शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

११० कुटुंबांचा पावसाळा उघड्यावर जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

सालेकसा तालुक्यातील एकूण ४१ ग्रामपंचायत अंतर्गत आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत एकूण २०० कुटुंबाना पक्के घर बनवून देण्याचे उद्दिष्ट होते. परंतु २०० पैकी १६४ घरकुलांनाच मंजुरी मिळाली असून बाकीचे लाभार्थी प्रतीक्षा यादीत टाकण्यात आले. मंजूर झालेल्या घरकुलापैकी फक्त ११० लाभार्थ्यांना बांधकाम करण्यासाठी अनुदानाची पहिली किस्त २० हजार रुपये प्रमाणे मिळाली.

ठळक मुद्देरमाई योजनेचे २०४ घरकुल रखडले : दोन वर्षापासून निधीची प्रतीक्षा, लाभार्थ्यांची परवड

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : एकीकडे शासन २०२२ पर्यंत त्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न करुन देण्याचे आश्वासन देत आहे. परंतु दुसरीकडे सालेकसा तालुक्यातील एकूण २०४ कुटुंबाचे रमाई योजनेचे घरकुलाचे काम रखडले आहे. त्यापैकी ११० कुटुंबाना तर उघड्यावर पावसाळा काढण्याची वेळ आली आहे.सालेकसा तालुक्यातील एकूण ४१ ग्रामपंचायत अंतर्गत आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत एकूण २०० कुटुंबाना पक्के घर बनवून देण्याचे उद्दिष्ट होते. परंतु २०० पैकी १६४ घरकुलांनाच मंजुरी मिळाली असून बाकीचे लाभार्थी प्रतीक्षा यादीत टाकण्यात आले. मंजूर झालेल्या घरकुलापैकी फक्त ११० लाभार्थ्यांना बांधकाम करण्यासाठी अनुदानाची पहिली किस्त २० हजार रुपये प्रमाणे मिळाली. त्यानुसार त्या कुटुंबानी आपले जुने मातीचे घर पाडून त्या जागेवर घरकुल बांधकाम सुरु केले व पक्या घराचे स्वप्न साकार होताना बघितले. परंतु त्या ११० कुटुंबाना २० हजाराची पहिली किस्त मिळाल्यानंतर त्यानंतर आतापर्यंत एक रुपया ही मिळाला नाही. मागील सात आठ महिन्यापासून घरकुलाच्या रकमेची वाट बघता अखेर पावसाळा सुरु झाला तरी रक्कम न मिळाल्याने त्याचे घरकुल बांधकाम अर्धवट आहे. आधीच मातीचे घर पाडून टाकले आणि आता घरकुल अर्धवट पडून आहेत.अशात त्या ११० कुटुंबांना उघड्यावरच पावसाळा काढण्याची वेळ आली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात एकूण शंभर कुटुंबांना रमाई आवास योजनेचे घरकुल वाटप करण्याचे उद्दिष्ट सालेकसा तालुक्याला देण्यात आले होते. परंतु त्यापैकी फक्त ४० कुटुंबाना घरकुल मंजूर करण्यात आले. मंजूर झालेल्या ४० कुटुंबापैकी कोणत्याही कुटुंबाला बांधकाम सुरु करण्याच्या नावावर फुटकी कवडीही प्राप्त झाली नाही. त्या आधी २०१८-१९ या वित्त वर्षातील ५४ कुटुंबाना सुद्धा कोणत्याही प्रकारे घरकुलासाठी निधी मिळाला नाही. अशात एकूण २०४ लाभार्थ्यांचे घरकुलाचे बांधकाम रखडले आहेत. आजही समाजातील अनेक कुटुंबाना अन्न, वस्त्र, निवाऱ्यासारखा प्राचीन काळातील मुलभूत सोयीसाठी झटावे लागत असणे म्हणजे त्याचे मोठे दुदैवच समजावे.मागासलेल्या समाजाच्या उत्थानासाठी काही स्वतंत्र योजना शासनाकडून राबविल्या जात असतात. परंतु त्या योजनांचा थेट लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत वेळेच्या गरजेनुसार मिळताना दिसत नाही.सालेकसा पंचायत समितीच्यावतीने अनेकवेळा पत्र व्यवहार करुन रमाई आवास योजनेच्या निधी देण्यासाठी शासनाला विनंती करण्यात आली. १४ मे रोजीच्या मासिक सभेत ठराव पारीत करुन प्रकल्प संचालकाला पाठविण्यात आला. तरी सुद्धा निधी उपलब्ध झाला नाही. शासनाने याकडे लक्ष देऊन निधीची समस्या मार्गी लावावी.-दिलीप वाघमारे, उपसभापती पं.स. सालेकसा

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना