शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्यावाढीने बेरोजगारीचे राक्षसी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST

विजय मानकर सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात मागील दहा वर्षांत ८ टक्क्यांनी लोकसंख्यावाढ झाली आहे. या दरम्यान अनेक कुटुंबांची सदस्य ...

विजय मानकर

सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात मागील दहा वर्षांत ८ टक्क्यांनी लोकसंख्यावाढ झाली आहे. या दरम्यान अनेक कुटुंबांची सदस्य संख्या दुप्पट ते तिप्पट झाली, परंतु त्यांच्याकडे कृषिभूमी किंवा निवास करण्याची जागा तेवढी राहिली आहे. रोजगाराचे साधनही तेवढेच असून, बेरोजगारीचे संकटही राक्षसाप्रमाणे वाढत चालले आहे. वाढती लोकसंख्या आज सर्वात मोठे चिंतेचे कारण असून, संसाधने मात्र कमी होत चालली आहेत. अशात बेरोजगारीसह इतरही समस्या वाढत आहेत.

सर्वत्र अराजकता मारामारी, चोरी, डाका, दरोडा या सारख्या घटनाही वाढत आहेत. वेळीच प्रभावी उपाययोजना केल्या, तर काही प्रमाणात संभाव्य समस्यांवर नियंत्रण आणता येईल. २०११च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १३ लाख २२ हजार ५०७ एवढी होती. यात पुरुष ६ लाख ६१ हजार ५५४ आणि महिलांची संख्या ६ लाख ६० हजार ९५३ एवढी होती. ही लोकसंख्या २०२०च्या शेवटपर्यंत १४ लाख ५० हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाच्या संकटामुळे २०२१चे आकडे तयार झालेले नाही. परिणामी, सध्याच्या स्थितीत जिल्ह्याची नेमकी लोकसंख्या किती हे नेमके सांगता येणार नाही. जिल्ह्यातील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या शेती किंवा शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. एकूण लोकसंख्येतील निम्मे लोक म्हणजे ६ लाख ६० हजारांपेक्षा जास्त लोक निव्वळ मजुरीवर जगत आहेत. या मागील कारण शोधले, तर कृषिभूमी कमी होत चालली व लोकसंख्या वाढत चालली, अशात काही लोकांसाठी कृषिभूमी उरलीच नाही. याला सरळ भाषेत समजून घेणे म्हटल्यास, एका शेतकऱ्याकडे एकूण चार एकर शेती होती. त्याला चार एकर शेती करणे सरासरी परवडणारी असायची, परंतु त्यांची जर चार मुले झाली, तर प्रत्येकाच्या वाट्यात फक्त एकर याप्रमाणे शेतजमीन आली. अशात कोणी भाऊ शेती करायचा, तर कोणी दुसऱ्याला बटई स्वरूपात घ्यायचा आणि स्वत: इतर मजुरीची कामे करून कुटुंबाचा गाडा चालवायचा. पुढे त्यांच्या कुटुंबाची सदस्य संख्या वाढली की, त्यांना मजुरी किंवा इतर मार्ग पत्करून पैसे कमविण्याची वेळ येत गेली.

..............

रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव

गावात रोजगाराअभावी गावातील बेरोजगार लोकांनी शहराकडे धाव घेतली. परिणामी, शहरी लोकसंख्येत वाढ होत आहे. त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे संकट निर्माण होत गेले. शहरांवर लोकसंख्येचा वाढता भार ही पण एक मोठी समस्या आहे.

............

माल्थसचा सिद्धांत ठरतोय प्रासंगिक

अठराव्या शतकात थॉमस माल्थस यांनी लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडला होता. त्याच्यामते लोकसंख्या ही १,२,४,८ या वेगाने तर संसाधने १,२,३,४ या गतीने वाढतात आणि २५ वर्षांत लोकसंख्या दुप्पट होऊन जाते. मात्र, संसाधन फार कमी वाढतात. वाढत्या लोकसंख्येवर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

..........