शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाई नाही

By admin | Updated: September 21, 2015 01:44 IST

मागील वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे व वादळी पावसामुळे केळी या फळपिकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील ..

गोंदिया : मागील वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे व वादळी पावसामुळे केळी या फळपिकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील ९५ टक्के झाडे जमीनदोस्त झाले होते. या घटनेला वर्षभराचा कालावधी लोटूनही सदर शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईपासून वंचित आहे.प्राप्त माहितीनुसार, आमगाव तालुक्याच्या सुपलीपार येथील तलाठी साजा-४ अंतर्गत येणाऱ्या गट १६६/१, १७१/१ व १७१/२ या जमिनीवर शेतकरी बेनिराम दयाराम चौधरी, कपुरा बेनिराम चौधरी, प्रवीण चौधरी, सुनिता भाजीपाले, धनिराम भाजीपाले, कमलेश भाजीपाले, तुकाराम, भाजीपाले, तुकाराम चुटे व इतर शेतकऱ्यांनी केळी पिकाची लागवड केली होती. मात्र २० ते २३ जुलै २०१४ या कालावधीत अतिवृष्टी व वादळामुळे त्यांनी लागवड केलेल्या केळीच्या झाडांपैकी ९५ टक्के झाडे जमीनदोस्त होवून लक्षावधी रूपयांचे नुकसान झाले होते. याची सूचना त्यांनी कालीमाटी येथील तलाठी कार्यालयास दिली होती. परंतु ४ आॅगस्ट २०१४ पर्यंत मौका चौकशीसाठी कुणीही आले नव्हते, असे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिले होते. सदर शेतकरी वर्ष लोटूूनही नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देवून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी सदर शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)