शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

अल्पवयीन मुले चालवतात पानटपरी

By admin | Updated: June 14, 2014 23:43 IST

धूम्रपान केल्याने कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊन आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेल्याचे पुढे आल्यावर केंद्र शासनाने धूम्रपानविरोधी कायदा अंमलात आणला असला तरी या कायद्याचे पालन

गोंदिया : धूम्रपान केल्याने कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊन आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेल्याचे पुढे आल्यावर केंद्र शासनाने धूम्रपानविरोधी कायदा अंमलात आणला असला तरी या कायद्याचे पालन होतांना कुठेही दिसत नाही. धूम्रपानाच्या विळख्यात आता अल्पवयीन मुलांपासून सर्वच सापडले आहेत. या कायद्यांतर्गत धूम्रपान करणाऱ्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नसताना ग्रामीण भागात अल्पवयीन मुलेच पान टपऱ्या चालवत असल्याचे चित्र पाहून या कायद्याचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. तंबाखूजन्यविरोधी कायद्यांतर्गत १८ वर्षाखालील मुलांनी तंबाखूमिश्रित पदार्थ विक्री करणे, सेवन करणे कायद्याने गुन्हा व बंदी आहे. ग्रामीण भागात शेती मशागतीची कामे सुरू असल्याने पालक कामात व्यस्त आहेत. त्याचवेळी शाळा, महाविद्यालयांना सुट्या आहेत. अल्पवयीन मुलांना खेळण्यापलीकडे कामे नाहीत. अशावेळी ही बालके दोन पैसे मिळावेत यासाठी पानटपऱ्या चालवताना दिसत आहेत. याचा परिणाम त्यांच्या बालमनावर होत असतानाच सोबत त्यांना व्यसन जडत आहे. ते व्यसनाधीन होत आहेत. धूम्रपानामुळे दरवर्षी एकूण लोकसंख्येच्या १० टक्के व्यक्तींचा मृत्यू होतो हे एका सर्वेक्षणातून सिध्द झाले आहे. धूम्रपान केल्यामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होत असल्याची गंभीर दखल घेऊन केंद्र शासनाने धूम्रपान व तंबाखूविरोधी कायदा लागू केला. सुरूवातीला कायद्याची अंमलबजावणी झाली. मात्र नंतर संबधित विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. आता बालके तंबाखूजन्य पदार्थ खातात यापुढेही जाऊन ही बालके आज थेट त्यांची विक्रीच करताना ग्रामीण भागात दिसू लागली आहेत. त्यांच्या पानटपऱ्या सार्वजनिक ठिकाणी आहेत. परंतु कारवाई होत नाही. दोन पैसे येत असल्याने वडीलही त्याला काही बोलत नाही. एकंदर या कायद्याचे धिंडवडे काढले जात आहेत. या कायद्यात दंडाची तरतूद आहे. धूम्रपानविरोधी कायद्यांतर्गत अशा लोकांना केलेले दंड व शिक्षा नगण्यच आहे. बसस्थानक, वर्दळीचे ठिकाण, रेल्वे स्टेशन या भागात धूम्रपान मोठ्या प्रमाणात केला जातो. सर्वच शासकीय कार्यालयात खुलेआम धूम्रपान केले जाते. लहान मुलेही सर्रास धूम्रपान करताना दिसत आहेत. पानटपरीचे चालक-बालक असल्याने पुन्हा या ठिकाणी येणाऱ्या चिमुरड्यांचे प्रमाण वाढते. एकंदरीत बालजीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. महाविद्यालयीन युवकांसाठी व्यसन आता फॅशन झाली आहे. तरूण वयात जीवघेण्या व्यसनांना जवळ केल्यामुळे तरूण वयात म्हातारपणाची झलक त्यांच्या चेहऱ्यांवर दिसून येते. सद्यस्थितीत ९० टक्के अल्पवयीन तसेच युवा पिढी धूम्रपानाच्या आहारी गेली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. शासकीय प्रयत्नांसोबतच विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांकडून धूम्रपान बंदीसाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. तेव्हाच शासकीय कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन धूम्रपानापासून मुक्त होण्यास मदत होईल. मात्र आजघडीला परिसरात अनेक पानटपरीवर बालक तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना आढळतात. असे असतानाही अन्न व औषध विभाग झोपेत आहे. धूम्रपानविरोधी कायद्याची अंमलबजावणी करणारे कर्मचारीच कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन करीत असल्यामुळे या कायद्याची सर्रासपणे पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळेच अल्पवयीन मुले पानटपऱ्या चालवीत असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)