शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मिस मॅच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:56 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेतंर्गत शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली.

ठळक मुद्दे५१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी : अर्ध्या शेतकºयांचे वेट अ‍ॅन्ड वॉच

ऑनलाईन लोकमतगोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेतंर्गत शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन राबविली जात असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या तब्बल २५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मिस मॅच झाल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागणार असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन जवळपास आठ महिन्याचा कालावधील पूर्ण होत आहे. परंतू अद्यापही यातील घोळ संपलेला नाही. कर्जमाफीसाठी शासनाकडून दररोज नवीन निकष लावले जात असल्याने सहकार विभागासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी सुध्दा तणावात आहे. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन राबविली जात असल्याने बरेच पात्र शेतकरी सुध्दा अपात्र ठरत असल्याचे चित्र आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या तीन याद्या तयार केल्या जात आहे. यात ग्रीन, येलो आणि रेड याद्यांचा समावेश आहे. ग्रीन यादीतील शेतकरी कर्जमाफीस पात्र तर येलो यादीतील शेतकऱ्यांच्या अर्जांमध्ये त्रृट्या असल्याने प्रलबिंत व रेड यादीत समावेश असलेले शेतकरी कर्जमाफीस अपात्र ठरविले जात आहे.ग्रीन यादी मुंबई येथील आयटी विभागाकडून सहकार विभाग आणि बँकाना पाठविली जात आहे. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कृषी कर्जाची उचल करणाºया शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा बँकेने एकूण १ लाख ७ हजार ६१९ शेतकऱ्यांना २६५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. यापैकी आत्तापर्यंत ५१ हजार १४१ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून त्यांच्या बँक खात्यावर १३२ कोटी ३५ लाख ५३ हजार रुपये जमा करण्यात आले. यामध्ये १४ हजार ५३७ नियमित कर्जफेड करणाºया शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेतंर्गत २५ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले. तर दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या ३२३२ शेतकऱ्यांना ओटीएस योजनेतंर्गत कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. जिल्हा बँकेने कर्ज वाटप केलेल्या एकूण शेतकऱ्यांची संख्या पाहता अद्याप अर्धे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असल्याचे चित्र आहे.चुकीच्या मोबाईल क्रमांकाने केला घातकर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरताना शेतकऱ्यांना मोबाईल क्रमांक टाकणे आवश्यक होते. त्याशिवाय अर्ज संकेत स्थळावर अपलोड होत नव्हते. त्यामुळे बºयाच आॅनलाईन केंद्र संचालकांनी चुकीचे मोबाईल क्रमांक टाकले. तर काही अर्जांवर शेतकऱ्यांनी भरलेली माहिती आणि बॅँकाची माहिती जुळत नसल्याने हजारो शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र ठरले.बँकेला ग्रीन यादीची प्रतीक्षाशेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची ग्रीन यादी मुंबई येथील आयटी विभागाकडून बँकेला पाठविली जात आहे. मात्र जिल्हा बँकेला अद्यापही उर्वरित शेतकऱ्यांची ग्रीन यादी प्राप्त झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.