शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

खरेदी केलेल्या धानाचे पैसे थकून

By admin | Updated: July 5, 2015 01:58 IST

शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या हमी भाव धान खरेदी केंद्रावर विकल्या गेलेल्या धानाचे अजूनही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत.

शेतकरी हवालदिल : सहकारी संस्थांना मन:स्तापनवेगावबांध : शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या हमी भाव धान खरेदी केंद्रावर विकल्या गेलेल्या धानाचे अजूनही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तसेच ज्या सहकारी संस्थांनी आपल्या बँक लिमीट मधून काही शेतकऱ्यांचे चुकारे अदा केलेत त्या संस्था देखील डबघाईस आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.उन्हाळी पिकासाठी शासनातर्फे धान खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यासाठी १३५० रुपये प्रति क्विंटल हमी भाव निश्चित करण्यात आला होता. शासकीय खरेदी केंद्र असल्याकारणाने शेतकऱ्यांनी आपला उत्पादित केलेला धान केंद्रावर विकला. परंतु सुमारे दीड-ते दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना त्यांच्या विकल्या गेलेल्या धानाचे पैसे मिळाले नाहीत. आता नवीन हंगाम सुरू झाला त्यामुळे बियाणे, खत व औषधी खरेदी करण्यासाठी व मजुरी देण्यासाठी पैशांची नितांत आवश्यकता आहे. तरी सुद्धा शासनातर्फे शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगाम कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच काही सहकारी संस्थांनी आपल्या बँक लिमीट मधून पैसे काढून काही शेतकऱ्यांचे पैसे दिलेत. शेतकऱ्यांचे काम व्हावे व शासनातर्फे लवकरच आपल्याला पैसे मिळतील असा संस्थांचा उद्देश होता. परंतु शासनाच्या दिरंगाईच्या धोरणामुळे पैशांअभावी बऱ्याच संस्था डबघाईस आल्यासारख्या आहेत.धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २५० रुपये प्रतिक्विंटल दराने शासनाने बोनस जाहीर केला. त्यासाठी ५२ कोटी रुपये देणार असल्याचे शासनातर्फे मागेच जाहीर करण्यात आले. परंतु बोनसचे पैसे कुठे अजूनपर्यंत अडकून आहेत हे कुणालाच माहिती नाही. शासनातर्फे मार्केटिंग फेडरेशनला पैसे पाठविले जातात व त्यानंतर फेडरेशनतर्फे विविध सहकारी संस्थांना पैसे दिले जातात. त्यानंतर शेतकऱ्यांना पैसा मिळतो. परंतु अजुनपर्यंत पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नसल्यामुळे शासनाच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या होत असलेल्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी शासनातर्फे सहकारी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. परंतु शासनच दिरंगाईचे धोरण अवलंबून धान उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप होत आहे. बरे धानाच्या भाववाढीवर राजकारण करणारे पदाधिकारीही या बाबीवर मुंग गिळून गप्प आहेत. शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेवून तसेच सहकारी संस्थांची परिस्थिती लक्षात घेवून त्वरित खरेदी केलेल्या धानाचे चुकारे व बोनस अदा करावे, अशी मागणी सहकारी संस्थांचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)