शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
5
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
6
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
7
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
8
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
9
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
10
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
11
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
12
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
13
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
14
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
15
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
16
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
17
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
18
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
19
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
20
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

लोकसंख्यावाढीने बेरोजगारीचे राक्षसी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST

विजय मानकर सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात मागील दहा वर्षांत ८ टक्क्यांनी लोकसंख्यावाढ झाली आहे. या दरम्यान अनेक कुटुंबांची सदस्य ...

विजय मानकर

सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात मागील दहा वर्षांत ८ टक्क्यांनी लोकसंख्यावाढ झाली आहे. या दरम्यान अनेक कुटुंबांची सदस्य संख्या दुप्पट ते तिप्पट झाली, परंतु त्यांच्याकडे कृषिभूमी किंवा निवास करण्याची जागा तेवढी राहिली आहे. रोजगाराचे साधनही तेवढेच असून, बेरोजगारीचे संकटही राक्षसाप्रमाणे वाढत चालले आहे. वाढती लोकसंख्या आज सर्वात मोठे चिंतेचे कारण असून, संसाधने मात्र कमी होत चालली आहेत. अशात बेरोजगारीसह इतरही समस्या वाढत आहेत.

सर्वत्र अराजकता मारामारी, चोरी, डाका, दरोडा या सारख्या घटनाही वाढत आहेत. वेळीच प्रभावी उपाययोजना केल्या, तर काही प्रमाणात संभाव्य समस्यांवर नियंत्रण आणता येईल. २०११च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १३ लाख २२ हजार ५०७ एवढी होती. यात पुरुष ६ लाख ६१ हजार ५५४ आणि महिलांची संख्या ६ लाख ६० हजार ९५३ एवढी होती. ही लोकसंख्या २०२०च्या शेवटपर्यंत १४ लाख ५० हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाच्या संकटामुळे २०२१चे आकडे तयार झालेले नाही. परिणामी, सध्याच्या स्थितीत जिल्ह्याची नेमकी लोकसंख्या किती हे नेमके सांगता येणार नाही. जिल्ह्यातील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या शेती किंवा शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. एकूण लोकसंख्येतील निम्मे लोक म्हणजे ६ लाख ६० हजारांपेक्षा जास्त लोक निव्वळ मजुरीवर जगत आहेत. या मागील कारण शोधले, तर कृषिभूमी कमी होत चालली व लोकसंख्या वाढत चालली, अशात काही लोकांसाठी कृषिभूमी उरलीच नाही. याला सरळ भाषेत समजून घेणे म्हटल्यास, एका शेतकऱ्याकडे एकूण चार एकर शेती होती. त्याला चार एकर शेती करणे सरासरी परवडणारी असायची, परंतु त्यांची जर चार मुले झाली, तर प्रत्येकाच्या वाट्यात फक्त एकर याप्रमाणे शेतजमीन आली. अशात कोणी भाऊ शेती करायचा, तर कोणी दुसऱ्याला बटई स्वरूपात घ्यायचा आणि स्वत: इतर मजुरीची कामे करून कुटुंबाचा गाडा चालवायचा. पुढे त्यांच्या कुटुंबाची सदस्य संख्या वाढली की, त्यांना मजुरी किंवा इतर मार्ग पत्करून पैसे कमविण्याची वेळ येत गेली.

..............

रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव

गावात रोजगाराअभावी गावातील बेरोजगार लोकांनी शहराकडे धाव घेतली. परिणामी, शहरी लोकसंख्येत वाढ होत आहे. त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे संकट निर्माण होत गेले. शहरांवर लोकसंख्येचा वाढता भार ही पण एक मोठी समस्या आहे.

............

माल्थसचा सिद्धांत ठरतोय प्रासंगिक

अठराव्या शतकात थॉमस माल्थस यांनी लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडला होता. त्याच्यामते लोकसंख्या ही १,२,४,८ या वेगाने तर संसाधने १,२,३,४ या गतीने वाढतात आणि २५ वर्षांत लोकसंख्या दुप्पट होऊन जाते. मात्र, संसाधन फार कमी वाढतात. वाढत्या लोकसंख्येवर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

..........