शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण वाचले तरच भारतमाता वाचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

गोंदिया : जल, जंगल, प्राणी, पशू, पक्षी व खनिज पर्यावरणाच्या या घटकांसह भारतभूमीवर निवास करणाऱ्या मानवजातीचा समावेश भारतमातेत होतो. ...

गोंदिया : जल, जंगल, प्राणी, पशू, पक्षी व खनिज पर्यावरणाच्या या घटकांसह भारतभूमीवर निवास करणाऱ्या मानवजातीचा समावेश भारतमातेत होतो. आजच्या काळात मानवाला निरोगी व समृद्ध आरोग्य हवे असेल तर पर्यावरण वाचविण्याशिवाय पर्याय नाही. पर्यावरण वाचले तरच भारतमाता वाचेल, असा सूर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन विद्यार्थी संवादात सहभागींनी व्यक्त केला.

गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचलित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने प्राचार्य डाॅ. शारदा महाजन यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात ‘हमारी उम्मीद - हमारा संकल्प’नुसार पर्यावरणाला कसे वाचवायचे या विषयावर ऑनलाईन विद्यार्थी संवाद आयोजित करण्यात आला होता. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डाॅ. एच. पी. पारधी होते.

याप्रसंगी प्राचार्य डाॅ. महाजन, डाॅ. किशोर वासनिक, डाॅ. शशिकांत चौरे व प्रा. घनशाम गेडेकर उपस्थित होते. ऑनलाईन विद्यार्थी संवादात अमित गोपलानी, गौरी भेलावे, आलिया शेख, अंजली धुर्वे, विश्वनाथ उके, तृप्ती बिरोले सहभागी झाले होते. गेल्या दीड वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना या महामारीने ऑक्सिजन अर्थात पर्यावरणाची निकड किती महत्त्वाची आहे, हे दाखवून दिले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी अनेक नागरिकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले. भारतात जल व जंगलाला अर्थात पर्यावरणाला वाचविण्याचे कार्य आदिवासी बांधवांनी केले आहे.

पर्यावरण वाचविण्यासाठी १९७२ साली स्वीडन येथील स्टाॅकहोम येथे एक परिषद झाली. या परिषदेत ५० पेक्षा अधिक राष्ट्रे सहभागी झाली. त्या परिषदेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जागतिक मंचावर पर्यावरण वाचविण्याची गरज बोलून दाखविली आणि त्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ५ जून रोजी ‘पर्यावरण दिवस’ साजरा करण्यात येत आहे. हा दिवस साजरा करण्यासोबतच प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन विद्यार्थी संवादात करण्यात आले. नेहा यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

......

प्रत्येकाने एक दिवस पर्यावरणासाठी द्यावा

पर्यावरण ही सगळ्यांची गरज आहे. त्यामुळे पर्यावरण वाचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस तरी पर्यावरणाच्या कामासाठी देण्याची गरज आहे. पर्यावरण वाचविण्याची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. सर्वांच्या सहकार्यातून पर्यावरण वाचेल आणि सगळ्यांना निरोगी आयुष्य जगायला मिळेल; अन्यथा येणाऱ्या काळात प्रत्येकाला खांद्यावर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जीवन जगावे लागेल. ही वेळ येऊ नये यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन सहभागी विद्यार्थ्यांनी केले.