शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

दलित वस्ती सुधार योजनेचा दुरूपयोग

By admin | Updated: May 30, 2014 00:11 IST

अनुसूचित जाती व व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाकडून कटंगीकला ग्रामपंचायतला सौर ऊज्रेवर चालणारे १0 पथदिवे मिळाले.

गोंदिया : अनुसूचित जाती व व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाकडून कटंगीकला ग्रामपंचायतला सौर ऊज्रेवर चालणारे १0 पथदिवे मिळाले. मात्र या पथदिव्यांना दलित वस्तीत न लावता तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांच्या घरासमोर लावण्यात आले आहे. हा दलित वस्तीच्या सुधारणेसाठी मिळणार्‍या निधीचा दुरूपयोग आहे, असा आरोप माजी सरपंच, विद्यमान ग्रा.पं. सदस्यासह गावकर्‍यांनी केला आहे. प्राप्त माहितीनुसार, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास या योजनेचे पूर्वीचे नाव दलित वस्ती सुधार योजना होते. या योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाचे आयुक्त यांच्या आदेशान्वये १८ फेब्रुवारी २0१४ रोजी पुरविलेले १0 सौर पथदिवे चांगल्या स्थितीत असल्याने कटंगीकला ग्रामपंचायतने स्वीकारले. या कटंगीकलाच्या सरपंचाने वार्ड-३ व वार्ड-४ येथे दलित वस्तीच्या योग्य ठिकाणी सौर पथदिवे न लावता ग्रामपंचायत सदस्यांच्या हितासाठी व गैरवापरासाठी लावून दिले.  हे कृत्य जनताविरोधी व शासन फसवणुकीचे असल्याचे आरोप माजी सरपंच पुरूषोत्तम राऊत व ग्रा.पं. सदस्य अनिल तिराले यांनी केले आहेत. कटंगीकला येथील काही ग्रा.पं. सदस्य दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मिळालेल्या सौर पथदिव्यांना दलित वस्तीमध्येच लावण्यात यावे, अशी मागणी करीत आहेत. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांच्या घरासमोर बेकायदेशीरपणे व स्वत:च्या मनमर्जीने सौर पथदिवे लावण्यात आले आहेत.शासनाच्या योजनेचा लाभ जनतेला न मिळता लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनीच बळकावला. त्यांनी आपापल्या घरासमोरच सदर पथदिवे लावले. या गैरकृत्यासाठी सरपंच व काही सदस्य जबाबदार असून त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व दलित वस्ती सुधार योजनेचा लाभ दलितांना देण्यात यावा, अशी मागणी कटंगीकला वासीयांनी केली आहे. याशिवाय सरपंच, उपसरपंच व सचिव ग्रामस्थांना विविध योजनांचा फायदा मिळू देत नाही. योजनांचा लाभ ते केवळ आपल्या पसंतीच्याच लोकांना देत आहेत. सामाजिक वनीकरणची कार्ये उपसरपंच यांच्या पत्नीला देण्यात आली आहेत. शिवाय ग्रामपंचायतीच्या कामांची ठेकेदारी येथील ग्रामपंचायत सदस्यच करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या सर्व प्रकरणांची योग्य चौकशी करून त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच पुरूषोत्तम राऊत, ग्रामपंचायत सदस्य अनिल तिराले, राजूसिंह बैस, प्रतिभा डोंगरवार, विनोद वर्‍हाडे, मुरलीधर बावणकर, किर्ती राऊत, रेवन चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)