शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अनावश्यक संदेशांमुळे मोबाईल ग्राहक त्रासले

By admin | Updated: November 2, 2016 00:30 IST

सध्याच्या काळात संपूर्ण नागरिकांसाठी मोबाईल हा अविभाज्य अंग झाला आहे. याच संधीचा फायदा घेत भ्रमणध्वनी सिमकार्ड कंपन्या ग्राहकांवर

रावणवाडी : सध्याच्या काळात संपूर्ण नागरिकांसाठी मोबाईल हा अविभाज्य अंग झाला आहे. याच संधीचा फायदा घेत भ्रमणध्वनी सिमकार्ड कंपन्या ग्राहकांवर अतिरिक्त सेवांचा भार लादत आहेत. त्यामुळे ग्राहकांचे खिसे दिवसाढवळ्या कपून ग्राहकांना झळ पोहोचत आहे.भ्रमणध्वनीचा शोध लागल्यापासून त्याचा जितका योग्य वापर होत आहे, तितकाच गैरवापरही होत आहे. यासोबतच विविध अनावश्यक मॅसेजनेही ग्राहक त्रस्त झाले आहेत. या त्रासापासून ग्राहकांना मुक्तता मिळण्यासाठी न्यायालयाच्या आदेशनुसार ‘डू नॉट डिस्टर्ब’ ही सेवा सुरुवात करण्यात आली. परंतु त्याचा काही उपयोग होत नसून विविध कंपन्याचे मॅसेज येणे अहोरात्र सूरुच असल्याचे दिसत आहे. या गैरप्रकारात फक्त भ्रमणध्वनी कंपन्याच अग्रेसर आहेत असे नाही, यात सिमकार्ड कंपन्याही विविध प्रकाराच्या योजना मॅसेजद्वारे मोठ्या प्रमाणात पाठवित आहेत. या संदेशांना ग्राहक वैतागले आहेत. ग्राहक आता जागरुक होत आहेत. तर काही ठिकाणी अशा कंपन्यावर दंडही आकारला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप देण्याऱ्या कंपन्यांवर काही प्रमाणात जरब बसेल, असे भ्रमणध्वनीधारकांना वाटत आहे.अनावश्यक कोणतीही सेवा सूरु करणे, ग्राहकांचे बॅलेंस कट करणे या परस्पर उद्योगातून भ्रमणध्वनी कंपन्या कोट्यवधी रुपयांचा महसूल अतिरिक्त गोळा करण्याचा बेतात आहेत. या कंपन्या आपल्या कंपनीचा नफा वाढवून ग्राहकांना बळीचा बकरा बनवित आहेत. चाळीस-पन्नास रुपयांच्या नुकसानासाठी कोणताही ग्राहक न्यायालयात जात नाही. म्हणून भ्रमणध्वनीवर प्रत्येक वेळी शेकडो अनावश्यक मॅसेज येत असतात. या मॅसेजमुळे रात्री त्रास होतो. तर ग्राहक संबंधित प्रकरणाची तक्रार जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या ग्राहक न्यायालयात ठराविक नियम अटींची पूर्तता करुन वाद दाखल करु शकतो. त्या संबंधी ग्राहक न्यायालय तक्रारीची दखल तडकाफडकी होत त्याचा निपटारा करण्यात येते.(वार्ताहर)