शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाढताहेत विनयभंग व बलात्कार

By admin | Updated: December 13, 2014 22:41 IST

जिल्ह्यात दररोज विविध प्रकारच्या घटना घडत आहेत. या घटना घडू नये व त्यावर अंकुश लावावा यासाठी पोलीस विभाग प्रयत्नशील असला तरी मागील ५ वर्षांचा विचार केल्यास विनयभंग व बलात्काराच्या

गोंदिया : जिल्ह्यात दररोज विविध प्रकारच्या घटना घडत आहेत. या घटना घडू नये व त्यावर अंकुश लावावा यासाठी पोलीस विभाग प्रयत्नशील असला तरी मागील ५ वर्षांचा विचार केल्यास विनयभंग व बलात्काराच्या घटनांचा आलेख वाढतच असल्याने पोलिसांसमोर या घटनांना घेवून एक वेगळे आव्हाण आहे. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण तंटामुक्त जिल्ह्यात जर अशा प्रकारच्या घटना वाढत असतील तर हा एक चिंतेचा विषय पोलिसांसमोर आहे. जिल्ह्यात मागील ५ वर्षांतील गुन्ह्यांच्या आकडेवारींचा विचार केल्यास सर्व प्रकारचे गुन्हे मिळून विनयभंगाच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सन २००९ मध्ये ६७, २०१०- ८०, २०११- ६७, २०१२- ४७, २०१३-९४ व २०१४ मध्ये आतापर्यंत १०६ विनयभंगाच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. तर बलात्काराच्या घटनेतही झालेली वाढ चिंतनीय आहे. २००९ मध्ये बलात्काराच्या ३३, २०१० मध्ये २८, २०११-३१, २०१२-३८, २०१३-५१ व २०१४ मध्ये आतापर्यंत ५३ घटना घडल्या. यातील अनेक प्रकरणांना पोलिसांनी उघड केले आहे.एकंदरित विनयभंग व बलात्काराच्या घटनांचा वाढता आलेख हा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लावणारा ठरला आहे. इतर घटनेच्या बाबतीत पोलिसांनी अंकुश लावला असला तरी खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले आदी घटनाही घडत असल्याने पोलिसांसमोर जिल्हा गुन्हेगारी प्रवृत्त करणे कठिण झाले आहे.विशेष म्हणजे जिल्हा हा १०० टक्के तंटामुक्त असताना अशाप्रकारच्या सर्वाधिक घटना या ग्रामीण भागात घडत असताना तंटामुक्तीच्या यशावरही आता शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे तंटामुक्त जिल्ह्याचा मान राखणे व महिलांची सुरक्षा असे दुहेरी आव्हाण पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. (तालुका प्रतिनिधी)