शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांत जिरतोय पैसा

By admin | Updated: March 28, 2017 00:50 IST

वाढत्या लोकसंख्येसोबतच पाण्याचा वापरही वाढत चालला आहे. यामुळे आता भुगर्भातील पाणीही खेचून काढले जात असून तेच पाण्याचे मुख्य स्त्रोत ठरत आहे.

बंधारे ठरताहेत शोभेचे : अधिकाऱ्यांची मनमर्जी, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्षसौंदड : वाढत्या लोकसंख्येसोबतच पाण्याचा वापरही वाढत चालला आहे. यामुळे आता भुगर्भातील पाणीही खेचून काढले जात असून तेच पाण्याचे मुख्य स्त्रोत ठरत आहे. यामुळे मात्र भुगर्भातील पाण्याची पातळी घसरत चालली आहे. पाण्याची ही समस्या लक्षात घेत शासनाकडून ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ अभियान राबविले जात आहे. यात शेत तळी, वनराई बंधारे, सिमेंट बंधारे आदिंच्या माध्यमातून पाणी अडवून जिरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या बंधाऱ्यांत पाणी दिसून येत नाही. अशात लाखो रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या बंधाऱ्यांत पाणीच जिरतेय असे दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. पाणी अडवा ही मोहिम जरी जुनी असली तरी जे सरकार येते ते आपल्या पद्धतीने त्याचे नामकरण करते. ही मोहिम जिल्ह्यातील शासकीय कार्यालय व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबविली जाते व त्यावर लाखो रूपयांची कामे केली जातात. मात्र कंत्राटदारांकडून तयार करण्यात आलेले बंधारे निरूपयोगी ठरत आहेत. निकृष्ट बांधकामांमुळे काही ठिकाणी बंधारेच वाहून गेल्याचेही प्रकार घडले आहेत. मात्र या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी कुणालाही वेळ नाही. त्यामुळे या मोहिमेचा फज्जा उडाला आहे. बंधाऱ्यांचे कंत्राट मर्जीतील व्यक्तींना दिले जातात. त्यामुळे ते राजकीय अभय असल्याच्या अविर्भावात निकृष्ट साहित्याचा वापर करून माया जमवितात. मात्र त्या पलीकडे समाजासाठी काहीच केल्याचे दिसून येत नाही. काही ठिकाणी तर लोकप्रतिनिधीच कामे करीत असून नाव फक्त दुसऱ्याचे असल्याचे दिसून येते. यातूनच निकृष्ट दर्जाच्या कामांना सुरूवात होते. बांधकामाच्या कामात सर्वांचेच कमिशन राहात असल्याचे बोलले जाते. अशात बांधकामाचा दर्जाही कसा राहणार? याचा अंदाज येतो. त्यामुळे जिल्ह्यात जे बंधारे निकृष्ट दर्जाचे प्रतीक असतील त्यांची दुरूस्ती करणे व नव्याने बांधकाम होत असलेल्या बंधाऱ्यांची कंत्राटदाराकडूनच ५-१० वर्षांपर्यंत देखरेख असावी, असा नियम करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा जलसंधारणाच्या योजना फसत जातील. याकडे वरिष्ठ जनप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे. अन्यथा पाणी टंचाईची झळ वाढतच जाणार व एकेकाळी पाण्यापुढे रक्त स्वस्त होणार. त्यामुळे पाण्याचे वेळीच नियोजन करणे हाच एकमेव उपाय आहे. (वार्ताहर)नदीच केली कोरडी येथील चुलबंद नदीवर दोन बंधारे आहेत. मात्र दोन्ही निकामी आहेत. यात सौंदड ते राका मार्गावर कोल्हापूरी बंधारा असून स्मशानभूमी पाणीटंकीजवळ बंधारा आहे. यावर शासनाने कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. मात्र आज बंधाऱ्यांत पाणीच नसून परिसरातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जनप्रतिनीधी व वाळूमाफीयांच्या संगनमताने नदीला कोरडे करण्यात आले आहे.