शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

२५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मिस मॅच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:56 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेतंर्गत शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली.

ठळक मुद्दे५१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी : अर्ध्या शेतकºयांचे वेट अ‍ॅन्ड वॉच

ऑनलाईन लोकमतगोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेतंर्गत शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन राबविली जात असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या तब्बल २५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मिस मॅच झाल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागणार असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन जवळपास आठ महिन्याचा कालावधील पूर्ण होत आहे. परंतू अद्यापही यातील घोळ संपलेला नाही. कर्जमाफीसाठी शासनाकडून दररोज नवीन निकष लावले जात असल्याने सहकार विभागासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी सुध्दा तणावात आहे. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन राबविली जात असल्याने बरेच पात्र शेतकरी सुध्दा अपात्र ठरत असल्याचे चित्र आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या तीन याद्या तयार केल्या जात आहे. यात ग्रीन, येलो आणि रेड याद्यांचा समावेश आहे. ग्रीन यादीतील शेतकरी कर्जमाफीस पात्र तर येलो यादीतील शेतकऱ्यांच्या अर्जांमध्ये त्रृट्या असल्याने प्रलबिंत व रेड यादीत समावेश असलेले शेतकरी कर्जमाफीस अपात्र ठरविले जात आहे.ग्रीन यादी मुंबई येथील आयटी विभागाकडून सहकार विभाग आणि बँकाना पाठविली जात आहे. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कृषी कर्जाची उचल करणाºया शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा बँकेने एकूण १ लाख ७ हजार ६१९ शेतकऱ्यांना २६५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. यापैकी आत्तापर्यंत ५१ हजार १४१ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून त्यांच्या बँक खात्यावर १३२ कोटी ३५ लाख ५३ हजार रुपये जमा करण्यात आले. यामध्ये १४ हजार ५३७ नियमित कर्जफेड करणाºया शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेतंर्गत २५ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले. तर दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या ३२३२ शेतकऱ्यांना ओटीएस योजनेतंर्गत कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. जिल्हा बँकेने कर्ज वाटप केलेल्या एकूण शेतकऱ्यांची संख्या पाहता अद्याप अर्धे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असल्याचे चित्र आहे.चुकीच्या मोबाईल क्रमांकाने केला घातकर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरताना शेतकऱ्यांना मोबाईल क्रमांक टाकणे आवश्यक होते. त्याशिवाय अर्ज संकेत स्थळावर अपलोड होत नव्हते. त्यामुळे बºयाच आॅनलाईन केंद्र संचालकांनी चुकीचे मोबाईल क्रमांक टाकले. तर काही अर्जांवर शेतकऱ्यांनी भरलेली माहिती आणि बॅँकाची माहिती जुळत नसल्याने हजारो शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र ठरले.बँकेला ग्रीन यादीची प्रतीक्षाशेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची ग्रीन यादी मुंबई येथील आयटी विभागाकडून बँकेला पाठविली जात आहे. मात्र जिल्हा बँकेला अद्यापही उर्वरित शेतकऱ्यांची ग्रीन यादी प्राप्त झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.