शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

पर्यावरण वाचले तरच भारतमाता वाचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

गोंदिया : जल, जंगल, प्राणी, पशू, पक्षी व खनिज पर्यावरणाच्या या घटकांसह भारतभूमीवर निवास करणाऱ्या मानवजातीचा समावेश भारतमातेत होतो. ...

गोंदिया : जल, जंगल, प्राणी, पशू, पक्षी व खनिज पर्यावरणाच्या या घटकांसह भारतभूमीवर निवास करणाऱ्या मानवजातीचा समावेश भारतमातेत होतो. आजच्या काळात मानवाला निरोगी व समृद्ध आरोग्य हवे असेल तर पर्यावरण वाचविण्याशिवाय पर्याय नाही. पर्यावरण वाचले तरच भारतमाता वाचेल, असा सूर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन विद्यार्थी संवादात सहभागींनी व्यक्त केला.

गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचलित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने प्राचार्य डाॅ. शारदा महाजन यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात ‘हमारी उम्मीद - हमारा संकल्प’नुसार पर्यावरणाला कसे वाचवायचे या विषयावर ऑनलाईन विद्यार्थी संवाद आयोजित करण्यात आला होता. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डाॅ. एच. पी. पारधी होते.

याप्रसंगी प्राचार्य डाॅ. महाजन, डाॅ. किशोर वासनिक, डाॅ. शशिकांत चौरे व प्रा. घनशाम गेडेकर उपस्थित होते. ऑनलाईन विद्यार्थी संवादात अमित गोपलानी, गौरी भेलावे, आलिया शेख, अंजली धुर्वे, विश्वनाथ उके, तृप्ती बिरोले सहभागी झाले होते. गेल्या दीड वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना या महामारीने ऑक्सिजन अर्थात पर्यावरणाची निकड किती महत्त्वाची आहे, हे दाखवून दिले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी अनेक नागरिकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले. भारतात जल व जंगलाला अर्थात पर्यावरणाला वाचविण्याचे कार्य आदिवासी बांधवांनी केले आहे.

पर्यावरण वाचविण्यासाठी १९७२ साली स्वीडन येथील स्टाॅकहोम येथे एक परिषद झाली. या परिषदेत ५० पेक्षा अधिक राष्ट्रे सहभागी झाली. त्या परिषदेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जागतिक मंचावर पर्यावरण वाचविण्याची गरज बोलून दाखविली आणि त्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ५ जून रोजी ‘पर्यावरण दिवस’ साजरा करण्यात येत आहे. हा दिवस साजरा करण्यासोबतच प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन विद्यार्थी संवादात करण्यात आले. नेहा यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

......

प्रत्येकाने एक दिवस पर्यावरणासाठी द्यावा

पर्यावरण ही सगळ्यांची गरज आहे. त्यामुळे पर्यावरण वाचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस तरी पर्यावरणाच्या कामासाठी देण्याची गरज आहे. पर्यावरण वाचविण्याची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. सर्वांच्या सहकार्यातून पर्यावरण वाचेल आणि सगळ्यांना निरोगी आयुष्य जगायला मिळेल; अन्यथा येणाऱ्या काळात प्रत्येकाला खांद्यावर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जीवन जगावे लागेल. ही वेळ येऊ नये यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन सहभागी विद्यार्थ्यांनी केले.