शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

२५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मिस मॅच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:56 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेतंर्गत शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली.

ठळक मुद्दे५१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी : अर्ध्या शेतकºयांचे वेट अ‍ॅन्ड वॉच

ऑनलाईन लोकमतगोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेतंर्गत शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन राबविली जात असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या तब्बल २५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मिस मॅच झाल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागणार असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन जवळपास आठ महिन्याचा कालावधील पूर्ण होत आहे. परंतू अद्यापही यातील घोळ संपलेला नाही. कर्जमाफीसाठी शासनाकडून दररोज नवीन निकष लावले जात असल्याने सहकार विभागासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी सुध्दा तणावात आहे. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन राबविली जात असल्याने बरेच पात्र शेतकरी सुध्दा अपात्र ठरत असल्याचे चित्र आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या तीन याद्या तयार केल्या जात आहे. यात ग्रीन, येलो आणि रेड याद्यांचा समावेश आहे. ग्रीन यादीतील शेतकरी कर्जमाफीस पात्र तर येलो यादीतील शेतकऱ्यांच्या अर्जांमध्ये त्रृट्या असल्याने प्रलबिंत व रेड यादीत समावेश असलेले शेतकरी कर्जमाफीस अपात्र ठरविले जात आहे.ग्रीन यादी मुंबई येथील आयटी विभागाकडून सहकार विभाग आणि बँकाना पाठविली जात आहे. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कृषी कर्जाची उचल करणाºया शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा बँकेने एकूण १ लाख ७ हजार ६१९ शेतकऱ्यांना २६५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. यापैकी आत्तापर्यंत ५१ हजार १४१ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून त्यांच्या बँक खात्यावर १३२ कोटी ३५ लाख ५३ हजार रुपये जमा करण्यात आले. यामध्ये १४ हजार ५३७ नियमित कर्जफेड करणाºया शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेतंर्गत २५ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले. तर दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या ३२३२ शेतकऱ्यांना ओटीएस योजनेतंर्गत कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. जिल्हा बँकेने कर्ज वाटप केलेल्या एकूण शेतकऱ्यांची संख्या पाहता अद्याप अर्धे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असल्याचे चित्र आहे.चुकीच्या मोबाईल क्रमांकाने केला घातकर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरताना शेतकऱ्यांना मोबाईल क्रमांक टाकणे आवश्यक होते. त्याशिवाय अर्ज संकेत स्थळावर अपलोड होत नव्हते. त्यामुळे बºयाच आॅनलाईन केंद्र संचालकांनी चुकीचे मोबाईल क्रमांक टाकले. तर काही अर्जांवर शेतकऱ्यांनी भरलेली माहिती आणि बॅँकाची माहिती जुळत नसल्याने हजारो शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र ठरले.बँकेला ग्रीन यादीची प्रतीक्षाशेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची ग्रीन यादी मुंबई येथील आयटी विभागाकडून बँकेला पाठविली जात आहे. मात्र जिल्हा बँकेला अद्यापही उर्वरित शेतकऱ्यांची ग्रीन यादी प्राप्त झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.