शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

जिल्ह्यात वाढताहेत विनयभंग व बलात्कार

By admin | Updated: December 13, 2014 22:41 IST

जिल्ह्यात दररोज विविध प्रकारच्या घटना घडत आहेत. या घटना घडू नये व त्यावर अंकुश लावावा यासाठी पोलीस विभाग प्रयत्नशील असला तरी मागील ५ वर्षांचा विचार केल्यास विनयभंग व बलात्काराच्या

गोंदिया : जिल्ह्यात दररोज विविध प्रकारच्या घटना घडत आहेत. या घटना घडू नये व त्यावर अंकुश लावावा यासाठी पोलीस विभाग प्रयत्नशील असला तरी मागील ५ वर्षांचा विचार केल्यास विनयभंग व बलात्काराच्या घटनांचा आलेख वाढतच असल्याने पोलिसांसमोर या घटनांना घेवून एक वेगळे आव्हाण आहे. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण तंटामुक्त जिल्ह्यात जर अशा प्रकारच्या घटना वाढत असतील तर हा एक चिंतेचा विषय पोलिसांसमोर आहे. जिल्ह्यात मागील ५ वर्षांतील गुन्ह्यांच्या आकडेवारींचा विचार केल्यास सर्व प्रकारचे गुन्हे मिळून विनयभंगाच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सन २००९ मध्ये ६७, २०१०- ८०, २०११- ६७, २०१२- ४७, २०१३-९४ व २०१४ मध्ये आतापर्यंत १०६ विनयभंगाच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. तर बलात्काराच्या घटनेतही झालेली वाढ चिंतनीय आहे. २००९ मध्ये बलात्काराच्या ३३, २०१० मध्ये २८, २०११-३१, २०१२-३८, २०१३-५१ व २०१४ मध्ये आतापर्यंत ५३ घटना घडल्या. यातील अनेक प्रकरणांना पोलिसांनी उघड केले आहे.एकंदरित विनयभंग व बलात्काराच्या घटनांचा वाढता आलेख हा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लावणारा ठरला आहे. इतर घटनेच्या बाबतीत पोलिसांनी अंकुश लावला असला तरी खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले आदी घटनाही घडत असल्याने पोलिसांसमोर जिल्हा गुन्हेगारी प्रवृत्त करणे कठिण झाले आहे.विशेष म्हणजे जिल्हा हा १०० टक्के तंटामुक्त असताना अशाप्रकारच्या सर्वाधिक घटना या ग्रामीण भागात घडत असताना तंटामुक्तीच्या यशावरही आता शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे तंटामुक्त जिल्ह्याचा मान राखणे व महिलांची सुरक्षा असे दुहेरी आव्हाण पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. (तालुका प्रतिनिधी)