शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

मनरेगाला निधीचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:12 IST

दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम उपलब्ध व्हावे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कुशल-अकुशल कामे उपलब्ध करुन देण्यात आली.

ठळक मुद्देमजुरांवर उपासमारीची पाळी : ३६ कोटी रूपये थकीत

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम उपलब्ध व्हावे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कुशल-अकुशल कामे उपलब्ध करुन देण्यात आली. यामुळे हजारो मजुरांच्या हाताला काम मिळाले. मात्र दिवसभर घाम गाळून चार पैसे हाती पडतील अशी अपेक्षा मजुरांना होती. पण शासनाकडून निधी न मिळाल्याने मनरेगाला निधीचा दुष्काळ पडल्याचे चित्र आहे.दुष्काळाचा सामना करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. या अभियानांतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यात जिल्हा राज्यात अव्वल आला. परंतु दुसरीकडे कुशल-अकुशल कामाचे पैसे प्रलंबित ठेवण्यात जिल्हा राज्यात अव्वल आहे. सन २०१७-१८ मध्ये राज्यात मनरेगाच्या कामाचे २८३ कोटी १२ लाख ५ हजार रूपये प्रलंबित आहेत. यातील २६४ कोटी ४६ लाख ९७ हजार कुशल तर १८ कोटी १७ लाख १३ हजार अकुशल कामाचे आहेत. जिल्ह्यातील ३६ कोेटी ३ लाख ५२ हजार रूपये निधी शासनाने अद्यापही दिला नाही. यातील ३५ कोटी ६३ लाख १५ हजार कुशल तर ३९ लाख ९६ हजार अकुशल कामाचे प्रलंबित आहेत. यात जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील १२ कोटी ५ लाख ७४ हजार, अर्जुनी-मोरगाव ५ कोटी एक लाख ९१ हजार रूपये, सालेकसा ४ कोटी ५० लाख ६१ हजार, आमगाव ३ कोटी ७१ लाख ७४ हजार रूपये, गोरेगाव तालुक्याचे ३ कोटी २ लाख ४४ हजार रूपये, सडक-अर्जुनी २ कोटी ८२ लाख ४८ हजार रूपये, गोंदिया २ कोटी ६२ लाख ८८ हजार व तिरोडा २ कोटी २५ लाख ७३ हजार रूपये प्रलंबित आहेत. कुशल कामाचे पैसे मोठ्या प्रमाणात न मिळाल्यामुळे, घरकुल, शौचालयाचे बांधकाम ठप्प पडले आहे.बांधकाम साहित्य पुरवठा करणाऱ्या दुकानदारांनी आधी उधारी द्या नंतरच साहित्य पुरवठा करु अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांसमोर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे एकीकडे सर्वाधिक कामे उपलब्ध करुन देण्याचा दावा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मजुरांची कोट्यवधी रुपयांची मजुरी शिल्लक आहे.चंद्रपूर राज्यात दुसऱ्या क्रमांकावरगोंदियानंतर राज्यात नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे २९ कोटी ३२ लाख ७७ हजार रूपये प्रलंबित आहेत. यात २९ कोटी १३ लाख ५५ हजार कुशल तर १८ लाख ६ हजार अकुशल मजुरीचे प्रलंबित आहेत. तिसऱ्या क्रमांकावर अमरावती असून या जिल्ह्याचे २४ कोटी २८ लाख ८ हजार रूपये प्रलंबित आहेत. यात २३ कोटी १३ लाख १७ हजार कुशल तर एक कोटी १२ लाख ६६ हजार अकुशल मजुरीचे आहेत.