शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मोक्षधाम बनले ‘डम्पिंग यार्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 23:54 IST

शहरात निघणारा ओला व सुका कचरा नगर परिषदेसाठी डोकेदुखी असून ही डोकेदुखी आता शहरवासीयांसाठीही घातक ठरत आहे. शहरात दररोज निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. परिणामी मोक्षधाम परिसराला कचऱ्याचा वेढा वाढतच चालला आहे.

ठळक मुद्देकचरा विल्हेवाटीची समस्या : प्रकल्पाशिवाय तरणोपाय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात निघणारा ओला व सुका कचरा नगर परिषदेसाठी डोकेदुखी असून ही डोकेदुखी आता शहरवासीयांसाठीही घातक ठरत आहे. शहरात दररोज निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. परिणामी मोक्षधाम परिसराला कचऱ्याचा वेढा वाढतच चालला आहे. मात्र नगर परिषदेकडे घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्यामुळे मोक्षधाम परिसरच ‘डंम्पींग यार्ड’ बनले आहे. शहराचा विकास होत असतानाच शहराचा व्यास व लोकसंख्याही वाढतच चालली आहे. यासोबतच लोकांच्या गरजाही वाढल्या असून त्यानुसार त्यांच्यापासून शहरात निघणारा कचराही वाढतच चालला आहे. हेच कारण आहे की, शहरात दिवसाला ६५ मेट्रीक टन कचरा निघतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात निघत असलेल्या कचºयाची विल्हेवाट लावणेही तेवढेच जिकरीचे काम झाले आहे. त्यात नगर परिषदेकडे घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्यामुळे अधिकच समस्या वाढली आहे. परिणामी नगर परिषदेकडून शहरातील मोक्षधाम परिसरात कचरा टाकला जात आहे. यामुळे आजघडीला या परिसरात बघावे तिकडे कचऱ्याचे ढिगार दिसून येत आहेत. नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प झाल्यास कचऱ्याची समस्या चांगल्याने सोडविता येवू शकते. मात्र तोपर्यंत आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत नगर परिषद शहराला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. यांतर्गत नगर परिषदेकडून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गांडूळ निर्मितीचा प्रयोग केला जात आहे. शहरात निघणाऱ्या ६५ मेट्रीक कचऱ्यात २९ मेट्रीक टन कचरा ओला राहत असून ३६ मेट्रीक टन कचरा सुका राहतो. अशात गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहायक ठरत असून यात नगर परिषदेला यश आले आहे. शिवाय सुका कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे.प्रकल्पासाठी लवकरच जागेची खरेदीघन कचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करण्यासाठी नगर परिषदेने जवळील ग्राम रतनारा येथे जागा बघितली आहे. सुमारे १० एकर असलेल्या या जागेची मोजणी झाली असून नगर परिषदेने जागा खरेदीसाठी सर्वसाधारण सभेत ठराव घेतला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविला जाणार असून त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यावर शासकीय दराने जागेची खरेदी केली जाणार आहे. यात ३० टक्के जनरल फंड तर ७० टक्के रक्कम १४ व्या वित्त अयोगातून उभी केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी सांगीतले.

टॅग्स :dumpingकचरा