शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

पुजारीटोलातून सोडले गरजेपेक्षा अधिक पाणी

By admin | Updated: October 15, 2015 02:11 IST

बाघ नदी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पुजारीटोला, कालीसराड आणि सिरपूर या तीन धरणांचे पाणी शेतकऱ्यांना धानाच्या पिकाकरिता दिल्या जाते.

बिजेपार : बाघ नदी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पुजारीटोला, कालीसराड आणि सिरपूर या तीन धरणांचे पाणी शेतकऱ्यांना धानाच्या पिकाकरिता दिल्या जाते. खरिपातील भारी धानाकरिता हे पाणी अजूनही सोडले जात असले तरी हलक्या धानासाठी ते मारक ठरत आहे.पुजारीटोला धरणातून दोन कालवे दिल्या गेले आहेत. उजव्या कालव्यातून मध्य प्रदेशातील लांजीपर्यंत पाणी दिल्या जातो तर डाव्या कालव्याचे पाणी गोंदिया तालुक्यातील रावणवाडीपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी सोडल्या जाते. हे तिन्ही धरण महाराष्ट्र राज्य व मध्यप्रदेश राज्य यांच्या संयुक्त परियोजनेने बनलेले आहेत. सध्या धानाच्या वाणाला पाणी दिल्या जात आहे. परंतु एकीकडे हलक्या प्रतीचा धान आता कापण्यास सुरुवात झाली आहे तर पुजारीटोला धरणाच्या कालव्यातून सोडल्या जाणाऱ्या अधिकच्या पाण्यामुळे काही शेतकरी त्रस्त झाले आहेत. पं.स. सदस्य दिलीप वाघमारे हे आपल्या क्षेत्राचा दौरा करताना संबंधित बाब लक्षात आल्याचे सांगितले. कोटरा-हलबीटोला, लोहारा, गोर्रे, शेरपार, या गावातील काही शेतकरी शेतातून अतिरिक्त प्रमाणात पाणी साचून असल्यामुळे धानाला सुखण्याकरिता वातावरणच मिळत नाही, असे लोहारा येथील प्रगतिशिल शेतकरी युवराज नारायण कटरे यांनी सांगितले. त्यांनी असेही सुचित केले आहे की, जर मध्यप्रदेशातील शेवटच्या शेतकऱ्यांना पाणीच लागत असेल तर नहराची पाण्याची पातळी कमी करुन द्यावी. पाणी जर शेतकऱ्यांना हवे नसेल व सतत दोन्ही कालव्यातून पाणी असेच सोडल्यास पाण्याचा अपव्यय होईल व आगामी रबी पिकाचे क्षेत्र सुद्धा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकाऱ्यांनी याची शहनिशा करुन दोन्ही कालव्याचे पाणी त्वरित थांबवावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)