शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अड्याळ येथे लोकवर्गणीतून उभारला प्रवासी निवारा

By admin | Updated: August 10, 2016 00:18 IST

गावहितासाठी येथील व्यापारी मंडळ व दान देणाऱ्यांची अड्याळ गावात कमी नाही. त्यामुळेच की काय लोकप्रतिनिधींनी जरी दुर्लक्ष केले असले...

ग्रामस्थांनी दाखविला एकोपा : वर्गणी देणाऱ्यांची लागणार यादी व होणार सत्कार विशाल रणदिवे अड्याळ गावहितासाठी येथील व्यापारी मंडळ व दान देणाऱ्यांची अड्याळ गावात कमी नाही. त्यामुळेच की काय लोकप्रतिनिधींनी जरी दुर्लक्ष केले असले तरी ग्रामस्थांनी प्रवाशांना भेडसावणारी समस्या लक्षात घेतली. व लोकसहभाग व लोकवर्गणीतून टूमदार छोटेसे बसथांबा उभारला. या आधी आमदार रामचंद्र अवसरे यांच्या सोबत काही काळ राहणारे व भारतीय जनता पार्टीचे खासदार नाना पटोले यांच्या सोबत निवडणूक काळात राहणारे मुनिर शेख यांनी गावातील सामाजिक कार्यकर्ता राजू मुरकुटे या दोघांनी वर्गणी मिळेल तितकी त्या दुकानातून घेवून १५ दिवसात २० हजार किमतीचा प्रवासी निवारा लोकसहभागातून उभारला. लवकरच त्या ठिकाणी वर्गणीदारांची यादी व त्यांचा सत्कारासोबतच २० हजारांच्या पैशाच्या हिशोबाची सुद्धा माहिती देण्यात येणार आहे. कारण गावातील दान दाते देत असले तरी त्याचा हिशोब देणे हे गरजेचे आहे, असे मत येथील राजू मुरकुटे यांनी मांडले आहे. अशी माहिती दिल्यामुळे लोकांमध्ये विश्वास राहील. हा आहे पारदर्शकपणा, असाच राहिला तर कोणत्याही लहान मोठ्या कामात भ्रष्टाचार होणार नाही. एवढ््या मोठ्या गावात राजकारण्यांच्या गडावर लोकवर्गणीतून जर बसस्थानक परिसरात प्रवासी निवारा होत असेल तर यापेक्षा या गावाचे दुर्भाग्य कोणते? याच रस्त्यावरून जिथे आधी प्रवाशांना साधी बसायला जागा नव्हती, पाण्यात थांबायचे कुठे या प्रश्नात प्रवासी राहयचे आणि इथून एसी असलेल्या, नसलेल्या गाड्यातून प्रवास करणारे अधिकारी, नेते मंडळींना या बसस्थानक, प्रवाशांची चिंता कशी नाही आली? असा संतप्त प्रश्न प्रवाशी करीत होते. आता बचाव होईल, प्रवाशांचा एवढा प्रवासी निवारा एका बाजूला किशोर पंचभाई यांनी भेट दिला तर दुसऱ्या बाजूला लोकवर्गणीतून साकारला. काही जाणकारांच्या मते अड्याळमध्ये आधीसारखे तडफदार नेते राहिले नाही. असेही बोलले जाते. लोकसहभागातून बसस्थानकाची तात्पूरती व्यवस्था ग्रामस्थांनी केल्याने गावात आजही एकोपा नांदतो, याची जाण करून दिली आहे. निवडणूक येते तेव्हा परिसरातील सर्वात मोठे गाव व लोकसंख्या असलेल्या अड्याळ गावामध्येच मोठी प्रचारसभा असते. मताचा जोगवा मागणारे राजकारणी त्यांच्या मतदारांच्या मदतीसाठी पुढाकार घेत नसल्याचे यावरून दिसून आले.