शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

आधुनिकतेत बैलजोडीच्या घुंगरांचा आवाज लुप्त

By admin | Updated: March 25, 2015 01:14 IST

जमाना वायफायचा आहे. इंटरनेट व्हॉट्सअपच्या काळात बदल जलद झाले हे कळलेच नाही. संपर्कासाठी एक ना अनेक माध्यमे आली.

अर्जुनी-मोरगाव : जमाना वायफायचा आहे. इंटरनेट व्हॉट्सअपच्या काळात बदल जलद झाले हे कळलेच नाही. संपर्कासाठी एक ना अनेक माध्यमे आली. त्यासोबतच वाहतुकीची शेकडो माध्यम सुध्दा वर्तमानात वाढली आहेत. प्रत्येक गावात माल वाहतुकीसाठी छोटा गाडी असतेच. मालवाहक गाड्यानी घुगरांची गाडी म्हणजेच महाराष्ट्राची एक ओळख सांगणाच्या बैलगाडीला कधिचेच मागे टाकले परंतु आजही तिचे महत्व कमी झालेले नाही.काही वर्षे मागे पाहिले तर दळणवळणाच्या सोयी तर दुरची गोष्ट. परंतु पक्का डांबरी रस्ता सुध्दा ग्रामीण भागात नव्हता. दुरवर असलेल्या नातलगाची खुशाली. घेण्यासाठी पोस्ट कार्यालयात किंवा ट्रॅक कॉल बुक करावा लागत असे. आता हातात मोबाईल आल्याने सार काही एकदम सहज आले आहे. वाहतुकीच्या बाबतीत विचार केल्यास बैलगाडीच वाहतुकीचे प्रभावी माध्यम होते. काळ बदलला ताबड्या रस्त्याचे काळे पांढरे रस्ते झाले. यंत्रतंत्राची वाहने आली सार काही बदल झाले. पण बदलत्या काळात मात्र बैलगाडी काही प्रमाणात अस्तित्व टिकवून आहे. ग्रामीण भागातील काही शेतकरी शेतमाल आजही बैलगाडीने अड्याळ येथील आठवडी बाजारात नेत आणत असल्याचे आढळते. परंतु तो आवाज नाही आणि बैलबंड्याची संग सुध्दा पहायला मिळत नाही. पूर्वी गोंदिया जिल्ह्यातील काही ठराविक आठवडी बाजारात दुकान लावायला जागा उरत नव्हती. उलट नाइलाजास्तव दुकान बंडीत व बैल कोणाच्याही घरच्या आडाला बांधुन ठेवावे लागत असे. आज जागा आहेत दुकाने नाहीत आणि ज्यांचे दुकाने आहेत त्यांचे व्यवसाय होत नाही.काही वर्षाआधी याच बैलगाडी शिवाय ग्रामीण भागात वाहतुकीचा अन्य पर्याय नव्हता मग कुणाचा लग्न असो वा कुठली जत्रा. रात्रीला सोबत दिवा असला की झाल समाधान एकाच वेळी २०-२० बैलगाड्या एकामागे एक जशी रेलगाडीच लागली. वाटेतल्या प्रवासात एकमेकांना ओव्हरटेक करुन मिशीला ताव मारण्याची गमत निराळीच.वाहतुकीची माध्यमे वाढली प्रत्येक गावात मालवाहक टेम्पो आले व बैलगाडी मागे पडली. शेतकऱ्यांच्या घरी पॉवर टिलर टॅक्ट्रर आल्याने बैलजोडी बाळगणे अव्यवहार्य वाटू लागल्याने याचा परिणाम बैलगाडी वाहतुक बंद पडण्यावर आला. पण म्हणून काय तिचे महत्व कमी झालेल नाही. जलद वाहतुकीच्या कितीही सुविधा निर्माण झाल्या तरी ग्रामीण जिवनाचा अविभाज्य भाग बनलेली बैलगाडी बैलाच्या घुंगराचा आवाज मात्र मंदावला आहे. (प्रतिनिधी)