प्रशासनाने आकृतीबंधाचा प्रस्ताव शासनास सादर करताना संघटनेने सादर केलेला प्रस्ताव विचारात न घेतल्याने संघटनेने ५ आॅक्टोबर २०१७ ला संघटनेने मूळ प्रस्तावात आतापर्यत प्रशासनाच्या मागणीनुसार यथायोग्य बदल करून आधारित प्रस्ताव सादर केला आहे.कर्मचाºयांच्या आकृतीबंध व कार्यालयीन रचना या समान महत्त्वाच्या अनेक मागण्या प्रशासन स्तरावर अकारण प्रलंबित आहेत. त्यामुळे परिवहन विभागातील वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्यास मोठा धोका निर्माण झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. सध्या पदोन्नतीस उपलब्ध असलेल्या वर्ग ब पदाची संख्या कमी करण्यात आल्याचा कर्मचारी संघटनेचा आरोप आहे. मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारी धोरणे रेटण्याचा प्रयत्न शासन व प्रशासनाने सुरु ठेवल्यास नाईलाजाने त्याविरोधात संघर्ष तीव्र करावा लागेल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी परिवहन कार्यालयासह राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले आहे. या आंदोलनात प्रशांत मांडवेकर, डी.के.पुरी, सचिन गौरखेडे, गजानन काळे, औदुंबर चौधरी, फवरसिंग राठोड, राहूल कुरतोटवार, अविनाश बरडे, वैभव भदाडे, करूणा बसवनाथे, सविता राजूरकर, कल्पना कुलसुंगे, कल्पना उईके, आर.जी.सलामे, जी.ए.मानकर, व्ही.डी.काळबांडे यांचा समावेश होता.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसStrikeसंप