शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

बंधाऱ्यांत जिरतोय पैसा

By admin | Updated: March 28, 2017 00:50 IST

वाढत्या लोकसंख्येसोबतच पाण्याचा वापरही वाढत चालला आहे. यामुळे आता भुगर्भातील पाणीही खेचून काढले जात असून तेच पाण्याचे मुख्य स्त्रोत ठरत आहे.

बंधारे ठरताहेत शोभेचे : अधिकाऱ्यांची मनमर्जी, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्षसौंदड : वाढत्या लोकसंख्येसोबतच पाण्याचा वापरही वाढत चालला आहे. यामुळे आता भुगर्भातील पाणीही खेचून काढले जात असून तेच पाण्याचे मुख्य स्त्रोत ठरत आहे. यामुळे मात्र भुगर्भातील पाण्याची पातळी घसरत चालली आहे. पाण्याची ही समस्या लक्षात घेत शासनाकडून ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ अभियान राबविले जात आहे. यात शेत तळी, वनराई बंधारे, सिमेंट बंधारे आदिंच्या माध्यमातून पाणी अडवून जिरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या बंधाऱ्यांत पाणी दिसून येत नाही. अशात लाखो रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या बंधाऱ्यांत पाणीच जिरतेय असे दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. पाणी अडवा ही मोहिम जरी जुनी असली तरी जे सरकार येते ते आपल्या पद्धतीने त्याचे नामकरण करते. ही मोहिम जिल्ह्यातील शासकीय कार्यालय व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबविली जाते व त्यावर लाखो रूपयांची कामे केली जातात. मात्र कंत्राटदारांकडून तयार करण्यात आलेले बंधारे निरूपयोगी ठरत आहेत. निकृष्ट बांधकामांमुळे काही ठिकाणी बंधारेच वाहून गेल्याचेही प्रकार घडले आहेत. मात्र या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी कुणालाही वेळ नाही. त्यामुळे या मोहिमेचा फज्जा उडाला आहे. बंधाऱ्यांचे कंत्राट मर्जीतील व्यक्तींना दिले जातात. त्यामुळे ते राजकीय अभय असल्याच्या अविर्भावात निकृष्ट साहित्याचा वापर करून माया जमवितात. मात्र त्या पलीकडे समाजासाठी काहीच केल्याचे दिसून येत नाही. काही ठिकाणी तर लोकप्रतिनिधीच कामे करीत असून नाव फक्त दुसऱ्याचे असल्याचे दिसून येते. यातूनच निकृष्ट दर्जाच्या कामांना सुरूवात होते. बांधकामाच्या कामात सर्वांचेच कमिशन राहात असल्याचे बोलले जाते. अशात बांधकामाचा दर्जाही कसा राहणार? याचा अंदाज येतो. त्यामुळे जिल्ह्यात जे बंधारे निकृष्ट दर्जाचे प्रतीक असतील त्यांची दुरूस्ती करणे व नव्याने बांधकाम होत असलेल्या बंधाऱ्यांची कंत्राटदाराकडूनच ५-१० वर्षांपर्यंत देखरेख असावी, असा नियम करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा जलसंधारणाच्या योजना फसत जातील. याकडे वरिष्ठ जनप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे. अन्यथा पाणी टंचाईची झळ वाढतच जाणार व एकेकाळी पाण्यापुढे रक्त स्वस्त होणार. त्यामुळे पाण्याचे वेळीच नियोजन करणे हाच एकमेव उपाय आहे. (वार्ताहर)नदीच केली कोरडी येथील चुलबंद नदीवर दोन बंधारे आहेत. मात्र दोन्ही निकामी आहेत. यात सौंदड ते राका मार्गावर कोल्हापूरी बंधारा असून स्मशानभूमी पाणीटंकीजवळ बंधारा आहे. यावर शासनाने कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. मात्र आज बंधाऱ्यांत पाणीच नसून परिसरातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जनप्रतिनीधी व वाळूमाफीयांच्या संगनमताने नदीला कोरडे करण्यात आले आहे.