शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

मोदी सरकारने गोरगरिबांवर अन्याय केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:31 IST

तिरोडा : जनतेला खोटी आणि मोठी स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने जनतेची पूर्णपणे भ्रमनिराशा केली आहे. पेट्रोल, डिझेल ...

तिरोडा : जनतेला खोटी आणि मोठी स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने जनतेची पूर्णपणे भ्रमनिराशा केली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसुध्दा मोठ्या प्रमाणात वाढवून जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केले. मोदी सरकारने सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेवर अन्याय केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा व सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने आ. सहेषराम कोरोटे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, माजी आ. दिलीप बन्सोड, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष उषा शहारे, कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, प्रदेश सचिव अमर वऱ्हाडे, धानसिंग बघेले, पी.जी.कटरे, जागेश्वर निमजे, ओम पटले, रमेश अंबुले, दुर्गेश चौरागडे, जगदीश येरोला, रामकुमार असाटी, राधेश्याम पटले, रमेश टेंभरे, ठमेंद्रसिंह चव्हाण, पूनम रहांगडाले, रुबीना मोतीवाला व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पटोले म्हणाले, केंद्र सरकारने मागील सात वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. उलट शेतकरी विरोधी कायदे करून त्यांच्यावर अन्याय केला. या अन्यायाला वाचा फोडण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे जनतेनेच आता मोदी सरकारचा खरा चेहरा उघड करावा, असे आवाहन पटोले यांनी यावेळी केले. उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुक्यातील विविध पक्षांच्या ४३९ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत पक्षाचा दुप्पटा घालून प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जागेश्वर निमजे यांनी केले तर आभार रमेश टेंभरे यांनी मानले.