शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

वृक्षांची सर्रास कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:14 IST

राज्य व केंद्र सरकार पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करण्याचा मानस हाती घेवून कोट्यवधींचा निधी खर्च करून विविध योजनांमधून वृक्षांची लागवड करतो.

ठळक मुद्देसा.बां. विभागाच्या रस्त्याच्या कडेला : तिरोडा-खैरलांजी मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : राज्य व केंद्र सरकार पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करण्याचा मानस हाती घेवून कोट्यवधींचा निधी खर्च करून विविध योजनांमधून वृक्षांची लागवड करतो. पण तिरोडा तालुक्यात सर्रास रस्त्याच्या कडेला झाडांची कत्तल होत आहे. या बाबीला प्रशासन जबाबदार आहे का? अशी जनमानसात चर्चा आहे.सविस्तर वृत्त असे की, तिरोडा-खैरलांजी राज्य मार्ग क्र. ३६० वरील इंदोरा येथील पेट्रोल पंपजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन जिवंत झाडांची विद्युत आरासंचने कत्तल करुन झाडांची विल्हेवाट केली. सदर घटना सोमवारी, १५ जानेवारीच्या मध्यरात्री घडली आहे.शासकीय नियमाप्रमाणे रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांपासून रहदारीस अडथळा निर्माण होत असेल तर ती झाडे कापण्यासाठी रितसर परवानगी घेवून झाडांचा जाहीर लिलाव करावा लागतो. मात्र संबंधित विभागाला विचारणा केली असता कोणत्याही इसमाने रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने झाड तोडण्याची परवानगी घेतली नाही. अशी संबंधित विभागाकडून माहिती मिळाली. याचा अर्थ सदर वृक्षांची अज्ञात व्यक्तीने चोरी केली असावी.तसेच आजूबाजूला असलेल्या वनविभाग परिसरातही झाडांची कत्तल होत आहे. या बाबीवर वन विभागाच्या कर्मचाºयांनी लक्ष पुरवून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.सदर प्रकरणाची तक्रार संबंधित विभागाने दवनीवाडा पोलीस ठाण्यात केली आहे. आता चोरट्यांवर कोणती कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेला झालेल्या झाडांची कत्तल म्हणजेच शासकीय मालमत्तेची अफरातफर करणे आहे. जर दोषींवर कारवाई झाली नाही तर चोरींचे प्रमाण वाढेल. शासकीय मालमत्तेची मोठी नासधूस होईल. पोलीस प्रशासन व संबंधित विभागाने यांनी सखोल चौकशी करुन दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.-एस.बी. शाहूउपविभागीय अभियंता, सा.बां. विभाग, तिरोडा