शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

लोकसंख्यावाढीने बेरोजगारीचे राक्षसी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST

विजय मानकर सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात मागील दहा वर्षांत ८ टक्क्यांनी लोकसंख्यावाढ झाली आहे. या दरम्यान अनेक कुटुंबांची सदस्य ...

विजय मानकर

सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात मागील दहा वर्षांत ८ टक्क्यांनी लोकसंख्यावाढ झाली आहे. या दरम्यान अनेक कुटुंबांची सदस्य संख्या दुप्पट ते तिप्पट झाली, परंतु त्यांच्याकडे कृषिभूमी किंवा निवास करण्याची जागा तेवढी राहिली आहे. रोजगाराचे साधनही तेवढेच असून, बेरोजगारीचे संकटही राक्षसाप्रमाणे वाढत चालले आहे. वाढती लोकसंख्या आज सर्वात मोठे चिंतेचे कारण असून, संसाधने मात्र कमी होत चालली आहेत. अशात बेरोजगारीसह इतरही समस्या वाढत आहेत.

सर्वत्र अराजकता मारामारी, चोरी, डाका, दरोडा या सारख्या घटनाही वाढत आहेत. वेळीच प्रभावी उपाययोजना केल्या, तर काही प्रमाणात संभाव्य समस्यांवर नियंत्रण आणता येईल. २०११च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १३ लाख २२ हजार ५०७ एवढी होती. यात पुरुष ६ लाख ६१ हजार ५५४ आणि महिलांची संख्या ६ लाख ६० हजार ९५३ एवढी होती. ही लोकसंख्या २०२०च्या शेवटपर्यंत १४ लाख ५० हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाच्या संकटामुळे २०२१चे आकडे तयार झालेले नाही. परिणामी, सध्याच्या स्थितीत जिल्ह्याची नेमकी लोकसंख्या किती हे नेमके सांगता येणार नाही. जिल्ह्यातील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या शेती किंवा शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. एकूण लोकसंख्येतील निम्मे लोक म्हणजे ६ लाख ६० हजारांपेक्षा जास्त लोक निव्वळ मजुरीवर जगत आहेत. या मागील कारण शोधले, तर कृषिभूमी कमी होत चालली व लोकसंख्या वाढत चालली, अशात काही लोकांसाठी कृषिभूमी उरलीच नाही. याला सरळ भाषेत समजून घेणे म्हटल्यास, एका शेतकऱ्याकडे एकूण चार एकर शेती होती. त्याला चार एकर शेती करणे सरासरी परवडणारी असायची, परंतु त्यांची जर चार मुले झाली, तर प्रत्येकाच्या वाट्यात फक्त एकर याप्रमाणे शेतजमीन आली. अशात कोणी भाऊ शेती करायचा, तर कोणी दुसऱ्याला बटई स्वरूपात घ्यायचा आणि स्वत: इतर मजुरीची कामे करून कुटुंबाचा गाडा चालवायचा. पुढे त्यांच्या कुटुंबाची सदस्य संख्या वाढली की, त्यांना मजुरी किंवा इतर मार्ग पत्करून पैसे कमविण्याची वेळ येत गेली.

..............

रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव

गावात रोजगाराअभावी गावातील बेरोजगार लोकांनी शहराकडे धाव घेतली. परिणामी, शहरी लोकसंख्येत वाढ होत आहे. त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे संकट निर्माण होत गेले. शहरांवर लोकसंख्येचा वाढता भार ही पण एक मोठी समस्या आहे.

............

माल्थसचा सिद्धांत ठरतोय प्रासंगिक

अठराव्या शतकात थॉमस माल्थस यांनी लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडला होता. त्याच्यामते लोकसंख्या ही १,२,४,८ या वेगाने तर संसाधने १,२,३,४ या गतीने वाढतात आणि २५ वर्षांत लोकसंख्या दुप्पट होऊन जाते. मात्र, संसाधन फार कमी वाढतात. वाढत्या लोकसंख्येवर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

..........