शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
8
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
9
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
10
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
11
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
12
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
13
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
14
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
15
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
16
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
17
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
18
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
19
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...

रस्ते अपघातांपेक्षा कोरोनानेच गेले जास्त जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:19 IST

गोंदिया : कोरोनाने थैमान घातल्यामुळे मागील मार्च महिन्यापासून लॉकडाऊन व काही ना काही निर्बंधांमुळे वाहतुकीचे प्रमाण घटत चालले आहे. ...

गोंदिया : कोरोनाने थैमान घातल्यामुळे मागील मार्च महिन्यापासून लॉकडाऊन व काही ना काही निर्बंधांमुळे वाहतुकीचे प्रमाण घटत चालले आहे. परिणामी नागरिकांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे जिल्ह्यातील अपघातांच्या आकडेवारींवरून समजून येत आहे. कोरोनापू‌र्वी अपघातांमुळे नागरिकांनी नाहक जीव जात असल्याची खंत वाटत होती. मात्र मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला व तेव्हापासून लोकांची जीव आणखीच स्वस्त झाला असून कोरोनामुळे वृध्दच काय तरुणांचाही जीव गेला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात मार्च २०२० पासून आतापर्यंत ६९९ लोकांचा जीव गेला असतानाच सन २०१८ व २०१९ मध्ये ३३४ लोकांचा अपघातांत जीव गेल्याची नोंद आहे. म्हणजेच, अपघाती मृत्यूचे प्रमाण कोरोनाने मागे टाकले असून या दोन्ही प्रकारात मात्र लोकांची नाहक जीव जाताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कोरोना आल्यापासून भल्याभल्यांचा जीव गेला असून कोरोनाने लोकांचा जीव आणखीच स्वस्त करून टाकला आहे.

-----------------------------

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी, पण...

कोरोनामुळे आतापर्यंत दोनदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे संचारबंदी लावली जात असल्याने घराबाहेर निघणेही कठीण होते. शिवाय जिल्हाबंदीमुळे लांबचा प्रवास ही बंदच असतो. परिणामी रस्ते अपघातांचे प्रमाण घटले असून या ६ महिन्यांत ८९ अपघातांची नोंद आहे.

- मात्र सन २०२० मध्ये जेथे अपघातांत १४० व सन २०२१ मध्ये आतापर्यंत ५२ लोकांचा जीव गेला असतानाच मार्च २०२० पासून कोरोनामुळे तब्बल ६९९ लोकांचा जीव गेला आहे. म्हणजेच, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण अपघाती मृत्यूपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे.

-----------------------------

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

शहरातील कुडवा रिंगरोड येथे सकाळी पायी फिरणाऱ्यांची संख्या चांगलीच असते. विशेष म्हणजे, येथे पायी फिरण्यासाठी गेलेल्या कित्येक नागरिकांना वाहनांनी उडविल्याच्या घटना घडल्या आहेत. आता या ६ महिन्यात ७ नागरिकांना अशाच प्रकारे वाहनांनी उडविल्याचे दिसते. यामुळे पायी चालणाऱ्यांनाही धोका आहेच.

---------------------------

मृतांमध्ये तरुणच अधिक

जिल्ह्यात घडत असलेल्या अपघाती मृत्युमध्ये ३५-५० वयोगटातील व्यक्तींचीच संख्या जास्त असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेकडून कळले. विशेष म्हणजे, तरुणांना दुचाकी असो की चारचाकी वाहन भरधाव वेगात चालविण्याचे फॅड असते. हेच फॅड अपघातांना व पुढे अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरते.

---------------------------

या ठिकाणी वाहने हळू चालवा

शहरातील बालाघाट रोड टी-पॉईंट व कुडवा नाका हे दोन ठिकाण अपघातप्रवण स्थळ‌ आहेत. येथे आतापर्यंत कित्येकांचा जीव गेला आहे. त्याचप्रकारे जयस्तंभ चौक, जुना उड्डाणपूल हे सुद्धा तेवढेच धोकादायक स्थळ म्हणून शहरात गणले जातात. त्यामुळे येथून वाहन जपून चालविणेच चांगले आहे.

---------------------------------

आपले जीवन अमूल्य आहे

वेळ वाचविण्याच्या नादात भरधाव वेगात वाहन चालविताना अपघात घडल्याने जबर मारला होता. सुदैवाने अपघातातून बचावलो. तेव्हा कळले आपले जीवन अमूल्य असून त्याच्याशी खेळ करणे कधीच परवडणारे नाही.

- देवीदास बिसेन

----------------------------

वाहन अपघातात पायाला जबर मार लागला असून त्यामुळे चालताना आजही त्रास होतो. नशीब बलवत्तर असल्यामुळे त्या अपघातातून जीव वाचला. मात्र पायाचा त्रास जीवनभरासाठी लागला आहे. आपले जीवन सर्वात किमती आहे, त्यामुळे वाहन जपून चालविणेच बरे.

- अशोक वाढई