शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

जिल्ह्यात वाढताहेत विनयभंग व बलात्कार

By admin | Updated: December 13, 2014 22:41 IST

जिल्ह्यात दररोज विविध प्रकारच्या घटना घडत आहेत. या घटना घडू नये व त्यावर अंकुश लावावा यासाठी पोलीस विभाग प्रयत्नशील असला तरी मागील ५ वर्षांचा विचार केल्यास विनयभंग व बलात्काराच्या

गोंदिया : जिल्ह्यात दररोज विविध प्रकारच्या घटना घडत आहेत. या घटना घडू नये व त्यावर अंकुश लावावा यासाठी पोलीस विभाग प्रयत्नशील असला तरी मागील ५ वर्षांचा विचार केल्यास विनयभंग व बलात्काराच्या घटनांचा आलेख वाढतच असल्याने पोलिसांसमोर या घटनांना घेवून एक वेगळे आव्हाण आहे. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण तंटामुक्त जिल्ह्यात जर अशा प्रकारच्या घटना वाढत असतील तर हा एक चिंतेचा विषय पोलिसांसमोर आहे. जिल्ह्यात मागील ५ वर्षांतील गुन्ह्यांच्या आकडेवारींचा विचार केल्यास सर्व प्रकारचे गुन्हे मिळून विनयभंगाच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सन २००९ मध्ये ६७, २०१०- ८०, २०११- ६७, २०१२- ४७, २०१३-९४ व २०१४ मध्ये आतापर्यंत १०६ विनयभंगाच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. तर बलात्काराच्या घटनेतही झालेली वाढ चिंतनीय आहे. २००९ मध्ये बलात्काराच्या ३३, २०१० मध्ये २८, २०११-३१, २०१२-३८, २०१३-५१ व २०१४ मध्ये आतापर्यंत ५३ घटना घडल्या. यातील अनेक प्रकरणांना पोलिसांनी उघड केले आहे.एकंदरित विनयभंग व बलात्काराच्या घटनांचा वाढता आलेख हा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लावणारा ठरला आहे. इतर घटनेच्या बाबतीत पोलिसांनी अंकुश लावला असला तरी खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले आदी घटनाही घडत असल्याने पोलिसांसमोर जिल्हा गुन्हेगारी प्रवृत्त करणे कठिण झाले आहे.विशेष म्हणजे जिल्हा हा १०० टक्के तंटामुक्त असताना अशाप्रकारच्या सर्वाधिक घटना या ग्रामीण भागात घडत असताना तंटामुक्तीच्या यशावरही आता शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे तंटामुक्त जिल्ह्याचा मान राखणे व महिलांची सुरक्षा असे दुहेरी आव्हाण पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. (तालुका प्रतिनिधी)