शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाई नाही

By admin | Updated: September 21, 2015 01:44 IST

मागील वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे व वादळी पावसामुळे केळी या फळपिकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील ..

गोंदिया : मागील वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे व वादळी पावसामुळे केळी या फळपिकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील ९५ टक्के झाडे जमीनदोस्त झाले होते. या घटनेला वर्षभराचा कालावधी लोटूनही सदर शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईपासून वंचित आहे.प्राप्त माहितीनुसार, आमगाव तालुक्याच्या सुपलीपार येथील तलाठी साजा-४ अंतर्गत येणाऱ्या गट १६६/१, १७१/१ व १७१/२ या जमिनीवर शेतकरी बेनिराम दयाराम चौधरी, कपुरा बेनिराम चौधरी, प्रवीण चौधरी, सुनिता भाजीपाले, धनिराम भाजीपाले, कमलेश भाजीपाले, तुकाराम, भाजीपाले, तुकाराम चुटे व इतर शेतकऱ्यांनी केळी पिकाची लागवड केली होती. मात्र २० ते २३ जुलै २०१४ या कालावधीत अतिवृष्टी व वादळामुळे त्यांनी लागवड केलेल्या केळीच्या झाडांपैकी ९५ टक्के झाडे जमीनदोस्त होवून लक्षावधी रूपयांचे नुकसान झाले होते. याची सूचना त्यांनी कालीमाटी येथील तलाठी कार्यालयास दिली होती. परंतु ४ आॅगस्ट २०१४ पर्यंत मौका चौकशीसाठी कुणीही आले नव्हते, असे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिले होते. सदर शेतकरी वर्ष लोटूूनही नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देवून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी सदर शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)