शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

डिझेलच्या नावावर लाखो रुपये गडप केले

By admin | Updated: July 4, 2015 02:15 IST

भंडारा अर्बन बँकेच्या येथील शाखा कार्यालयात विजेची सोय असताना विद्यमान संचालक गोपीचंद थावानी यांनी

गोंदिया : भंडारा अर्बन बँकेच्या येथील शाखा कार्यालयात विजेची सोय असताना विद्यमान संचालक गोपीचंद थावानी यांनी जनरेटरमध्ये डिझेल लागल्याचे भासवून लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे. कार्यालयात महिनाभर वीज नसली तरीही १२ हजार रूपयांपेक्षा जास्तीचे डिझेल लागणार नाही. मात्र थावानी यांनी यांनी १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०११ या काळात २ लाख ९५ हजार १३८ रुपयांचे डिझेल घेतल्याचे लेजर मध्ये नोंदविले असून त्यांनी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आनंद कृपाण यांनी केला आहे. दि भंडारा अर्बन को आॅप. बँकेचे येथील शाखा कार्यालय भाड्याच्या इमारतीत असून तेथे विजेची सोय आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यास बँकेचे काम सुरळीत चालावे यासाठी बँकेने स्वत:चे जनरेटर विकत घेतले आहे. १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०११ व त्यानंतर सुटीचे दिवस वगळता प्रत्येक दिवशी डिझेल विकत घेतल्याचे बिल जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी तीन-तीन वेळा डिझेल घेतल्याचे लेझर बुकवर नोंद आहे. वीज पुरवठा सुरळीत असताना एकाच दिवशी १२०० ते १३०० रुपयाचे बिल कसे जोडण्यात आले आहे. यावरून महिन्याकाठी ३० हजार रुपयांचे डिझेल खरेदी केल्याचे दाखवून खोटी बिले सादर करण्यात आली. यात लाखो रूपयांचा घोटाळा करण्यात आला असल्याचे कृपाण म्हणाले. यासाठी १५ वर्षापासून बँकेचे संचालक म्हणून काम करणारे थावानी यांनी जनतेचे पैसे घोटाळा करुन स्वत:च्या खिशात टाकले आहे. डिझेलवर एवढा खर्च झाला तर वीज बिल आलेच नाही का? असा प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणी त्यांनी केली. मानेवाडा (नागपूर), धरमपेठ, वडसा व ब्रह्मपुरी येथे बँके च्या नवीन शाखा निर्माण करून अर्बन बँकेला ९१.१३ लाखांचा तोटा बसविला आहे. यातही सत्तारुढ संचालकांनी स्वार्थापोटी नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाखांसाठी विविध प्रकारचे साहित्य खरेदी केले आहे. तसेच सन २००९ मध्ये बँकेच्या ठेवी २९८.०३ कोटी होत्या. त्यात आता बँकेच्या चार शाखांची वाढ झाली असून सुद्धा ठेवीत मात्र घट झालेली असल्याचेही कृपाण यांनी सांगीतले. यावरून संचालकांवर ग्राहक ठेवीदाराचा किती विश्वास आहे, हे दिसून येत असल्याचेही कृपाण यावेळी म्हणाले. तर सन २०१५ मध्ये विकासनाम्यात दाखविण्यात आलेला ३.४३ कोटींचा नफा चुकीचा आहे. हा नफा वैधानिक तरतुद न करता दाखविण्यात आला आहे. सन २००९ मध्ये सर्व वैधानिक तरतुदी केल्यानंतरचा निव्वळ नफा १.९३ कोटी इतका होता. मात्र विकासनाम्यात विद्यमान संचालकांनी दाखविलेला नफा वैधानिक तरतुदी न करता दाखविला होता. सन २०१४-१५ मध्ये बँकेला १.८५ कोटींचा शुध्द तोटा झाला असून याला विद्यमान संचालक मंडळ जबाबदार आहे. विशेष म्हणजे नोकर भरतीत भंडारा व गोंदिया येथील लोकांची निवड यवतमाळ येथील लोकांना भरण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उम्मेदवारांवर संचालकांनी अन्याय केला असल्याचा आरोपही कृपाण यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)