शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

पुजारीटोलातून सोडले गरजेपेक्षा अधिक पाणी

By admin | Updated: October 15, 2015 02:11 IST

बाघ नदी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पुजारीटोला, कालीसराड आणि सिरपूर या तीन धरणांचे पाणी शेतकऱ्यांना धानाच्या पिकाकरिता दिल्या जाते.

बिजेपार : बाघ नदी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पुजारीटोला, कालीसराड आणि सिरपूर या तीन धरणांचे पाणी शेतकऱ्यांना धानाच्या पिकाकरिता दिल्या जाते. खरिपातील भारी धानाकरिता हे पाणी अजूनही सोडले जात असले तरी हलक्या धानासाठी ते मारक ठरत आहे.पुजारीटोला धरणातून दोन कालवे दिल्या गेले आहेत. उजव्या कालव्यातून मध्य प्रदेशातील लांजीपर्यंत पाणी दिल्या जातो तर डाव्या कालव्याचे पाणी गोंदिया तालुक्यातील रावणवाडीपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी सोडल्या जाते. हे तिन्ही धरण महाराष्ट्र राज्य व मध्यप्रदेश राज्य यांच्या संयुक्त परियोजनेने बनलेले आहेत. सध्या धानाच्या वाणाला पाणी दिल्या जात आहे. परंतु एकीकडे हलक्या प्रतीचा धान आता कापण्यास सुरुवात झाली आहे तर पुजारीटोला धरणाच्या कालव्यातून सोडल्या जाणाऱ्या अधिकच्या पाण्यामुळे काही शेतकरी त्रस्त झाले आहेत. पं.स. सदस्य दिलीप वाघमारे हे आपल्या क्षेत्राचा दौरा करताना संबंधित बाब लक्षात आल्याचे सांगितले. कोटरा-हलबीटोला, लोहारा, गोर्रे, शेरपार, या गावातील काही शेतकरी शेतातून अतिरिक्त प्रमाणात पाणी साचून असल्यामुळे धानाला सुखण्याकरिता वातावरणच मिळत नाही, असे लोहारा येथील प्रगतिशिल शेतकरी युवराज नारायण कटरे यांनी सांगितले. त्यांनी असेही सुचित केले आहे की, जर मध्यप्रदेशातील शेवटच्या शेतकऱ्यांना पाणीच लागत असेल तर नहराची पाण्याची पातळी कमी करुन द्यावी. पाणी जर शेतकऱ्यांना हवे नसेल व सतत दोन्ही कालव्यातून पाणी असेच सोडल्यास पाण्याचा अपव्यय होईल व आगामी रबी पिकाचे क्षेत्र सुद्धा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकाऱ्यांनी याची शहनिशा करुन दोन्ही कालव्याचे पाणी त्वरित थांबवावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)