शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघातांपेक्षा कोरोनानेच गेले जास्त जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:19 IST

गोंदिया : कोरोनाने थैमान घातल्यामुळे मागील मार्च महिन्यापासून लॉकडाऊन व काही ना काही निर्बंधांमुळे वाहतुकीचे प्रमाण घटत चालले आहे. ...

गोंदिया : कोरोनाने थैमान घातल्यामुळे मागील मार्च महिन्यापासून लॉकडाऊन व काही ना काही निर्बंधांमुळे वाहतुकीचे प्रमाण घटत चालले आहे. परिणामी नागरिकांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे जिल्ह्यातील अपघातांच्या आकडेवारींवरून समजून येत आहे. कोरोनापू‌र्वी अपघातांमुळे नागरिकांनी नाहक जीव जात असल्याची खंत वाटत होती. मात्र मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला व तेव्हापासून लोकांची जीव आणखीच स्वस्त झाला असून कोरोनामुळे वृध्दच काय तरुणांचाही जीव गेला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात मार्च २०२० पासून आतापर्यंत ६९९ लोकांचा जीव गेला असतानाच सन २०१८ व २०१९ मध्ये ३३४ लोकांचा अपघातांत जीव गेल्याची नोंद आहे. म्हणजेच, अपघाती मृत्यूचे प्रमाण कोरोनाने मागे टाकले असून या दोन्ही प्रकारात मात्र लोकांची नाहक जीव जाताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कोरोना आल्यापासून भल्याभल्यांचा जीव गेला असून कोरोनाने लोकांचा जीव आणखीच स्वस्त करून टाकला आहे.

-----------------------------

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी, पण...

कोरोनामुळे आतापर्यंत दोनदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे संचारबंदी लावली जात असल्याने घराबाहेर निघणेही कठीण होते. शिवाय जिल्हाबंदीमुळे लांबचा प्रवास ही बंदच असतो. परिणामी रस्ते अपघातांचे प्रमाण घटले असून या ६ महिन्यांत ८९ अपघातांची नोंद आहे.

- मात्र सन २०२० मध्ये जेथे अपघातांत १४० व सन २०२१ मध्ये आतापर्यंत ५२ लोकांचा जीव गेला असतानाच मार्च २०२० पासून कोरोनामुळे तब्बल ६९९ लोकांचा जीव गेला आहे. म्हणजेच, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण अपघाती मृत्यूपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे.

-----------------------------

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

शहरातील कुडवा रिंगरोड येथे सकाळी पायी फिरणाऱ्यांची संख्या चांगलीच असते. विशेष म्हणजे, येथे पायी फिरण्यासाठी गेलेल्या कित्येक नागरिकांना वाहनांनी उडविल्याच्या घटना घडल्या आहेत. आता या ६ महिन्यात ७ नागरिकांना अशाच प्रकारे वाहनांनी उडविल्याचे दिसते. यामुळे पायी चालणाऱ्यांनाही धोका आहेच.

---------------------------

मृतांमध्ये तरुणच अधिक

जिल्ह्यात घडत असलेल्या अपघाती मृत्युमध्ये ३५-५० वयोगटातील व्यक्तींचीच संख्या जास्त असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेकडून कळले. विशेष म्हणजे, तरुणांना दुचाकी असो की चारचाकी वाहन भरधाव वेगात चालविण्याचे फॅड असते. हेच फॅड अपघातांना व पुढे अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरते.

---------------------------

या ठिकाणी वाहने हळू चालवा

शहरातील बालाघाट रोड टी-पॉईंट व कुडवा नाका हे दोन ठिकाण अपघातप्रवण स्थळ‌ आहेत. येथे आतापर्यंत कित्येकांचा जीव गेला आहे. त्याचप्रकारे जयस्तंभ चौक, जुना उड्डाणपूल हे सुद्धा तेवढेच धोकादायक स्थळ म्हणून शहरात गणले जातात. त्यामुळे येथून वाहन जपून चालविणेच चांगले आहे.

---------------------------------

आपले जीवन अमूल्य आहे

वेळ वाचविण्याच्या नादात भरधाव वेगात वाहन चालविताना अपघात घडल्याने जबर मारला होता. सुदैवाने अपघातातून बचावलो. तेव्हा कळले आपले जीवन अमूल्य असून त्याच्याशी खेळ करणे कधीच परवडणारे नाही.

- देवीदास बिसेन

----------------------------

वाहन अपघातात पायाला जबर मार लागला असून त्यामुळे चालताना आजही त्रास होतो. नशीब बलवत्तर असल्यामुळे त्या अपघातातून जीव वाचला. मात्र पायाचा त्रास जीवनभरासाठी लागला आहे. आपले जीवन सर्वात किमती आहे, त्यामुळे वाहन जपून चालविणेच बरे.

- अशोक वाढई