शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दलित वस्ती सुधार योजनेचा दुरूपयोग

By admin | Updated: May 30, 2014 00:11 IST

अनुसूचित जाती व व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाकडून कटंगीकला ग्रामपंचायतला सौर ऊज्रेवर चालणारे १0 पथदिवे मिळाले.

गोंदिया : अनुसूचित जाती व व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाकडून कटंगीकला ग्रामपंचायतला सौर ऊज्रेवर चालणारे १0 पथदिवे मिळाले. मात्र या पथदिव्यांना दलित वस्तीत न लावता तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांच्या घरासमोर लावण्यात आले आहे. हा दलित वस्तीच्या सुधारणेसाठी मिळणार्‍या निधीचा दुरूपयोग आहे, असा आरोप माजी सरपंच, विद्यमान ग्रा.पं. सदस्यासह गावकर्‍यांनी केला आहे. प्राप्त माहितीनुसार, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास या योजनेचे पूर्वीचे नाव दलित वस्ती सुधार योजना होते. या योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाचे आयुक्त यांच्या आदेशान्वये १८ फेब्रुवारी २0१४ रोजी पुरविलेले १0 सौर पथदिवे चांगल्या स्थितीत असल्याने कटंगीकला ग्रामपंचायतने स्वीकारले. या कटंगीकलाच्या सरपंचाने वार्ड-३ व वार्ड-४ येथे दलित वस्तीच्या योग्य ठिकाणी सौर पथदिवे न लावता ग्रामपंचायत सदस्यांच्या हितासाठी व गैरवापरासाठी लावून दिले.  हे कृत्य जनताविरोधी व शासन फसवणुकीचे असल्याचे आरोप माजी सरपंच पुरूषोत्तम राऊत व ग्रा.पं. सदस्य अनिल तिराले यांनी केले आहेत. कटंगीकला येथील काही ग्रा.पं. सदस्य दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मिळालेल्या सौर पथदिव्यांना दलित वस्तीमध्येच लावण्यात यावे, अशी मागणी करीत आहेत. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांच्या घरासमोर बेकायदेशीरपणे व स्वत:च्या मनमर्जीने सौर पथदिवे लावण्यात आले आहेत.शासनाच्या योजनेचा लाभ जनतेला न मिळता लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनीच बळकावला. त्यांनी आपापल्या घरासमोरच सदर पथदिवे लावले. या गैरकृत्यासाठी सरपंच व काही सदस्य जबाबदार असून त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व दलित वस्ती सुधार योजनेचा लाभ दलितांना देण्यात यावा, अशी मागणी कटंगीकला वासीयांनी केली आहे. याशिवाय सरपंच, उपसरपंच व सचिव ग्रामस्थांना विविध योजनांचा फायदा मिळू देत नाही. योजनांचा लाभ ते केवळ आपल्या पसंतीच्याच लोकांना देत आहेत. सामाजिक वनीकरणची कार्ये उपसरपंच यांच्या पत्नीला देण्यात आली आहेत. शिवाय ग्रामपंचायतीच्या कामांची ठेकेदारी येथील ग्रामपंचायत सदस्यच करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या सर्व प्रकरणांची योग्य चौकशी करून त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच पुरूषोत्तम राऊत, ग्रामपंचायत सदस्य अनिल तिराले, राजूसिंह बैस, प्रतिभा डोंगरवार, विनोद वर्‍हाडे, मुरलीधर बावणकर, किर्ती राऊत, रेवन चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)