शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पर्यावरण वाचले तरच भारतमाता वाचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

गोंदिया : जल, जंगल, प्राणी, पशू, पक्षी व खनिज पर्यावरणाच्या या घटकांसह भारतभूमीवर निवास करणाऱ्या मानवजातीचा समावेश भारतमातेत होतो. ...

गोंदिया : जल, जंगल, प्राणी, पशू, पक्षी व खनिज पर्यावरणाच्या या घटकांसह भारतभूमीवर निवास करणाऱ्या मानवजातीचा समावेश भारतमातेत होतो. आजच्या काळात मानवाला निरोगी व समृद्ध आरोग्य हवे असेल तर पर्यावरण वाचविण्याशिवाय पर्याय नाही. पर्यावरण वाचले तरच भारतमाता वाचेल, असा सूर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन विद्यार्थी संवादात सहभागींनी व्यक्त केला.

गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचलित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने प्राचार्य डाॅ. शारदा महाजन यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात ‘हमारी उम्मीद - हमारा संकल्प’नुसार पर्यावरणाला कसे वाचवायचे या विषयावर ऑनलाईन विद्यार्थी संवाद आयोजित करण्यात आला होता. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डाॅ. एच. पी. पारधी होते.

याप्रसंगी प्राचार्य डाॅ. महाजन, डाॅ. किशोर वासनिक, डाॅ. शशिकांत चौरे व प्रा. घनशाम गेडेकर उपस्थित होते. ऑनलाईन विद्यार्थी संवादात अमित गोपलानी, गौरी भेलावे, आलिया शेख, अंजली धुर्वे, विश्वनाथ उके, तृप्ती बिरोले सहभागी झाले होते. गेल्या दीड वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना या महामारीने ऑक्सिजन अर्थात पर्यावरणाची निकड किती महत्त्वाची आहे, हे दाखवून दिले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी अनेक नागरिकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले. भारतात जल व जंगलाला अर्थात पर्यावरणाला वाचविण्याचे कार्य आदिवासी बांधवांनी केले आहे.

पर्यावरण वाचविण्यासाठी १९७२ साली स्वीडन येथील स्टाॅकहोम येथे एक परिषद झाली. या परिषदेत ५० पेक्षा अधिक राष्ट्रे सहभागी झाली. त्या परिषदेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जागतिक मंचावर पर्यावरण वाचविण्याची गरज बोलून दाखविली आणि त्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ५ जून रोजी ‘पर्यावरण दिवस’ साजरा करण्यात येत आहे. हा दिवस साजरा करण्यासोबतच प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन विद्यार्थी संवादात करण्यात आले. नेहा यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

......

प्रत्येकाने एक दिवस पर्यावरणासाठी द्यावा

पर्यावरण ही सगळ्यांची गरज आहे. त्यामुळे पर्यावरण वाचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस तरी पर्यावरणाच्या कामासाठी देण्याची गरज आहे. पर्यावरण वाचविण्याची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. सर्वांच्या सहकार्यातून पर्यावरण वाचेल आणि सगळ्यांना निरोगी आयुष्य जगायला मिळेल; अन्यथा येणाऱ्या काळात प्रत्येकाला खांद्यावर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जीवन जगावे लागेल. ही वेळ येऊ नये यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन सहभागी विद्यार्थ्यांनी केले.