शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुले चालवतात पानटपरी

By admin | Updated: June 14, 2014 23:43 IST

धूम्रपान केल्याने कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊन आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेल्याचे पुढे आल्यावर केंद्र शासनाने धूम्रपानविरोधी कायदा अंमलात आणला असला तरी या कायद्याचे पालन

गोंदिया : धूम्रपान केल्याने कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊन आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेल्याचे पुढे आल्यावर केंद्र शासनाने धूम्रपानविरोधी कायदा अंमलात आणला असला तरी या कायद्याचे पालन होतांना कुठेही दिसत नाही. धूम्रपानाच्या विळख्यात आता अल्पवयीन मुलांपासून सर्वच सापडले आहेत. या कायद्यांतर्गत धूम्रपान करणाऱ्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नसताना ग्रामीण भागात अल्पवयीन मुलेच पान टपऱ्या चालवत असल्याचे चित्र पाहून या कायद्याचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. तंबाखूजन्यविरोधी कायद्यांतर्गत १८ वर्षाखालील मुलांनी तंबाखूमिश्रित पदार्थ विक्री करणे, सेवन करणे कायद्याने गुन्हा व बंदी आहे. ग्रामीण भागात शेती मशागतीची कामे सुरू असल्याने पालक कामात व्यस्त आहेत. त्याचवेळी शाळा, महाविद्यालयांना सुट्या आहेत. अल्पवयीन मुलांना खेळण्यापलीकडे कामे नाहीत. अशावेळी ही बालके दोन पैसे मिळावेत यासाठी पानटपऱ्या चालवताना दिसत आहेत. याचा परिणाम त्यांच्या बालमनावर होत असतानाच सोबत त्यांना व्यसन जडत आहे. ते व्यसनाधीन होत आहेत. धूम्रपानामुळे दरवर्षी एकूण लोकसंख्येच्या १० टक्के व्यक्तींचा मृत्यू होतो हे एका सर्वेक्षणातून सिध्द झाले आहे. धूम्रपान केल्यामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होत असल्याची गंभीर दखल घेऊन केंद्र शासनाने धूम्रपान व तंबाखूविरोधी कायदा लागू केला. सुरूवातीला कायद्याची अंमलबजावणी झाली. मात्र नंतर संबधित विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. आता बालके तंबाखूजन्य पदार्थ खातात यापुढेही जाऊन ही बालके आज थेट त्यांची विक्रीच करताना ग्रामीण भागात दिसू लागली आहेत. त्यांच्या पानटपऱ्या सार्वजनिक ठिकाणी आहेत. परंतु कारवाई होत नाही. दोन पैसे येत असल्याने वडीलही त्याला काही बोलत नाही. एकंदर या कायद्याचे धिंडवडे काढले जात आहेत. या कायद्यात दंडाची तरतूद आहे. धूम्रपानविरोधी कायद्यांतर्गत अशा लोकांना केलेले दंड व शिक्षा नगण्यच आहे. बसस्थानक, वर्दळीचे ठिकाण, रेल्वे स्टेशन या भागात धूम्रपान मोठ्या प्रमाणात केला जातो. सर्वच शासकीय कार्यालयात खुलेआम धूम्रपान केले जाते. लहान मुलेही सर्रास धूम्रपान करताना दिसत आहेत. पानटपरीचे चालक-बालक असल्याने पुन्हा या ठिकाणी येणाऱ्या चिमुरड्यांचे प्रमाण वाढते. एकंदरीत बालजीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. महाविद्यालयीन युवकांसाठी व्यसन आता फॅशन झाली आहे. तरूण वयात जीवघेण्या व्यसनांना जवळ केल्यामुळे तरूण वयात म्हातारपणाची झलक त्यांच्या चेहऱ्यांवर दिसून येते. सद्यस्थितीत ९० टक्के अल्पवयीन तसेच युवा पिढी धूम्रपानाच्या आहारी गेली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. शासकीय प्रयत्नांसोबतच विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांकडून धूम्रपान बंदीसाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. तेव्हाच शासकीय कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन धूम्रपानापासून मुक्त होण्यास मदत होईल. मात्र आजघडीला परिसरात अनेक पानटपरीवर बालक तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना आढळतात. असे असतानाही अन्न व औषध विभाग झोपेत आहे. धूम्रपानविरोधी कायद्याची अंमलबजावणी करणारे कर्मचारीच कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन करीत असल्यामुळे या कायद्याची सर्रासपणे पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळेच अल्पवयीन मुले पानटपऱ्या चालवीत असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)